जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by पंकज कागणे
07-06-2017
pankajkagane@gmail.com
सर विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) या परीक्षेच्या शासन निर्णयातील नियम क्र. ८ नुसार सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत-कमी ४० टक्के गुण व संपुर्ण परीक्षेत एकूण गुणाच्या ५० टक्के गुण (म्हणजे १००० पैकी ५०० च्या वर गुण ) मिळाले तर सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे जाहिर केले जाते. तसेच नियम क्र. १० नुसार जर परीक्षार्थी परीक्षा नापास झाला तर त्याने कोणत्याही विषयात किंवा विषयांमध्ये त्याने ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले तर त्याला त्या विषयाला पुन्हा बसण्यापासुन सुट देण्यात येते.
प्रश्न खालील प्रमाणे-
(१) तीन विषयाला यापुर्वीच्या परीक्षेत सुट मिळाली होती. म्हणून फक्त ३ विषयाची पुन्हा परीक्षा दिली तर संपुर्ण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन्ाही विषयात प्रत्येकी ६० टक्के गुण मिळवावे लागतील कि ४० टक्के गुण मिळवावे लागतील सर.
कृपया करुन मार्गदर्शन करावे. खुप मोठी मदत होईल सर.
Question by पंकज कागणे
07-06-2017
pankajkagane@gmail.com
आदरणीय महोदय माझा प्रश्न असा आहे की, माझे आजीचे नावावर २ एकर जमीन होती, त्यांचे निधन सन २००० मध्ये झाले पण माझे आजीने कोणत्याही मुलाच्या नावाने मृत्युपत्र लिहून दिलेल नाही.
मग आजीचे निधन झाल्यानंतर त्या जमीनीच्या ७/१२ वर वारस म्हणून फक्त माझे वडीलांचे नाव आजच्या तारखेपर्यंत आहे. माझे वडीलांचे दोन भाऊ सदर जमीनीच्या ७/१२ वर वारस म्हणून आमचे नाव नोंदविण्यात यावे म्हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर तलाठी साहेब त्यांचे नाव वारस म्हणून ७/१२ वर नोंदवतील का सर ?
कृपया करुन याेेग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपले कथनानुसार , आपले आज्जीस तीन मुले आहेत . त्यामुळे साहजिकच अन्य दोन वारसांची नावे लागणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
07-06-2017
umeshanpat45@gmail.com
नमस्कार सर,
जमिनीची मोजणी केल्यास मोजणी अधिकारी अतिक्रमण असल्यास ते काढून देऊ शकतात का?
जर बाजूच्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढण्यास मनाई केली तर त्याची तक्रार कोठे करावी?
शेत जमिनीवर असणारे अतिक्रमण काढण्यास तलाठी अधिकारी मदत करतात का?
त्यांची मदत होऊ शकते का ? उत्तर द्या?
मोजणी अधिकारी मोजणी कधी शकत नाही
तलाठी हि खाजगी जमिनीचारील अतिक्रमण काढू शकत नाही .
आपणास ते अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मारुती जाधव
07-06-2017
maruti.jafhav@ritindia.edu
MLRC act 1966 अंतर्गत सेक्शन 44 मधील Amendment 2014 नुसार Ddevelopment plan मध्ये समावेश असलेल्या नगरपालिका हद्दीतील जागा अक्रुषिक वापरासाठी कलेक्टर NA ची गरज नाही परंतु तहसीलदारांकडील NA ची सनद मिळवण्यासाठी काय करावे
Question by अनिलकुमार शिंदे
06-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्ते श्री किरण पाणबुडे साहेब या पूर्वी मी आपणास २ ई-मेल पाठवले होते त्याचा आपल्या कडून कुटला ही प्रतिसाद मिळाला नाही .मी नमूद केलेले प्रश्नांचे उत्तर अपेक्षित आहे १- ७/१२ मध्ये इतर हक्कात महाराष्ट्र खाजगी वन आधीनियमतील तरतुदीस अधीन राहून अशी नोंद असताना अशा शेत जमीची खरेदी विक्री करता येते का? त्याची शासन शासकीय परवानगी घेणे आवश्यक आहे का ? जर खरेदीदाराने सदर जमीन रीतसर खरेदी केलीतर त्याच्या नावाची नोंद 7/12 मध्ये होईल का ? कृपया माहिती मीळावी ही विनंती.
