जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर , आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे नेहेमीच होणार मानसीक त्रास कमी झाला आहे. माझ्या वडिलोपार्गिट गावी शेती आहहे मी दत्तक पुत्र आहहे ,वडील जिवंत असताना तयांनी माझ्या नवे काही जमीन केले त्या नंतर ते मयत झाले माझ्या आई ने व मुलींनी वडिलांचा नवे असलेल्या जमिनीवर माझे नवा ना लावता मला ना विचारता ती पुतीन जमीन विकून याकाळी मी दिवाणी नाय्यलात अपील करून त्या वर स्टे आणला पुढे ताडझोड होऊन हुकूमनामा झाला माझ्या आई ने व बाहीने ती जमीन विकून घेतलेले रुपया खर्च केले त्या मुले जमीन विकत घेतलेले विक्तिश ते रुपये मी परत दिले व त्या बदल्यात आई व बहिणिचाकडून कोर्टातच हाक सोड पत्रं हिऊन घेतले व दिवाणी न्यालयात हुकूमनामा झाला कि ती विकलेली जमिनीवर केवळ माझ्याच हाक राहील . पुढे वारंवार तलाठीच्या बदली मुले माझेनावे ७/१२ वर नोंद होऊ शकली नाही त्या कालावधीत ती जमीन पुन्हा विकली गेली व दस्त नोंदणी साठी तलाठी यांच्याकडे अल्ला मी त्याला विरोध केला ,व त्या विऱोयुद्ध तलाठी ,सर्कल,ताशिलदार यांच्याकडे माझा नोंदणी साठी अराझकेला व खूप परतनाने माझी नोंद झाली ७/१२ वर पण झणी ती जमीन पुन्हा विकत घेतली त्यांनी उपविबकीय मॅडम कडे त्या विरुद्व ती नोंद रद्ध करण्या साठी अपील केले व त्यांनी ते मान्य हि केले कागदी पुरावा नसताना आता पुढे मी काय करू माझी नोंद रद्ध करा तो फेरफार रद्ध झाला आहहे असा निकाल दिला आहहे.कृपया मायेंग्दर्शन करावे.मी दुसऱ्या कोणाची जमीन घेत नाही माझी जमीन मलाच परत मिळत नाही असा कसा न्याय होऊ शकतो.फुडें काय करावे लागेल कृपया सांगा माझे नाव कमी करून ते फेरफार रद्ध करून दस्त झालेल्या विक्तिचे नाव लगेच लावतील.
उपवि भागीय अधिकारी मॅडम यांचे आदेशाविरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by संकेत
14-10-2017
Sanketgujar@gmail.com

