जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by विनायक बुवाजी पाटील
29-06-2017
Vbpatil96@gmail.com
न्यासाच्या (ट्रस्ट) जमिनीला कुल कायदा लागू होतो ka
न्यासाच्या जमिनीला कुल कायदा लागू होतो .
जर न्यासाचे उत्पन्न , न्यासाचे उद्दिष्ट साठी वापरण्यात येत असेल व न्यास नोंदणीकृत असेल तर फक्त किंमत ठरत नाही
कृपया कलाम ८८ बी वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by anilkumar shinde
28-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
विकत घेण्यावर निर्बंध नाहीत .
अश्या जमीनीचे ७/१२ वर इतर हक्क सदरी खालील नोंदी असतील
१. २२ या चौकशी वर प्रलंबित
२. वनेतर कामास बंदी
२२ या चौकशी अंती जे क्षेत्र पुनर्स्थापित केले जाते त्या ठिकाणी कब्जेदार सदरी नाव लावले जाते .
मात्र जे क्षेत्र शासन जमा होते , त्या ठिकाणी शासनाचे नाव लावले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat45@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या वडिलांचे सातबारा वरील नावात दुरुस्ती करायची आहे.
त्यांचे सातबारा वरील नाव मुकिंद आहे पण त्यांच्या काही रेकॉर्डला व माझ्या रेकॉर्ड ला मुकुंद असे नाव आहे तर मला मुकुंद हेच नाव ठेवायचे आहे
तसेच नावामध्ये काही प्रॉब्लेम असल्यास वडिलांनंतर माझे नाव वारस लावण्यास काही अडचणी येऊ शकतील का ?
कृपया उत्तर द्या.
आपण नाव दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat@gmail.com
नमस्कार सर,
माझा स्वतः मालकीचा चाळीमध्ये रूम असून तो मी भाड्याने दिला आहे याला ३ वर्ष झाली
परंतु मी त्याचे अग्रीमेंट / करार काही केले नाही तर ते करणे जरुरी आहे का?
तसेच १०० रु स्टॅप पेपरवर अग्रीमेंट करता येऊ शकते का ? त्याला रोटरी करणे आवश्यक आहे का ?
तसेच मी सध्या वाई येथे राहत असून माझा रूम भाड्याने दिला आहे तो बोईसर(पालघर) येथे आहे तर मी वाई या ठिकाणी अग्रीमेंट करू शकतो का ? मला बोईसर ला करावे लागेल ?
leave and license agreement करावे . ते नोंदणीकृत आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat45@gmail.com
महोदय,
सातबारा/जमीन विषयक माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्यासाठी - उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज करावा कि तहसिल कार्यालयात अर्ज करावा ?
७/१२ विषयी मंडळ अधिकारी यांना जण माहिती अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे . मंडळ अधिकारी यांचे कडे अर्ज
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat45@gmail.com
नमस्कार सर,
मी केशरी रेशनिंग कार्डधारक असून २ वर्ष झाले मला रेशनिंग कार्ड काढून पण अजून मला धान्य मिळत नाही
नवीन रेशनिंग कार्डधारकांना अजून धान्य सुरु झाले नाही असे तेथील रेशनिंग मालक सांगत आहे तरी मी यासाठी कोठे दाद मागावी
तसेच याबाबत माहिती अधिकारांतर्गत मी कोठे अर्ज करावा?
Question by गणेश शिंदे
26-06-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,महार वतनाची जमीन ९९ वर्षाच्या नोंदणीकृत भाडेकरकाराने घेता येते का? किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विंनती....
Question by विनायक बुवाजी पाटील
26-06-2017
Vbpatil96@gmail.com
एक व्यक्ती १९५४ पासून संरक्षित कुल aahe पण त्याचबरोबर मालकाने 1956 पासून ट्रस्ट ला (देवस्थान न्हवे) jaminiche मालकी अधिकार दिले आहेत .तर ti vyakti जमिनीचे कुल कायद्यानुसार मालक ahe का ?
मालकी हक्क दिले आहेत म्हणजे काय ?