Question by अनिलकुमार शिंदे
06-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे कि मी एक गृहनिर्माण संस्थे मध्ये सदनिका विकत घेतली आहे. सदनिका विकत घेताना संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र सदनिकेचा महानगरपालिका कर पावती , नळाचे जोडणी बिल पाहून खरेदी केली आहे. संस्थेचे प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असून त्याचे वर्गीकरण भाडेकरी सह भागीदारी संस्था असे आहे. आता संस्थेचे नावे कोणताही महानगरपालिकेचा कर येत नाही. सातबारा मध्ये कोठेही संस्थेचे नावाचा उल्लेख नाही. अनधिकृत बांधकाम असा उल्लेख आहे. जागेचा बिन शेती आदेश नाही. महानगरपालिकेने आराखडा मंजूर केलेला नाही. बांधकाम परवाना दिला नाही. टायटल मध्ये चुकीची माहिती आहे. सातबारामध्ये कु.का.की.४३ अशी नोंद आहे. पूर्वी १९८८ साली विकासकरारनामा व कुलमुखत्यार करून दिले होते त्या आधारे विकासकाने सर्व सदनिका अन रजिस्टर सदनिका धारकांना विकल्या सातबारा मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांची नोंद झाली. सातबारातील वारस जमीन मालकांनी पुन्हा ती जमीन विकासकाला कन्व्हेन्स डिडने विकली आहे.
आता संस्थेचे नावे जमीन होईल का? सदनिकेवर सदनिका धारकांचा मालकी हक्क काय असणार आहे. विकासक यांच्या विरुद्ध किंवा जमीन मालकानं विरुद्ध काही दावा दाखल केला तर फायदा होईल का? विकासक आम्हाला घराच्या बदल्यात त्याचा ठिकाणी २७% जागा वाढवून देतो आहे. ते मान्य केलेले चांगले का दावा दाखल केल्याने फायदा होईल . या बाबत मार्ग सुचवावा. हि विनंती
Question by उमेश मुकुंद अनपट
05-06-2017
umeshanpat45@gmail.com
महोदय,
मी माझी जमीन रजिस्टर गहाण खत करून माझ्या काकांना दिली होती
ती मी आता त्यांचे पैसे देवून गहाण फेड दस्त करून घेतला आहे मी जमीन सोडवली आहे
परंतु माझ्या सातबारावर माझ्या काकांचेही नाव चढले आहे त्यासाठी मी तलाठी कडे अर्ज केला होता
तलाठी कडे असणाऱ्या रजिस्टर वर काकांच्या सह्या हव्या आहेत असे तलाठीचे म्हणणे आहे
परंतु ते आता सह्या करत नाहीत मी काय करावे माझ्या सातबारा वर असलेले काकांचे नाव कसे कमी होईल ते सांगावे
Question by संकेत
05-06-2017
sanketgujar@gmail.com
आदरणीय साहेब, आपण आपल्या कामांमधुन वेळात वेळ काढुन देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. माझा पुढील प्रश्न पुढीलप्रमाणे – संपादित जमीनीचा मोबदला देण्यात येतो त्यापैकी अर्धवट रक्कम स्विकारलेली आहे आणि अर्ध्या रकमेचा एक भाग न्यायालयात आणि एक भाग इन्कम टॅक्स विभागात जमा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सदर जमीनीचा शासनातर्फे केवळ कब्जा घेण्यात आलेला नाही म्हणुन, सदर मिळकत भुसंपादन कायदा -१८९४, कलम ४८ पोटकलम १ अन्वये मुळ मालकाला परत देता येउ शकते का तशी कायद्यामध्ये तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती..