नमस्कार सर, ना.ज.क.धा. १९७६ अंतर्गत जमीन शासनाने ताब्यात घेतलेली आहे, सादर बाबतीत शासनाने पेमेंट साठी नोटीस काढलेली आहे व मालकाने नोटीस स्वीकारलेली नाही परंतु त्या नंतर मालकाने आजतागायत संपादित मिळकतीचा मोबदला स्वीकारलेला नसून नियमाप्रमाणे सदर मोबदला युएलसी ने कोषागारात अथवा कोर्टात देखील जमा केला नसल्याचे दिसून येते तरी याबाबत नवीन २०१३ कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला मागता येणे शक्य आहे का??? कृपया मार्गदर्शन करावे.
LARR कायद्याच्या कलम २४ प्रमाणे , केवळ जुन्या भू संपादन कायद्याप्रमाणे अवॉर्ड जाहीर झाले नसेल अथवा निवडा ५ वर्षापेक्षा जादा कालावधीपूर्वी , नवीन कायदा अस्तित्वात अळ्यापूर्वीपासून जाहीर झाला आहे पण जमीनच ताबा घेतला नसेल अथवा नुकसान भरपाईची रकम वाटप केली नसेल तरच , नवीन कायद्याप्रमाणे , नुकसान भरपाई मिळू शकते
आपली जमीन Urban Ceiling Act संपादन झाली आहे त्यामुळे कलम २४ च्या तरतुदी लागू शकणार नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडेसाहेब
माझी बहिण FYBSc ला असताना तिचे नाव सारिका असे होते, नंतर तिने तिचे नाव बदलुन रुपाली असे केले आहे. व तसे राजपत्र सुद्धा तिने प्राप्त केले आहे. FYBSc च्या परीक्षा शासनाने कॉलेजकडे स्थानांतर केल्या असल्यामुळे तिचे गुणपत्रक सुद्धा सारिका नावाचेच म्हणजे पहिल्या नावाचे आले. नंतर SYBSc ला प्रवेश घेताना तिने तिचे नवीन नावानुसार प्रवेश घेतला आहे. व SYBSc चे तिचे सर्व गुणपत्रक सुद्धा नवीन नावानुसार आले आहेत. चालु वर्षी म्हणजे TYBSc ला प्रवेश घेताना FYBSc व SYBSc चे गुणपत्रकाची गरज असल्याने आम्ही ते दाखल केली होती. FYBSc च्या गुणपत्रीकावर सारिका असे नाव व SYBSc च्या गुणपत्रिकेवर रुपाली असे नाव असल्याने विद्यापिठाने तिला चालु वर्षी TYBSc ला प्रवेश देण्यास नकार दिला आहे. राजपत्र दाखल करून सुद्धा विद्यापीठ ते मानण्यास तयार नाही आणि नाव बदलाबाबत कवरिंग लेटर मागत आहे. कवरिंग लेटरबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. विद्यापीठाच्या परीक्षा चालु होण्यास १ महिना कालावधी आहे आणि तोपर्यंत माझ्या बहिणीचे एडमिशन होणे अतिशय गरजेचे आहे परंतु विद्यापीठ राजपत्र मानत नाही व तशी लेखी पण देण्यास तयार नाही. तरी आम्ही सध्या काय करावे.
१. विद्यापीठाचे उत्तर योग्य आहे का ?
२. विद्यापीठ शासनाचे राजपत्र मानण्यास नकार देऊ शकते का ?
३. आम्हांला मा. उच्च न्यायालयात गेल्यास लवकरात लवकर न्याय मिळेल का ?
४. अन्य काही उपाय असल्यास माहिती देण्यात यावी.
विद्यापीठ ग रेजिस्ट्रार यांना भेटा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