जर न्यास जमिनीचे मालक म्हणून ७/१२ सादरी दाखल असेल व कुल कायदा कलम ८८ बी च्या तरतुदी निकषात न्यास बसत असेल तर , कुल मालक होऊ शकणार नाही व न्यास मालक राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री. अमोल सोमनाथ कोरडे
26-06-2017
amolkorde007@gmail.com
नमस्कार सर/मॅडम.....
आमच्या पणजोबांना 5 मुले होती. त्या पाच मुलांपैकी एक मुलगा घर सोडून परगावी गेला होता. त्याच काळात पणजोबांना इतर 4 मुलांच्या नावे जमिनीची वाटणी करून दिली. आमचे आजोबा हे त्या 5 जणांमध्ये सर्वात लहान आहेत.
तत्कालीन वाटणी नुसार-
1)गट न. 838 मधील 2.91 हे. क्षेत्रात पुढील प्रमाणे वाटणी झाली-
73+73+73+72
2)गट न. 926 मधील 2.65 हे. क्षेत्रात पुढीलप्रमाणे वाटणी झाली-
66+66+66+67
कालांतराने पाचवा भाऊ परत आला व त्याने ह्या चौघांकडे त्याच्या हिस्स्याची मागणी केली. त्यावेळी ह्या चौघांनी त्यांची मागणी नाकारली.
त्यानंतर पाचव्या भावाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. सदर दाव्या बाबत मा. न्यायालयाने पाचवा हिस्सा द्यावा लागेलच व वादी यांना त्यांचा 1/5 हिस्सा देण्यात यावा असा हुकूमनामा दिला.
तर मा. न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार सदर मिळकतीचे सरस निरस वाटप व्हायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. त्या पाच भावांपैकी दोघांनी बाकी तिघांना असे सांगितले की मा. न्यायालयाने पुढील प्रमाणे वाटप करण्याचा हुकूमनामा दिला आहे. त्या वाटण्या पुढीलप्रमाणे-
1)गट न. 838 मधील 2.91 हे. क्षेत्राचे-
58+58+58+58+59
2)गट न. 926 मधील 2.65 हे . क्षेत्राचे-
73+72+40+40+40
नवीन पाचवा हिस्सा न. 3 प्रमाणे व माझ्या आजोबांचा हिस्सा न. 5 प्रमाणे.
आणि अश्या प्रकारच्या वाटण्याचा फेर सुद्धा पडला आहे. त्यात -
फे. न. 1959 -
कोर्ट हुकूमनामा व मा. तहसीलदार साहेब यांच्याकडील अर्ज यानुसार सरस निरस मानाने ते आपसात वहिवाटीत असलेले क्षेत्राचे प्रमाणे त्यांची नावे क्षेत्र खलील प्रमाणे दाखल करावे असा दि. 13/1/1984 चा आदेश आहे.
त्यानंतर दि. 5/8/1987 रोजी सदर क्षेत्रांवर पुनर्वसन कायदा लागू झाला.
त्या आधी म्हणजे दि. 17/6/1987 गावातील एक इसमाने गट ना. 926 मधील माझ्या आजोबांच्या नावावरील 40 आर क्षेत्र स्वतःच्या नावावर करून घेतले. सदर इसमाकडे त्याबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत. कारण आजोबांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठलाही कागद कधीच लिहून दिलेला नाही. अर्जदाराच्या तक्रार अर्जावरून सदर नोंद मजूर झाल्याचा फेर पडला आहे.
त्यानंतर दि. 10/7/1998 रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांचा आदेश फे. न. 6911 मध्ये झाला. त्या आदेशानुसार फे.न. 1959 व तो मंजूर झाले बाबतचे आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. व 1978 च्या नोंदी पूर्ववत आणण्यात येत आहेत.
त्यानंतर मा. जिल्हाअधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. 27/6/2008 रोजी पुनर्वसनावरील निर्बंध उठविण्यात आले.
त्यानंतर दि. 7/3/2012 रोजी संगणकातील झालेल्या चुका दुरुस्तीसाठी मूळ 7/12 प्रमाणे संगणकीय 7/12 दुरुस्त घेणे साठी नोंद करण्यात आली.