मूळ मालकाला जमीन परत देता येणार नाही कलाम ११ खाली निवडया नंतर जमीन govt. ची होते
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by महेश पाटील
03-06-2017
mytoday121@gmail.com
महोदय , आमचे ७/१२ वर ०.१५ हेक्टर शेत्र पोटखराब आहे , तथापि सध्या संपूर्ण क्षेत्र बागायती आहे , तरी पोटखराब क्षेत्र बागायती म्हणून वर्ग करता येईल का ?
सहा . संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा व आदेश प्राप्त करून घेणे
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by गणेश shinde
02-06-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,महा margalagat seva rasta सोडणे आवश्यक आहे का?tyababt काही शासन nirnay आहे का? krupaya margdarshan होणेस विनंती...
Question by प्रदीप बोरले
02-06-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,एका शेतकऱ्याने अनोंदणीकृत आपसी वाटणीपत्राने शेतजमीन दोन मुलाचे नावे करून दिली.ज्या तारखेस अनोंदणीकृतआपसी वाटणीपात्र तयार करून दिले त्या तारखेस त्याचा सदर शेतजमीन वरील मालकी हक्क संपुष्टात येईल काय? किंवा मुले त्या तारखेस सदर शेतजमिनीचे मालक झाले असे समजण्यात येईल काय? यास कायदेशीर आधार आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.
वाटप पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक . अनोंदणीकृत असल्यामुळे , वडिलांचे मालकी हक्क संपुष्टात येणार नाहीत .
Section 17 (b ) of Indian Registration Act *
non-testamentary instruments which purport or operate to create, declare, assign, limit or extinguish, whether in present or in future, any right, title or interest, whether vested or contingent, of the value of one hundred rupees and upwards, to or in immovable property;
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रीकांत माणसे
01-06-2017
shrikant.bhanse@yahoo.com
नमस्कार सर ,
माझ्या वडिलांनी ८ वर्षा पूर्वी एक जमीन खरेदी केली आहे . तसेच सर्व कागद पत्रे त्यांच्या नावी आहेत.ती जागा भाडे तत्वावर गेली ९ वर्ष दिली आहे . पण त्याचे भाडे अग्रीमेंट बनवले नाही . ते आदिवासी आहेत . . आता भाडेकरू ती जागा हडप करू पाहत आहेत . तर ते शकय आहे का . कृपया मार्गदर्शन करावे .
कलम ३६ अ प्रमाणे , आदिवासी कडून बिगर आदिवासींकडे भोगवटा हस्तांतरण करण्यावर निर्बंध आहेत . आदिवासी खातेदार हे भाडे करार शिवाय , जमिनीवर कब्जा करून कास्ट आहेत . त्यामुळे ते अतिक्रमणदार आहेत . आदिवासी भाडेकरू महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे , भोगवताधारक होऊ शकत नाही . त्या मुळे कलम ३६ अ अथवा आदिवासी जमीन प्रत्यार्पण कायदा लागू होणार नाही .
Adverse possession ने मालकी सिद्ध करण्याकरता , जमिनीचा ताबा १२ वर्ष किंवा त्या पेक्षा जादा काळ , जमीन ज्याचे ताब्यात आहेत त्याचे कडे असणे आवश्यक आहे
आपण The Specific relief Act खाली , आदिवासी भाडेकरूस जमिनीतून काढून टाकणे बाबत , दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र शिवदास शिंदे
31-05-2017
vickysss40@gmail.com
३ एकर जिरायत शेती पैकी आम्हाला एक एकर शेती घायची होती. परंतु खरेदी करण्यासाठी कार्यालयामध्ये गेलो असता आम्हाला कळले कि एक एकर शेतीची खरेदी होत नाही त्या मुले ३ एकर शेती ज्यांच्या नावे होती (गैर आदिवासी) यांनी त्यांची पत्नी (गैर आदिवासी ) व माझी आई (आदिवासी) च्या नावे सामाईक ३ एकर शेतीची खरेदी करून दिली. सदर खरेदीची नोंद तहसील / तलाठी कार्यालयामध्ये झालेली आहे. परंतु आमहाला फक्त १ एकर शेती घायची होती . आता आम्हाला फक्त १ एकर शेती आमच्या नावे स्वतंत्ररित्या करण्यासाठी काय करावे लागेल
कृपया मार्गदर्शन करा.