निवासी झोन मध्ये तुकडेबंदी कायदा लागू नाही उत्तर दिल्याबद्दल आपले धन्यवाद सर त्यामधील नवीन कायदेदुरुस्तीची प्रत मिळेल का
शासन संकेत स्थळावर , ए gazzte पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?
१. जमीन संपादन संस्थेचे नवे ७/१२ सदरी दाखल असेल , त्यामुळे आपले नाव्७/१२ सदरी लावता येणार नाही
२. आपणास भावांकडून रक्कम ( बहिणीचे हिस्स्याची ) परत मिल्ने बाबत न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
३.वरील दोन प्रमाणे . अन्य मार्ग नाही
४.हो . त्य्नाचे विरुद्ध आपण गुम्हा दाखल करू शकता . मात्र तीन बहिणीही वारस असले बाबत , न्यायालयाचा legal heirship प्रमाणपत्र काढून घ्या
५. त्यांचे मार्फत आता कारवाई साठी विलंब झालेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Respected Panbude Saheb,
Thanks for earnest reply to my previous querry regarding wrong name being wriiten on sale deed for the year 1988. Sir,let me bring to your kind notice that this land was incidentally found while searching on mahabulekh website. In our family nobody was ever aware that we might own piece land.
In late Nov’2016 ,my uncle came asking for signature for waras nond for land which initially was 8Hectare and now only 2241 m2 remaining which is reserved for school..
That is when we started searching. Otherwise we all brothers by GODS GRACE are educated and earning bread and butter.
Sir ,My question is for this piece of land which is 1acre (Now 2054 m2 still remaining ) .This land comes under NA JA KA MA dharna KAYDA.Perhaps it is Land ceiling act .If for this NA JA KA MA dharna kayda ,permission has to be taken from collector prior to selling of land , then how come these kind of irregularities happen which for a lay man like me( in land matters) though engineer by profession make feel disappointed . If 32 years is a big span, but what about procedures being followed in old days. Just because everything has gone online and I am getting information with 3G speed which my father never got . we have done waras nond in march 2017 for this 2054 m2 land .Seeing those sale of 1988 ,I found that somebody else surname is also wrongly written which is duly corrected with signature on side.
With all due respect and full faith in judiciary ,I kindly ask Sir, How do I find out that Mr Baban of sale deed was only Mr Bhagwan and nobody else.
Thanks
Regards,
Hemant
महोदय,
नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार शासनाचे दि १२ मे २०१५ चे आपसी वाटाघाटीने थेट खरेदीचे परिपत्रकानुसार संपादन संस्थेने जमीन खरेदी केल्यास भूसंपादन अधिकाऱ्यास दि १९ मार्च २०१४ चे राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क सदर संपादन संस्थेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.
थेट खरेदीसाठी ३ % आस्थापना व ३ % सेवासुविधा अनुज्ञेय नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर
1) तलाठी यांना ७/१२ वर कूळ दाखल करण्याचा अधिकार ,३२ग ची किंमत निश्चित करण्याचा व पिकपाहणीस नाव लावण्याचा अधिकार आहे का? असेल तर ते कायदेशीर आहे का?
२) एका sarve nanbar cha ७/१२ ओंलीने उपलब्ध नाही व तसेच तहसील मधेही त्याचा रेकॉर्ड नाही पण नकाशा मध्ये ते क्षेत्र व सर्वे नंबर नमूद आहे तरी नवीन ७/१२ ऑनलाईन यावा ह्यासाठी काय करावे लागेल ?
३) नोटीस नाही आली हा विलंब माफीसाठी कारण होऊ शकतो का?
4) जमीन मालकास नोटीस न पाठवता कुळ दाखल करता येतो का व ३२ग किंमत निश्चित करता येते का?
5) एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी जमीन विकली असेल तर त्याच्याच वारसांच्या ताब्यात ती जमीन असेल तर कुळ दाखल करता येते का?
मागील प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद,,
१. नाही
२.आकारबंद मध्ये उल्लेख आहे का ?
३.हो .मात्र आपणास नोटीस मिळाली नाही हे सिद्ध करावे लागेल
४.नाही
५.नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
१) भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी ,४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनी kulkaydyat milalelya जमिनी कोणतीही शासकीय अथवा प्रांत यांचेकडून परवानगी ना घेता खरेदी विक्री झालेला व्यवहार रद्द करणे साठी काय करावे लागेल?
२) तसेच परवानगी ना घेता केलेले खरेदीखत कायद्यात मान्य आहरे का?
३) कोणतीही परवानगी ना घेतलेल्या कुलकायद्याच्या जमिनीची विक्री झालेली आहे तर आता परवानगी घेता येईल का ? कि झालेल्या व्यवहाराला कायद्यात काहीच किंमत उरलेली नाही ?
१. ३२ ग अन्वये विक्री किंमत निश्चित होऊन १० वर्षे झाले असतील तर , विक्री परवानगी घेण्याची आवश्यकता नाही .
२.जर १० वर्षापेक्षा कालावधी कमी असेल व विना परवानगी विक्री केली असेल तर , महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क क अन्वये कारवाई करणे आवश्यक
३.परवानगी न घेता विक्री झाली असल्यास अनु क्र २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करणे आवश्यक .
मात्र सुधारणा कायद्यानुसार , दंडात्मक कारवाई करून , व्यवहार नियमानुकूल करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला माझ्या काकाच्या नावावरील ०.५(अर्धा गुंठा) जमीन माझ्या नावे करायची आहे परंतु तलाठी म्हणतात कि, हयातीत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसा हक्काने वाटप करता येत नाही. ती नोंदणी कार्यालयातून नोंदणी करावी लागते. खरे काय आहे सांगावे?
आदरणीय सर,
पिंपरी चिंचवड हद्दीत बांधकाम परवानगी कामी एखाद्या बांधकाम व्यावसायिकास १ कोटीपेक्षा जास्त रक्कम चलनाद्वारे भरावयाची आहे.(१ महिन्याच्या आत)परंतु आर्थिक मंदी असल्याने सदर रक्कम ते आज रोजी भरू शकत नसल्यास त्यांना २/३ महिन्याची मुदत मिळू शकते का?किंवा कसे?त्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली संधी वापरुन दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळाले व तो कर्मचारी परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % पेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी सदर परीक्षा उत्‍तीर्ण होईल का सर? याबाबत मार्गदर्शन करावे सर खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर , कृपया मार्गदर्शन करावे ,
मी आदिवासी या जमातीचा असून , वडिलांनी ( मयत ) मागील २० वर्षांपूर्वी गैर आदिवासी असलेल्या व्यक्तीस २०००/- मध्ये २ एकर शेत जमीन विकली होती...हा व्यवहार तोंडी झाला होता, ७/१२ मध्ये आज हि आमची नवे आहेत. गैर आदिवासी व्यक्ती चा ताब्यात असलेली जमीन मला परत मिळण्यासाठी काय करता येईल याबाबाबत मार्गदर्शन करावे .
जमीन restore करून मिळण्यासाठी दावा दाखल करा ( तहसीलदार यांचे कडे - जिल्हाधिकरी यांचे अधिकारी तहसीलदार यांना दिले आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ या अधिनियमानुसार जमिनीचे भूसंपादन केल्यास दि १९.०३.२०१४ चे शासन राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क घ्यावयाचे आहे.परंतु शासनाचे दि.१२.०५.२०१५ चे आपसी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने जमीन घ्यावयाचे परिपत्रकानुसार जमीन असल्यास घ्यावयाचे असल्यास ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क संपादन यंत्रणेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.
१२.०५ २०१५ चे परिपत्रकानुसार सेवाशुल्क व आस्थापना शुल्क घेण्याची तरतूद नाही . तशी तरतूद करून घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुरज
05-10-2017
surajpawar7691@gmail. com

