जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Ajay Sonare
17-06-2017
ajaysonare@rediffmail.com

1) Can I purchase the land having remark "Vane" in other rights(Etar Hakka) due to supreme court order in 2005.
2)Can I purchase the land having remark "Vane" & " Need permission from central government for non forestry work" other rights(Etar Hakka) due to supreme court order in 2005.
If Yes please tell the procedure of sale.
The entry vane has to be in the Occupants column and not in other right's column . may be 22 A inquiry under The Private Forest Act pending . it is not advisable to purchase the property .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर
मला १ एकर शेती घ्यायची आहे .परंतु त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर साधे कुल म्हणून अन्य एका नावाचा समावेश आहे.कृपया मार्गदर्शन करावे .
इतर हक्कात साधे कुळाचे नाव आहे . सदरचे कुळाचे नाव कृषक दिन अथवा त्या पूर्वीचे असल्यास , तो मानीव खरेदीदार आहे . सध्याचा मालक याचा केवळ विकेरी किंमत एवढा हितसभांड मिळकतीत आहे . त्यामुळे ३२ ग किंमत निश्चित करून , कुल मालक झाले वर , परवानगी घेऊन त्याचेकडून मिळकत घ्यावी .
जर कुळाचे नाव कृषक दिनांनंतरचे असेल व एक वर्षाचे आत कुळाचे नाव ३२ ग किंमत निश्चित झालेली नसेल , तर मालक व कुल यांचेकडून एकत्रित मिळकत खरेदी करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balaji sawant
16-06-2017
Balaji.sawant44@gmail.com

नमस्कार मी
शेत वहिवाटी साठी रस्ता मिळावा म्हणून मा. तहसीलदार साहेबांकडे अर्ज दाखल केला होता त्या वर नायब तहसीलदार यांनी निकाल दिला आहे तो रस्ता नैसर्गिक पाण्याचा प्रवाहातून आहे असे त्यांनी नमूद केले आहे परंतु निर्णय देताना प्रवाहाच्या विरूद्ध देण्या ऐवजी प्रवाहाच्याच बांधावरून दिला आहे तो निर्णय बदलून घेणे साठी काय करावे लागेल उपाय सुचवा
सदर निकाल हा मामलेदार कोर्ट अंतर्गत दिला असल्याने त्यावर अपील अर्ज न करता पुनरीक्षण अर्ज प्रांत अधिकारी यांचेकडे करावा...

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

पुनरिक्षण अर्ज , उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ७/१२ उतारावरून जुने चार आणे हिस्सा पध्दतीचे वाचन कसे करावे ? मि सहकार संस्था मध्ये नोकरी करतो.
mohsin7-12.blogspot.in या संकेत स्थळावरील आणेवारी लेख वाचावा ..