त्यानंतर दि. 11/1/2013 मध्ये एक फेर पडला . तो पुढील प्रमाणे-
फे. न. - 14325-
आदेश-
दि. 11/1/2013 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये मा. तहसीलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्रमांक 465/2012 दि. 7/1/2013 नुसार फे. न. 1959 ची स्थिती कायम करून फे. न. 6911 हा रद्द करण्यात यावा.
एप्रिल 2016 मध्ये माझ्या चुलत भावाला शेतकरी दाखला त्याच्या शैक्षणिक कामी हवा होता. त्यावेळी आम्ही आजोबांच्या नावाचा 7/12 आणि 8अ उतारा काढला. त्यावेळी आमच्या लक्षात आले की आजोबांच्या नावे गट न. 926 मध्ये 27 आर क्षेत्र आहे. त्यावेळी आजोबांना विचारना केली तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या भावांनी काय काय उद्योग केले त्यांना काहीच कळत नाही. आजोबा त्याकाळात दारू च्या आहारी गेलेले होते. त्यांना गट न. 838 मध्ये 35 आर क्षेत्र शिल्लक होते. काही जमीन पाझरतालावकडे वर्ग झाली होती. पाचही भावांना त्यावेळेस त्याचे सारखे पैसे मिळाले होते. त्या राहिलेल्या 35 आर क्षेत्राची खरेदी आमच्या मधल्या चुलत्यांनी घेतली आहे. सदर 98000 पैकी फक्त 40000 रु फक्त आजोबांना दिले बाकीचे दिलेच नाही. अन मागितले तर भांडण करायचे.
926 मधील 40 आर क्षेत्र पण त्याच चुलत्यांनी त्या इसमाकडून विकत घेतले आहे. 210000 ची खरेदी दाखवली आहे. परंतु सदर इसमाला फक्त 50000 दिले आहेत. अन त्या इसमाने पण तेव्हड्याच 50000 रु मध्ये जमीन देऊन टाकली कारण त्या इसमाने बोगस नोंद करून घेतलेली होती व जमीन आजोबांच्याच ताब्यात होती.
मुलाकडेच जमीन असल्यामुळे आजोबांनी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
माझ्या वडिलांनी फेब्रुवारी 2011 मध्ये बँक कर्ज आणि खाजगी देणेदारी ला कंटाळून आत्महत्या केली. आजोबांचा सांभाळ मीच करतो. वडिलांचे बरेचशे कर्ज मी फेडत आलोय. आता फक्त एक बँक शिल्लक आहे. आजोबांनी डिसेंबर 2016 मध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला गट न.926 मधील 27 आर क्षेत्राचे नोंदणीकृत दस्ताने बक्षिसंपत्र करून दिले. सदर दस्तानच्या आधारे डिसेंबर 2016 मध्ये मा. तलाठी साहेबांनी कच्ची नोंद करून घेतली व नोटीस बजावली की 15 दिवसांनी नोंद मंजूर होईल असे सांगितले. 15/01/2017 ला सदर नोंद मंजूर झाली व 7/12 अन 8अ ला माझी नोंद झाली. माझ्या नावे तसा 7/12 व 8अ ही निघतोय.
सदर 7/12 confirmed असल्याने डिजिटल signature वाला 7/12 ही माझ्या नावासह निघतोय.
परंतु मला आता मा. तहसीलदार आहेब यांच्याकडे म. ज. म. अधि. 1966 चे कलाम 155 अन्वये दुरुस्तीची नोटीस आली आहे. आमच्या चुलत चुलत्यांच्या तक्रार अर्जानुसार सदर नोटीस आली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या नावे 73 आर क्षेत्र होते. अन ते आता 52 आर झाले आहे. मला बक्षिसंपत्र दिलेली जमीन आमच्या आजोबांची नाहीच . त्यांनी राजकीय दबाव महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आणला आहे. त्यांचे वकील माघार घ्या नाहीतर 420 ची केस दाखल करेल असे म्हणत आहे. अजून एक ही तारीख झालेली नाही. आजोबा अन मी दोन तारखांना गेलो परंतु काही कारणास्तव तारखा झाल्या नाहीत. म्हणून मी आजोबांसोबर निवासी नायब तहसीलदार साहेबांकडे गेलो अन त्यांना विचारणा केली की साहेब दोन तारखांना आम्ही आलो पण मा. तहसीलदार साहेब दुसऱ्या कामात असल्यामुळे तारखा झाल्या नाहीत. माझे आजोबा हे खूप वयस्कर आहेत अन ह्या पावसाळी अन ढगाळ वातावरणाचा त्यांना खूप त्रास होतो. तर पुढील तारखेपासून मी एकटाच आलो तर चालेल का? तर त्यांनी नोटीस बघितली अन आम्हाला म्हणाले तुम्ही दोघे नाही आलात तरी चालेल. ह्या केस चा निकाल आम्हीच इथे घेतो. अन निकाल आधीच झाला आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यावरील राजकीय दबाव साफ दिसत होता.