आदिवासी जमिनीचे 1982,1983 व 1996 रोजी बेकायदेशीर पणे हस्तांतरण झालेले आहे तरी सदर जमीन परत मिळेल का ?
व कोणत्या अधिनियमानुसार?
आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणात जिल्हाधिकारी नंतर महसुल न्याय प्राधिकरण नंतर अपिल कोठे करावे?
अपिलाची तरतूद नाही . वरील याचिकेद्वारे आपण MRT चा निकाल आव्हानात करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pravin
04-10-2017
bansodepravin333@gmail.com

जर का चुलती ने जमीन पुतण्याच्या नावी केली असेल (अर्ज केला चुलती ने ) तर चुलतीचे मयत झाले व तीची मुलगी पण, चुलतीची मुलीची मुलगी आहे? तर त्या मुलीचे काही चालेल का?
मुलीची मुलगी हि चुलतीची वर्ग १ वारस आहे ( चुलतीची मुलगी मयत असल्याने ) . मिळकतीत चुलतीच्या मुलीच्या मुलीचाच हक्क आहे . पुतण्याचा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by suhas patil
04-10-2017
suhasp075@gmail.com

hello sir,
maze nav suhas patil. maza question asa hota ki,
1) 7/12 utaryvar tukadebandi virudh vavahar asa jo shera asto tych arth kay ?
2) 7/12 utaryvar kul kayada virudh vavahar asahi shera asto tychahi arth kay ? tasech
3) avibhajit satta prakarane asa jo shera asto tycha arth kay asto ?
please mala reply dy...

thank you
१.प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करण्यावर महा तुके जोड व तुके बंदी कायद्याने निर्बंध आहेत . हे प्रमाणभूत क्षेत्र जिल्ह्यावर वेगवेगळे आहे .
साधारणपणे बागायत क्षेत्रासाठी - ५ गुंठे
एकपिकी जमीन -१५ गुंठे
वरकस जमीन -२० गुंठे
या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री झालेली असल्यास , अश्या क्षेत्राची नोंद मंजूर करता येत नाही . तथापि अश्या नोंदी मंजूर करून इतर हक्कात तुकडे बंदी कायद्या विरुद्ध व्यवहार असा शेरा लिहलेला आहे
२. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी , खरेदी करणारा , शेतकरी असणे आवश्यक आहे . २०१६ पूर्वी जर , बिगर शेतकरी व्यक्तीने जमीनखरेदी केली असल्यास , महाराष्ट कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क अन्वये कारवाई करण्यात येत असे व अशी जमीन शासन जमा केली जात असे . अशी नोंद नामंजूर करणे आवश्यक आहे . मात्र अश्या हि नोंदी मंजूर करून , भोगवटादार सादरी खरेदीदाराचे नाव दाखल करण्यात आले आहे व इतर हक्कात कुल कायद्याचे तरतूद विरुद्ध व्यवहार अशी नोंद घेण्यात आली आहे
३. अविभाज्य सत्ता प्रकार - सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय ज्या जमिनीची विक्री करता येत नाही अशी जमीन . अशी जमीन शासनाने प्रदान केलेली असते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by suhas patil
04-10-2017
suhasp075@gmail.com