धन्यवाद !!!
१ एकर जिरायत जमीनीची खरेदी करण्यावर निर्बंध नाही . तथापि आपण ३ एकर जागा दोघांमध्ये सामायिक खरेदी केली आहे . जर खरेदी खतात,प्रत्येकाचे क्षेत्र नमूद केले असेल , व आपले आईचे नावे १ एकर क्षेत्र असेल , तर त्या प्रमाणे नोंद मंजूर होईल . तथापि क्षेत्र नमूद नसेल तर दोहांचे नावे १.५ -१,५ एकर क्षेत्र दाखल होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
31-05-2017
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर , माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने मला न विचारता माझ्या शेतातून पन्नास मीटरची पाईप लाईन टाकली आहे सदरची पाईप लाईन टाकतांना मला त्याने विचारले नाही या बाबत मला त्याच्यावर काय कार्यवाही करता येईल
तहसीलदार यांची कलम ४९ खाली ( म.ज. म.अ १९६६ ) खाली परवानगी घेतली नसेल तर , आपण pipe line काढून टाकू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
30-05-2017
pradip.borle6226@gmail.com
पती व पत्नींमध्ये उपनिबंधक ह्याच्याकडे आपसी घटस्फोट झालेला आहे.दोघांना एक मुलगा आहे.मुलगा आईकडे राहतो.आईच मुलाचे पालनपोषण व शिक्षण करते.मुलाचे शैक्षणिक कामासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( कास्ट,डोमिसाईल,इनकम, नॉन्क्रीमीलेयर,व इतर दाखले ) काढावयाचे आहे.पत्नीचे नावाने वरील कागदपत्रे तयार करता येईल काय ?याबाबत कायदेशीर तरतूद आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by प्रदीप बोरले
30-05-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,भूमिहीन व्यक्तीला जमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीर काय तरतूद आहे? कृपया मार्गदर्शन करावे.
भूमिहीन व्यक्ती , शेती कारणासाठी प्रचलित कुळकायदा तरतुदी नुसार , जमीन खरेदी करू शकत नाही .
शेत जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात परंतु अश्या व्यक्तीचे इतर मार्गाचे उत्त्पन्न १२००० -वार्षिक पेक्षा जादा असता कामा नये . सध्याचे परीस्थित १२००० पेक्षा कमी वार्षिक उत्त्पन्न असणे दुरापास्त
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
30-05-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये संपादन केलेली जमीन,जर जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनासाठी होत नसल्यास,मूळ जमीन मालकास जमीन परत देण्याची तरतूद आहे काय?कृपया मार्गदर्शन करावे.
जमिनीचा औद्योगीक प्रयोजनासाठी वापर केला नसल्यास , अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी करून , जर आवश्यक असेल तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जाडा दिली जाते . अन्यथा जाहीर लिलावाने जागा विक्री केली जाते . मूळ मालक लिलावात सहभागी होऊ शकतात . मूळ मेकांना परत देण्याची तरतूद नव्या भू संपादन कायद्यात आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश पाटील
27-05-2017
88prakashp@gmail.com
७/१२ भोगवटा सदरी रेषेच्या वर सरकार असे नाव व त्याच्यापुढे त्याचा फेरफार क्र.आहे.रेषेच्या खाली इतर खातेदारांची नावे आहेत.आशा ७/१२ साठी भूधारणा पद्धत कोणती निवडायची?