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

Question by Mahesh patil
15-06-2017
shingarei20@gmail.com

नमस्कार सर..कॅवेट दाखल केल्या नंतर आम्हाला न बोलवत एकतर्फी उपजिल्हाधिकारी साहेबांनी स्टे order..दिली..आणि दोघांना पण सुनावणी तारीख दिली...आणि सुनावणी च्या दिवशी आमचे म्हणणे मांडलतो त्यानंतर स्ठे काढण्यात आला...या नंतर आम्ही तलाठी साहेबांन फेर साठी अर्ज करू शकतो का सर तलाठी सांहेब फेर घेतील का..
नमस्कार साहेब
कुळ कायदा कलम 43 ची जमीन असताना जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता कोणत्याही विकसबरोबर विकास करार व कुलमुखत्यार करता येते का ? त्याने कोणतीही शासनाची परवानगी न घेता चाळी बांधल्या असतील व नोंदणी करून खोल्या विकल्या नसतील तर खोल्या धारकांना त्या खोल्याचे कायदेशीर मालक होता येईल का ? विकासकला बंकेमार्फत पैसे दिले आहेत. अश्या परिस्थितीत जमिनीबाबत खोल्या धारकांना अधिकार मिळतील का ? कृपया मार्गदर्शन मिळावे.
कुळकायद्याखालील जमीन , हि कसण्यासाठी असते . त्यामुळे परवानगी न घेता त्याचा विकास करणे म्हणजे , कुल कायद्याचा शर्थ भंग आहे .
या मिळकतीवरील खोल्या , या नोंदणीकृत दस्ताशिवाय विकल्या असतील तर , खरेदी घेणारे मालक होऊ शकत नाहीत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या शेतीच्या ७/१२ वर पुढीलप्रमाणे बोझा आहे, "महाराष्ट्र शासन (पाट बंधारे) जळगाव जल संपदा विभा. यांचा जमिन सपाटी करणाचा यांचा र रू 3034.32/- ( 842 )".
हा बोझा उतरवण्यासाठी काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
त्यासंबंधी काही GR असेल तर कृपया मला माझ्या ई-मेल वर पाठवा.
संबंधित विभागाकडे बोजा रक्कम जमा करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
नमस्कार साहेब,
एका जमीन मिळकतीबाबत बक्षीस पत्र 1968 साली करण्यात आले होते. ते बक्षीस पत्र नोंदणी करण्यात आले न्हवते. सध्या बक्षीस पत्र लिहून देणार व लिहून घेणार दोन्ही मयत झाले आहेत. बक्षीस पत्र करण्यापूर्वी बक्षीस देणारे यांनी दत्तक विधान कायदेशीर हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे केले होते. बक्षीस पत्र लिहून देणारे मयत झाल्यानंतर वारस हक्काने दत्तक मुलाचे नाव त्याच्या जमीन मिळकतीस सातबारा सादरी दाखल झाले आहे. बक्षीस पत्राने दिलेली जमीन मिळकत बक्षीस धारकाच्या ताब्यात आहे. सातबारा दत्तक मुलाचे नावे आहे. जमिनीचा कर शासकीय देणी घेणी दत्तक मुलगाच करतो आहे. बक्षीस धारक सघ्या दत्तक मुलास जमिनीचा ताबा देत नाहीत. दत्तक मुलास ताबा मिळण्यासाठी काय करावे लागेल. बक्षीस पत्र धारक याच्या नावाची नोंद सातबारा मध्ये होऊ शकते का ? त्यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का ? असल्यास कोणता कायदा ?
नमस्कार साहेब
बांधकामाबाबत शासनाच्या कोणत्याही परवानगी नसताना गृहनिर्माण संस्था नोंदणी कर्ता येते का ? नोंदणी बाबत गृहनिर्माण संस्थेने जमीन विकत किंवा भाडे तत्वावर घेतली नाही. बिन शेती आदेश झालेले नाहीत. विकास आराखडा महानगर पालिकेने मंजूर केला नाही. यू.एल.