आमचे चुलत चुलते पण आजोबांना म्हणत होते की मी तुमच्यावर 420 ची केस दाखल करेल. माझी वरपर्यंत पोहच आहे अन पहिल्याच तारखेला निकाल लावून दाखवतो.
रेकॉर्ड रूम वाले कर्मचारी पण आम्हाला चुकीचे फेर देत नाहीयेत. चुकीचे म्हणजे ज्यात खाडाखोड केलेली आहे. फे. न. 1959 मध्ये तर खूप खाडाखोड केलेली आहे.
वकील साहेबांना ही भेटलो पण ते म्हणाले की राजकीय हस्तक्षेप आहे सो काही उपयोग होणार नाही.
सर, कृपया मार्ग सुचवा. मी आपल्या संकेतस्थळावरील खूप सारे प्रश्न अन त्यांची उत्तरे वाचली आहेत अन वाचत आहे. खूप माहिती अन ज्ञान मिळत आहे यातून. पण अशा प्रकारची एक ही केस याठिकाणी अजून पर्यंत आढळून आली नाहीये. कृपया मला योग्य तो मार्ग सुचवा अन काही प्रश्नांचे निरसन करा.
1)मा. तहसीलदार साहेब हे 1966 चे कलम 155 अंतर्गत मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश रद्द करू शकतात का?
2)मा. न्यायालयाच्या आदेशानुसार 1/5 हिस्सा सरस निरस वाटप द्वारे कलाम 85 किंवा नोंदणीकृत दस्ताने मा. तहसीलदार साहेब यांनी करायला हवे होते का?
3) खाडाखोड करून नोंद केलेला फेर ग्राह्य धरला जातो का?त्यावर खाडाखोड केलेल्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाहीये.
4) मा. तहसीलदार साहेबांनी राजकीय दबावाखाली चुकीचा निर्णय दिल्यास कोणाकडे अपील करावी लागेल?
5)नोंदणीकृत बक्षिसंपत्र महसूल अधिकारी रद्द करू शकतात का?
6)माझा 6 महिन्यांपूर्वी मंजूर झालेला फेर मा. तहसीलदार साहेब रद्द करून माझे नाव 7/12 मधून कमी करू शकतात का?
7)नोंदणीकृत दस्त अथवा इतर कोणतेही पुरावे नसता फक्त तक्रार अर्जावरून नोंद मंजूर करता येते का? सदर मंजूर नोंदी विरुद्ध अपील करता येईल का? अन कुठे करता येईल?
8) मा. न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार सरस निरस वाटप झालेले नसल्याचा कोठे अपील करावी?
Question by sadik
25-06-2017
sadik11m@rediffmail.com
सर एका शेतकऱ्याने ५ का ७ फूट चा असलेला सर बांध फोडून १ फुटाचा ठेवलाय तरी आता सर बांध फोडल्याने आमचा शेतीत वाहतुकीसाठी रास्ता बंद झाला आहे.तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केल्यास तो सर बांध पहिल्या सारखा मिळू शकेल का तो आहे तसा मिळ्वण्यासाटी काय करावे लागेल
२) सर बांध चे रेकॉर्ड कुठे मिळेल व त्यासाठी कोणते नकाशे व कागदे कडवे लागतील कळावे
आपण मामलतदार कोर्ट कायद्याखाली तहसीलदार यांचे कडे अर्ज करा .