जमीन जर सरकारी असेल तर , इतर खातेदाराची नवे ७/१२ वर असण्याचे कारण काय आहे ? जुने फेरफार पाहून , अधिउकर अभिलेख अद्यावत करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
24-05-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या जागेत इमारतीचे बांधकाम चालू असताना गौणखनिज उत्खनन केल्यास त्याबाबतचा का.तलाठी यांनी पंचनामा करतेवेळी मूळ मालक किंवा त्यांचा प्रतिनिधी यांची उपस्थिती आवश्यक असते का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
मूळ मालक किंवा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे . त्यांना आगाऊ सूचना देणे आवश्यक . जात ते जाणूनबुजून हजर नसतील तर , पंचांचे उपस्थित पंचनामा करण्यात यावा . पंचनाम्यात , मालकांना नोटीस दिल्याचे व ते गैर हजर राहिल्याचे नमूद करावे . सादर बाब पंचांचे हि निदर्शनास आणून द्यावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
24-05-2017
ngpatil@rcfltd.com
नमस्कार साहेब . देवस्थानची शेतजमीन आमच्या ताब्यात आहे.सदरील 7/12वर इतर हक्कात साधे कूळ व सरंक्षित अशा दोन्हीही ठिकाणी आमचीच नावे लिहिली आहेत व 4 ट्रस्टीची नावे आहेत ती 50-60वर्षे जुनी आहेत. माझा आपणास असे प्रश्न आहे की साधे व सरंक्षीत कूळ अशी दोनवेऴा नावे का लिहिली व त्याचा आम्हास पुढे कायदेशीर फायदा मिळू शकेल का ?दूसरे ट्रुस्टि म्हणून जी नावे दाखल केली होती ते व त्यांची मुले मयत झालेली आहेत.अशावेळी त्यांचे नातू वारस म्हणून दाखल करू शकतात क? तिसरा प्रश्न असाकि देवस्थान नावे कमी करण्यासाठी काय करता येईल? वा धर्मादाय आयुक्ताकडे त्यासाठी अर्ज करता येईल का?कारण देवस्थान विक्रीस स्थगित असा कोठेही शेरा दिसून येत नाही.कृपया पूर्ण मार्गदर्शन केले तर बरे होईल साहेब.
या पूर्वीची उत्तरात खालील दुधर्न वाचण्यात यावी . जर णयासाचे सर्व उत्पन्न , ण्यासष्ठी वापरले जात असेल तर , अश्या जमिनीची कुळाचे लाभत विक्री होऊ शकणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
साधे कुल किंवा सौरिक्षीत कुल असे एकच नोंद इतर हक्कात असणे क्रमप्राप्त आहे . दोन नोंद असतील तर , फेरफार पाहून , योग्य तो नोंद ठेव्याची कार्यवाही करावी .
जर ट्रस्ट नोंदणीकृत असेल तर , विश्वस्त मयत झाल्यावर / राजीनामा दिल्यावर कोणाची नावे लावायची या बाबत , सार्वजनिक न्यासाचे घटने मध्ये तरतूद असते . त्या प्रमाणे विश्वस्तांची नावे लावली जातात . कृपया उक्त न्यासाचे घटना पहा .
देवस्थान जमिनीची कुळाचे नावे विक्री होऊ शकते . तथापि , सर्व उत्पन्न न्यासाचे कामासाठी उपयोगात आणले जाते असे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांनी दिलेले असणे आवश्यक
मा. धर्मदाय आयुक्त यांनी मालकांना म्हणजे न्यासाला जमीन विकण्याची परवानगी देणे आवश्यक तरच न्यासाचे नाव कमी होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
22-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, कार्यालयीन अभिलेख वर्गीकरणाची तत्वे, अभिलेखाचे वर्गीकरण करण्याची पध्दत, अभिलेख जतन करण्याचा कालावधी किती, ड वर्ग अभिलेख नष्ट करण्याची कार्यपध्दती, अ,ब,क,ड यादी या सर्व बाबींची माहिती मला घ्यावयाची आहे. त्यासाठी मला कोणत्या कायद्याचे किंवा शासन निर्णयाचे वाचन करावे लागेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. आणि याबाबत आदरणीय महोदय आपल्याकडे PDF स्वरुपात माहिती उपलब्ध असल्यास कृपया करुन मला ई-मेल व्दारे सदर माहिती पुरवीण्याची कृपा करावी. ही नम्र विनंती.