namaskar sir,
mi suhas patil maze gav -gudal,tal-radhanagari ,dist-kolhapur
sir amchi kul kayada 43 navin shart ashi shera aslele 24.5 guntha jamin aaahe.
amchy ajobanche don bhau aahet . tyveli amchy ajobani ty doghana prateki 24.5 guntha ashi jamin amchi bhogavata varga-1 aslelei jamin vatani mhanun dili .aani aplyala kul kayada vahivat aslelei varga-2 chi jamin theun ghetali .
tyveli tyna kahi mahit nhavate. pan aata amhala te navavar karata veli samjl.
pan hi jamin actual amchy ajobani kasali mhanun milali aahe na?
te don bhau sheti karat nahit city madhe ahet .
mag amchi vadiloparjit jamin ti tar ty don bhavani ghetli aani aata ti tynchy navavar aahe 7/12 la nond aahe.
amche ghar v parisar ase amche 10 guntha area aahe. tyna ase vatate ki aamhi ti 24.5 kul kayadychi jamin + 10 guntha gharachi jamin ghetli mhanun te aata gharachy 10 guuntha madhil vatani magat aahet .
mag ti kul kayady chi jamin ty vatanicha ek bhag aahe ki nahi. he sanaga . ti jamin amchy ajobancy navavar aahe tyci tyveli ty jaminiche 30 % rakam bharali hoti sarakarla . mag aata te don dhau vatni magatat te barobar aahe ki worg te sanga.please ghar hi amchy ajobancy navavar aahe. te legali kahi karu shakat nahit na. don bhau. please sanga ....yavar kay karayche te
जमिनीची किंमत आजोबांचे नावावर निश्चित झाली म्हणजे , जमीन एकट्या आजोबांची होत नाही . या जमिनीस कुल म्हणून कोणाचे नाव लागले होते हे महत्वाचे . जर उपरोक्त जमिनीस , आजोबांच्या वडिलांचे म्हणजे पंजोबांचे अथवा आजोबांचे ए कु मॅ म्हणून नाव लागले असेल तर , त्या दिन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वर्षांचा मिळकतीवर हक्क आहे . मात्र जर केवळ आजोबांचे वैयक्तिक क्षमतेत नाव लागले असेल तर , त्या दोन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वारसांचा हक्क नाही .
तसेच जे वाटप झाले होते त्या मध्ये , अशी जमीन जमिनीची वाटणी असेल असा उल्लेख असणारा दस्त बनव्याण्यात आला होता का ? असा दस्त असेल तर , आपण त्यांचे मागणीकडे लक्ष्य देण्याचे कारण नाही . मात्र असा दस्त नसेल तर , मात्र , उद्या त्यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास , न्यायायलायचे निकालालप्रमाणे , आपणास कदाचित या जमिनीतील त्यांचा हिस्स्याचे क्षेत्र द्यावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर सरळ प्रश्न आहे ग्रामपंचायतीत झालेल्या जागेच्या वाटण्या ग्राह्य असतात का व वाटण्या झाल्यावर pr कार्ड ला पुन्हा वाटण्यावरून वाद होऊ शकतात का कारण pr कार्ड ला अजून जुनीच नोंद आहे ग्रामपंचायत नमुना न. ८ मालकी पुरावा असतो कि नसतो कारण पूर्वी लोक ग्रामपंचायत ला वाटण्या करत होते ना कि भूमी अभिलेख ला त्यांनी वाटण्या केल्या पण आता ते जिवंत नाहीत आणि pr कार्ड ला नोंद जुनी आहे आता कोणती वाटणी खरी आहे ?
२.ज्याने त्याने वाटण्या झालेल्या जागेवर घर बांधून गेले २० वर्ष महसूल भारत आहे तर आता pr कार्ड वरून वाद कसा होऊ शकतो
३.दोन्हीकडे फेर का होतात मग खरा कोणता आजही लोक ग्रामपंचायत ला जागेच्या वाटण्या करतात त्या कायदेशीर असतात का ?
४.आपण ज्या जागेचा घरपट्टी म्हणून कर भरतो तो मालकाच्या नात्यानं भरतो मग पुन्हा pr कार्ड ला वारसा करून वाटण्या करण्याचे कारण काय?
मी कोर्टात दाद मागू शकतो का ?
आपले गाव शहर सर्वेक्षण झालेले आहे . ग्राम पंचायत मध्ये कर आकारणी नोंदवही असते . त्या मध्ये घर नम्बर नमूद असतो . आपण अससेसमेंट नोंदवहीला वारसांची नवे लागल्यावर , त्याच वेळी , मिळकत पत्रिकेस हि नाव लावणे आवश्यक होते . पण अद्यापही वेळ गेलेली नाही . आपण ज्या पद्धतीने अससेसमेंट नोंदवहीला वापर केलेले आहे त्या[प्रमाणे मिळकत पत्रिकेस नाव लावणे व त्याप्रमाणे वाटप करून , स्वतत्र मिळकत पत्रिका मोजणी करून घ्या .
सर्वांची संमती असेल तर , वाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय श्री संजय कुंडेटकर सर आपण मी विचारलेल्या प्रश्नाना बघावे योगय तो मार्गदर्शन मिळावा ह्या करीता विनंती ,,.
१) नमस्कार सर आमच्या जमिनीचा ७/१२ चा तहसीलदार मध्ये नाही रेकॉर्ड आणि ऑनलाईन सुद्धा नाही ,,पण त्या सर्वे नंबर चा घटबूक नकाशा मध्ये ते क्षेत्र आहे, व जुना विकत घेतल्याचा सुद्धा पुरावा आहे, तर नवीन ७/१२ मिळणेसाठी काय करावे लागेल?
२) ७०ब अन्वये ताबा सिद्ध करणेसाठी कोणता पुरावा सक्षम व कायदेशीर असेल.
३) ४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनीची विक्री २०१० साली कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर विक्री झाली आहे , हि झालेली विक्री रद्द करणेसाठी काय करावे लागेल?
४) ७०ब चा अर्ज केल्यानंतर माननीय श्री तहसलीदार कायदेशीर चौकशी करणेसाठी शेतजमिनीवर लागवड कोणी केली हे बघण्यासाठी स्वतः येऊ शकतात का? येण्यासाठी विनंती केल्यावर येऊ शकतात का? आपण मार्गदर्शन करावे विनंती ,,.
आपण जनसामान्यांसाठी ही वेबसाईट सुरु केल्याबद्दल मनपूर्वक आभार ..
१. ७/१२ नसेल तर केवळ गटबुक नकाशा असून उपयोग नाही .
२. ७० ब आपण महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ७० ब चा उल्लेख करत असाल तर , हे कलम हा कायदा प. महाराष्ट्र , कोंकण व खान्देश अथवा उत्तर महाराष्ट्र यास जो लागू आहे त्या अनुषंगाने आहे असे समजून मी उत्तर देत आहे .
या कलमाद्वारे ताबा सिद्ध होत नाही अथवा ताबा सिद्ध करण्याचे कलम नाही . या कलमाद्वारे एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीची कुल /सौरिक्षीत कुल / कायम कुल आहे किंवा होती , हे ठरवण्याचा मामलतदार /तहसीलदार यांना अधिकार आहे .
या साठी आपण या कायद्याची कलम २(१८),२(५) ,२(६), ४ हे कलमे वाचा .
३. कलम ८४ क क प्रमाणे शर्थ भंग झाला म्हणून कारवाई सुरु करणे आवश्यक .
४.उपलब्ध पुराव्यावरून व्यक्ती मानीव कुल आहे कि नाही हे पाहण्याचे असते . स्थळपाहणी आवश्यक नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर

वर्ष १९२२ फेरफार क्रमांक ३४२ ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये कॉलम मध्ये होते , या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , या प्रकरणावर मला खालील दोन प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती

१) जर ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये आहे मग तो इतर हक्कामध्ये कसा गेले आणि या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , तर या वेक्तीचे नाव परत फेरफार क्रमांक ३४२ प्रमाणे १९५८ नंतर परत भोगवटाच्या कॉलम मध्ये कसे येऊ शकते .

२) ''अ '' या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले तर या वेक्तीचे नाव परत मालकी हक्का मध्ये येऊ शकते का .

आपण ७/१२ वर नमूद सर्व फेरफार पहा . त्यावरून आपणास कळून येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
एका व्यक्तीने 2010 साली जमीन विक्रीसाठी नोंदणीकृत साठेखत तयार करून दिले खरेदी घेणाऱ्याने त्यासोबत कुलमुखत्यार सुद्धा करून घेतले आणि २०१७ ला त्याने कुलमुखत्यार पत्र व साठेखतावरून खरेदीखत तयार केले आहे, ह्या प्रकरणात कायम खरेदीचा उल्लेख हा साठेखतात आहे , पण ज्याची जमीन आहे तो खरेदीखत साठी सह्या करायलाच गेला नाही, सध्या प्रकरणात केस चालू आहे ,कुलमुखत्यार पत्राद्वारे खरेदी देता येते का?
जमीनदाराळ त्याची जमीन परत मिळू शकते का? तो साठेखतात घेतलेली रक्कम परत करायला तयार आहे ,,मागील उत्तर बघितले कि साठेखताची मुदत फक्त ३ वर्ष असते ..मार्गदर्शन करावे ,,,
कुल मुखत्यार द्वारे , जमिनीची विक्री करता येते .
कुल मुखत्यार- पत्र म्हणजे , मालकाचे वतीने काम पार पाडण्यासाठी नेमलेली व्यक्ती .
जमीन परत मिल्ने अश्यक्य .
जर कुलमुखत्यार पत्र करताना फसवणूक झाली असेल तरच फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल करून खरेदी खत रद्द करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Chandu
01-10-2017
chandurameshshinde@gmail.com

नमस्कार सर , मी पाच
वर्षे पूर्वी ग्रामपंचायत हद्दी मध्ध्ये रजिस्टर अग्रीमेंट करून प्लॉट विकत घेतला. हे अग्रीमेंट माझ्या एकट्याच्या नावानी केले आहे , त्यात बायकोचे नाव नव्हते.मग ग्रामपंचायती कडून रीतसर परवानगी घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले . ग्रामपंचायतीना माझी कुठलीही पूर्व परवानगी नसताना बायकोचे नाव आठ अ वर टाकले आणी टॅक्स पावती वर टाकले.मी तक्रार केली असता ग्रामपंचायत म्हणते की तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही , आठ अ हा फक्त महसूला पुरताच आहे , त्या मुले कुणाची मालकी सिध्ध होत नाही. तसा
शिक्का देखील आठ्या वर मारून
दिला आहे. त्यांनी हेही सांगितले कि
तुम्ही एकटे रजिस्टर अग्रीमेंट करून घर कुणालाही विकू शकता.
प्रश्न १ - हे बरोबर आहे का ?
प्रश्न २ - पुढे मी हे घर विकल्यास नवीन मालकाचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ध्ये चढवण्यास बायको आडकाठी आणू शकते का ?

जर आपण खरेदी खतात पत्नीचे नाव टाकले असल्यास , पतींचेही नाव अससेसमेंट रजिस्टरला येणार . मात्र जर पत्नीचे नाव खरेदी खतात नसेल तर पत्नीचे नाव अससेसमेंट रजिस्टरला येण्याचा प्रश्न येत नाही . आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कडई पत्रक म्हणजे काय? त्यचा उपयोग काय? कडई पत्रक आजही बनवले जाते का?

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3