बांधाचे रेकॉर्ड नसले तरी , परंपरागत रस्ता, रिकामा करून देण्याचे या कायद्याने तहसीलदार यांना अधिकार आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रवि मेंडके
23-06-2017
aumendke@gmail.com
नमस्कार सर
मला सेतसंधी इनाम म्हणजे काय ?सेतसंधी इनाम जमीनीची खरेदी कश्याप्रकारे करता येते? नविन शर्त म्हणुन शेतीसाठी जमीन खरेदीस परवानगीची आवश्यकता आहे का?
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
23-06-2017
ngpatil@rcfltd.com
नमस्कार साहेब- माझा प्रश्न असा आहे कि सम्भाव्य बिनशेति जर असेल तर ग्रामपंचायत परवानगीने छोटे प्लॉट पाडू शाकतात का? व जर तशी परवानगी नसेल तर मग शासन खरेदीविक्री करतांना बिनशेतिच्या दराप्रमाणे स्टाम्पडुटी वसूली का केली जाते?
नाही
आपणास जिल्हाधिकारी यांची विकास परवानगी घेणे आवश्यक
मुन्द्रानक शुल्क , बिनशेती दराने द्यावे लागणार
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनिलकुमार शिंदे
23-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
महाराष्ट्र खाजगी वन कायदा अन्वये चौकशी चालू आहे . या कायद्या अंतर्गत ,(३०.८.७५ ) वन सदृश्य जमीन १२ हे वरील , शासनास नाहीत होते व १२ हेक्टर चे आतील क्षेत्र खातेदारास परत करण्यात येते . दि . ३०.८ ७५ रोजी सध्याचे मालकाचे नावावर किती क्षेत्र होते ?
१२ हेक्टर वरील क्षेत्र शासनाकडे नाहीत होणार आहे . त्या अनुषंगाने निर्णय घ्या .
सध्या स्थितीत आपण खरेदी करू शकता परंतु वरील श्यक्य अधीन राहून व परिणाम स्वरूप
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनिलकुमार शिंदे
23-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब
बांधकामाबाबत शासनाच्या कोणत्याही परवानगी नसताना गृहनिर्माण संस्था नोंदणी कर्ता येते का ? नोंदणी बाबत गृहनिर्माण संस्थेने जमीन विकत किंवा भाडे तत्वावर घेतली नाही. बिन शेती आदेश झालेले नाहीत. विकास आराखडा महानगर पालिकेने मंजूर केला नाही. यू.एल.सी ची परवानगी घेतली नाही. संस्थेने बांधकाम केले नाही. त्याचे वितरण संस्थेने केले नाही. संस्थेमधील रूम (खोल्या ) , सदनिका नोंदणीकृत केल्या नाहीत. संस्था नोंदणी निबंधकाने संस्थेस नोंदणी प्रमाण पत्र दिले आहे. नोंदणी प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असे आहे. व त्याचे वर्गीकरण भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था असे आहे. महानगरपालिकेची घरपट्टी ,पाणीपट्टी , लाईट बिल सभासदांच्या नावे येत आहे. संस्थेच्या नावे येत नाही. पूर्वी एका विकासकाने जमीन मालकांकडून विकासकरार व कुलमुखत्यार पत्र करून घेतले आहे. ते साध्या स्टॅम्प पेपर वर केले आहे. ते नोंदणीकृत केलेले नव्हते. जमीनीचे मालक मयत झाल्यावर जमीन मालकच्या वारसांनी दुसर्या विकासकास जमीन नोंदणीकृत कन्व्हेंस डिड करून विकली आहे. आता संस्थेला संस्थेच्या सातबारा नावे करावयाचा आहे. तो सातबारा संस्थेच्या नावे होईल का ? संस्थेचे रि डेव्हलपमेंट करण्यास संस्था पात्र आहे का ? कृपया मार्गदर्शन मिळावे
Question by Anil Ayanna Chalmal
23-06-2017
anil.chalmal@sil.sharp-world.com
I am Originally from AP (weaver Community) and Born on 1.8.66 and brought up in Maharashtra. My caste is mentioned as Koshti instead of Thogati (Sub-caste in Weaver Community) In Maharashtra Caste list it is mentioned as Thogati sr.No. 161. I have only caste certificate issued by our community. Now I request you to how I can get Thogati Caste Certificate? Request you prompt reply.