या पूर्वी A , B, C, D list अभिलेखांचे जतनाबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत . तथपि या लिस्ट सध्या स्थितीत , तेवढ्या उपयोगात येऊ शकत नाहीत . काही प्रमाणात काळ बाह्य झाल्या आहेत .
शास्नानाने , Maharashtra Public Records Acts संमत केलेला आहे . या कायदयानुसार प्रत्येक विभागाने , retention schedules बनवण्याचे आहेत व त्यास संचालक पुराभिलेख महाराष्ट्र शासन यांची मान्यता घेण्याची आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी फटांगरे
22-05-2017
shivajiphatangare@india.com
नमस्कार सर ,
विषय - ७/१२ वरील कुळ कमी करण्याविषयी
सर माझा प्रश्न असा आहे कि माझ्या ७/१२ वर इतर अधिकारात नोंद - कुळ दत्तात्रय अ.पा.क. ( xxx ) शाम मनोहर गीते यास ( xxx )
कु.का.क. 32 ग. ( xxx ) प्रमाणे खरेदीचा हक्क नाही ( xxx )
असा शेरा असून आताचे कुळ शाम मनोहर गीते यास यांच्या पूर्व संमतीनुसार ७/१२ वरील इतर अधिकारातून कुळ कमी करावयाचा आहे तरी त्याबद्दल कायदेशीर सल्ला मिळावा हि विनंती . सरकारी मूल्यांकन रु- ५ लाख असून कायदेशीर खर्च किती येईल या विषई मार्गदर्शन करावे हि विनंती .
शाम गीते हे केवळ अज्ञान पालन करते आहेत . त्यांचे नावे किंमत ठरू शकणार नाही अथवा त्यांचे संम्मतीनेही कुळाचे नाव कमी होणार नाही . कुल दत्तात्रय , जर संज्ञांन झाला असेल तर , त्याचे नावे ३२ ग किंमत निश्चित होणे आवश्यक व ती होईल .
कुलास कुळहक्क मालकाचे लाभात सोडून देण्याचा असल्यास , प्रथम The Hindu Minority and Guardianship Act खाली दिवाणी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
21-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, नस्तीबद्ध झालेल्या प्रकरनांचा त्रिअक्षरी क्रमांक खाली दिलेला आहे.
LND-२०
TRS-१६
NAP-३४
LND-४१
LEN-३९
NAA-४६
या सर्व प्रकरणांना अभिलेख कक्षात जतन करून ठेवान्याचा कालावधी किती वर्षाचा आहे? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by पंकज कागणे
21-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भूसंपादन अधिनियम 1894 नुसार माननीय जिल्हाधिकारी यांचे कडून भूसंपादनाचा निवाडा घोषीत करण्याची कार्यवाही कशाप्रकारे केली जाते? या बाबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायद्यातील तरतुदीसह योग्य मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.
पंकजजी एखादा जुना निवाडा वाचा .
भू संपादन प्रकरण नसती वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अविनाश शिंदे
19-05-2017
avinashshinde32@gmail.com
namskar सी र मी अविनाश शिंदे
माझा प्रश्न तलाव गाळ पेर संभंदी आहे
मी २०१५ साली एका व्यक्ती कडून ३.२७ आर जमीन घेतलीय त्या मालकाची सादर गटशेजारील ३ .१ आर जमीन पाझर तलाव मध्ये गेली आहे त्याचा त्याना शासन मोबदला मिळाला आहे परंतु त्य्नाच्या म्हणणंय नुसार त्याना त्या जमिनी मध्ये गाळपेर करण्याचा हक्क आहे .असे त्यानं मला खरेदी खाता मध्ये लिहून दिले आहे
सादर दोन्ही जमिनीचे मूळ मालक एक आहे
१)आसा हक्क असतो का ?
व तो हस्तनतरीत होतो का ?
२)गाळपेरीचा नेमका अर्थ काय
३)गाळपेरीचा शासन निर्णय आहे का
४) गाळपेर कायदा असेल तर मार्गदर्शन kara
-संबंधित कायर्कारी अभियंता दरवर्षी लीजवर ती जमीन मंजूर करू शकतो .गाळपेर हक्क मिळणार नाही
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