Question by anand salve
23-06-2017
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , मी आमच्या जमिनीचा ऑनलाइन फेरफार पहिला त्यावर प्रवलंबीत फेरफार नं ४६९१ असे दिसत आहे याचा अर्थ काय आहे त्याबद्दल काही माहिती हवी असल्यास काय करावे ?
सदर फेरफार हा त्या उताऱ्यावरील असून तो मंजूर झालेला नाही ...तलाठी कार्यालयात जाऊन तो फेरफार आपण पाहू शकता
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by रविन्द्र
22-06-2017
ravindrakhekade@gmail.com
दुसरी वेळ
मा.सर
सर आमचे गावामध्ये सन १९७१-१९७२ मध्ये सिंचन तलाव तयार झालेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात आलेली आहे.तलाव पूर्ण झालेनंतर जवळपास ४०-५० हेक्टर जमीन शिल्लक राहीलेली आहे.अतिरिक्त जमीनीचा वापर ३ वर्षात होऊ शकला नाही व पुढील १० वर्षात होणार नसेल तर त्या अतिरिक्त जमिनी जिल्हाधिकारी यांचेकडे सुयोग्य मोबदला घेऊन वर्ग करणेबाबत चा म.शा.प.दि.२६/०७/२००२ मध्ये नमूद केलेले आहे.
सदर जमीन १९७१-१९७२ मध्ये संपादित केली त्यावेळी मूळ मालक अन्य व्यक्ती होत्या पण सन १९८५ पासून ०१ हे.60 आर जमिनीवर वहीती माझे आईची आहे आहे व सन १९९५ पासून सदर जमिच्या पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे माझेआईकडे आहेत.सदर जमिनीला लागून नदी असल्याने नदीमुळे अतिरिक्त जमीन तयार झाली असून ति 60 आर चे आसपास आहे सन २०१० पासून माझी आई एकूण ०२.हे २० आर जमीनिची वहीती पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे करून वहीती करीत आहे.
वरील पद्धतीने माझे आई कडे जमीन वाहितीत आहे.म.ज.म.अ.१९६६ चे खंड 1 मधील प्रकरण ३ मधील भाग तीन मधील नियम १० ते २१ प्रमाणे माझी आई मा.तहसीलदार यांचे मार्फत जमीन मिळणे बाबत अर्ज सादर करू शकेल काय आणि जमीन ७ किव्वा १२ प्रमाणे मिळू शकेल काय.तसेच सादर जमीन देणे बाबतचे अधिकार कोणाला आहेत.कृपया याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती आहे
१.६० हे आर क्षेत्र आपण पाटबंधारे विभागाकडून भाडे कराराने आपली आई कसत आहे . या क्षेत्राचे लागत ६० आर क्षेत्र मलई क्षेत्र निर्माण झाले आहे . मात्र पाटबंधारे विभागाकडील क्षेत्र आपली आई भाडे कराराने कसत असल्याने ते क्षेत्र आपले मालकीचे होऊ शकत नाहीय . पर्यायाने मलई क्षेत्र आपणास मिळू शकत नाही . मलई क्षेत्र लगतचे खातेदारास केवळ मिळू शकते . या प्रकरणात , लगतचे खातेदार , पाटबंधारे विभाग आहे . आपण नाही .
जे क्षेत्र संपादन प्रयोजनासाठी पाटबंधारे विभागाने उपयोगात आणले नाही , ते कसेंटरची विक्री लिलावाने करावयाची आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dipak Dabhade
21-06-2017
dipak1may1989@gmail.com
सर आम्ही जागेअभावी ग्रामपंचायत जागेवर गावठाणात घर बांधलेले आहे नियमानुसार ते अनधिकृत आहे ते नियमित करण्यासाठी आम्ही दंड भरण्यास तयार आहोत, सदर अतिक्रमण रासत्यपासूनपन 1000 फुटावर आहे कुणालाही त्याचा त्रास नाही, नियमित करण्यासाठी कुणाकडे अर्ज करावा लागेल, कृपया मार्गदर्शन मिळावे
ग्राम पंचायत ती जागा देण्यास तयार असणे आवश्यक आहे
जिल्हा परिषद या बाबतीत निर्णय घेऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
21-06-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A नावाच्या व्यक्तीच्या जमीनीच्या ७/१२ वर फक्त A चे नाव आहे, त्याचा B नावाचा लहान भाऊ याने हक्कसोड पत्र लिहून दिलेले होते म्हणून त्याचे नाव ७/१२ वर नाही. मग आता त्या व्यक्तीचा लहान भाऊ त्या जमीनीच्या ७/१२ वारस म्हणून माझे नाव नोंदविण्यात यावे म्हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर नाव नोंदविण्यात येईल काय ? याबाबत योग्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by पंकज कागणे
21-06-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीने आपल्या वडीलोपार्जीत मिळकतीवरील आपला हक्क हक्कसोड पत्राव्दारे जर सोडून दिला तर सदर व्यक्ती त्या मिळकतीवर आपला हक्क पुन्हा दाखवू शकतो का सर ? याबाबत योग्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by राकेश
20-06-2017
r.kakare@gmail.com
संरक्षित कुळ म्हणजे नक्की काय, सविस्तर सांगावे.
7/12 ला संरक्षित कूळ एकाच व्यक्ती च नाव असेल आणि 10-12 वर्ष्यानी एकत्र कुटुंबातील नावे अर्ज देऊन दाखल केली असतील तर ती नावे कमी करू शकतो का.
सविस्तर माहिती द्यावी ही विनंती
सौरिक्षीत कुल म्हणून कोणाचे नाव लागले होते ? सध्या ज्याचे नाव लागले आहे त्याचेच प्रथम सौरीक्षीर कुल म्हणून नाव लागले आहे का ? का या व्यक्तीचे नाव , कुळाचे वारस म्हणून लागले आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
19-06-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,BND खाली अतिक्रमण काढून मिळणेबाबत .....याचा अर्थ काय होतो. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
Question by पंकज कागणे
18-06-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपीक संवर्ग ) या संदर्भात आहे.
3 विषयात या पूर्वीच्या परीक्षेत सूट मिळाली होती म्हणून फक्त 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली. प्रश्न खालील प्रमाणे : -
प्रश्न - सदर परीक्षा सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेवून जर परीक्षा दिली तर राहीलेल्या प्रत्येक विषयात कमीतकमी 60 % गुण प्राप्त केले तरच संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण केली जाते का सर ? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
mohsin7-12.blogspot.in या संकेत स्थळावर विभागीय दुय्यम सेवा परीक्षा लेख दिला आहे तो वाचावा
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by Dipak Dabhade
18-06-2017
dipak1may1989@gmail.com
सर, आम्ही गरजेपोटी जागेअभावी गावठाणात ग्रामपंचायत जागेवर घर बांधलेले आहे, ते नियमानुसार अनधिकृत समजले जाणार आहे, घर गावाच्या मुख्य रस्त्या पासून 500 फूट व गल्लीपासून 200 फूट लांब आहे, सदर अतिक्रमनाचा कुणालाही अडथळा वा त्रास नाही, ते नियमित करण्यासाठी आम्ही दंड ही भरण्यास तयार आहोत, परंतु त्यासाठी काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती
Question by Vinayak बुवाजी patil
17-06-2017
Vbpatil96@gmail.com
एखादी व्यक्ती संरक्षित kul ahe vजमिनीचा आकार शासनाला त्याच्या हस्ते गेली 60वर्षे भरत असेल तर ती व्यक्ती त्या जमिनीचा मालक होऊ शकते kay कारण इतर अधिकारात जनरल ट्रस्टचे नाव आहे खरेदी बाबत विचारणा केली असता ट्रस्टची परवानगी घ्यावी लागेल व जमीन हि ट्रस्टच्या मालकीची आहे तुम्ही फक्त कुल आहेत मालक ट्रस्ट आहे असे सांगितले जाते तर कुळाचा जमिनीवर अधिकार आहे ka
सदर न्यासास कलम ८८ बी अन्वये जिल्हाधिकारी यांनी प्रमाणपत्र दिले नसेल तर , किंमत ठरू शकते
न्यासाचे परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