सी ची परवानगी घेतली नाही. संस्थेने बांधकाम केले नाही. त्याचे वितरण संस्थेने केले नाही. संस्थेमधील रूम (खोल्या ) , सदनिका नोंदणीकृत केल्या नाहीत. संस्था नोंदणी निबंधकाने संस्थेस नोंदणी प्रमाण पत्र दिले आहे. नोंदणी प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असे आहे. व त्याचे वर्गीकरण भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था असे आहे. महानगरपालिकेची घरपट्टी ,पाणीपट्टी , लाईट बिल सभासदांच्या नावे येत आहे. संस्थेच्या नावे येत नाही. पूर्वी एका विकासकाने जमीन मालकांकडून विकासकरार व कुलमुखत्यार पत्र करून घेतले आहे. ते साध्या स्टॅम्प पेपर वर केले आहे. ते नोंदणीकृत केलेले नव्हते. जमीनीचे मालक मयत झाल्यावर जमीन मालकच्या वारसांनी दुसर्‍या विकासकास जमीन नोंदणीकृत कन्व्हेंस डिड करून विकली आहे. आता संस्थेला संस्थेच्या सातबारा नावे करावयाचा आहे. तो सातबारा संस्थेच्या नावे होईल का ? संस्थेचे रि डेव्हलपमेंट करण्यास संस्था पात्र आहे का ? कृपया मार्गदर्शन मिळावे
नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
नमस्कार सर, माझ्या मित्राच्या आजोबाच्या नावाची जमीन आहे त्याच्याकडे १९४९ चे सातबारा प्रती आहेत ते त्याच्या आजोबाच्या नावे आहेत व आता सद्यस्थितीत प्रांतिक सरकार यांचे नावे आहे. सदर जमिनीच्या सर्वे क्रमांकावरुन नगर भूमापन क्रमांक कश्या पध्दतीने काढता येतील व कोणत्या कार्यालयातुन माहिती उपलब्ध होईल तसेच उपरोक्त जमीनीचे गटबुक कश्या पध्दतीने व कोणत्या कार्यालयातुन मिळविता येईल.
आपण उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयात जा . त्या ठिकाणी चौकशी नोंदवहीवरुय्न आपणास सर्वे नंबर वरून नागरभूमान no काढता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आमची कुळकायद्यानी आलेली जमीन होती. ती एका वक्तीने कलम ४३ नुसार जिल्हधिकारींची परवानगी न घेता खरेदी केली. नंतर परवानगी ३ वर्षांनी घेतली. तसेच परवानगी आल्यावर ४ महिन्यांनी सदर जमिनीच्या सातबारावर कलम ४३ नुसार कलेक्टर च्या आगाऊ परवानगी शिवाय सदर जमीन कोणासही गहाण,दान, विकू नये असा फेरफार तसेच ४३ ला पात्र असा शेरा लागला..
तर हा फेरफार घडल्यावर ४ महिन्यापूर्वी घेतलेली
परवानगी रद्द होते का? का हा फेरफार घडल्यापासून परत नवीन परवानगी काढायची होती? तर ३ वर्षांपूर्वी झालेले व्यवहार हा कायदेशीर आहे का? का रद्द होतो?.....कृपया मला कळवा....
जमीन खरेदी करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते . खरेदी पचश्चत परवानगी देता येत नाही . अश्या प्रकरणात कलाम ८४ क क खाली कारवाई अपेक्षित आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आमच्या शेती जवळ एक पाझर तलाव आहे . शेजारच्या एका शेतकऱयाने त्या पाझर तलावाच्या दहा मीटरच्या अंतरावर एक विहीर खोदली आहे. अशी विहीर खोदण्यासाठी शासनाची परवानगी लागत नाही का ? जेणे करून मलाही पाझर तलाव जवळ विहीर खोदता येईल. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
पाझर तलाव जर जिल्हा प्राधिकरणाने , Public Drinking Water Source म्हणून अधिसूचित केला असेल तर , The Maharashtra Ground Water ( Management and development ) Act 2009 च्या कलम २१ अन्वये , ५०० मित्राच्या आत विहीर खोदता येणार नाही . मात्र पाझर तलाव अधिसूचित नसेल तर , विहीर खोदण्यास कोणतीही कायद्याची बाधा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by राकेश
11-06-2017
r.kakare@gmail.com

संरक्षित कुळ आणि एकत्र कुटुंब मॅनेजर ह्यांचा संबंध काय असतो. संरक्षित कुळ कोण्या एकाच्या नावाने असेल तर एकत्र कुटुंबातील इतरांना त्यात काय हक्क न अधिकार असतात. ह्या विषय माहिती हवी आहे.
नमस्कार सर ...माझा प्रशा असा होता कि माझा मालकीचा ग्रामपंचायत गावठाण मध्ये २५०० sq फट प्लॉट १९८५ ला खरेदी खाता नुसार रिजिस्ट्रेड खरेदी केली आहे. पण तेंव्हा पासून सादर जागेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केल्या गेली नाही, सध्या त्या जागेवर अतिक्रमण केले आहे . २०१० पासून जागेची नोंद करण्यासाठी आम्ही अर्ज करत आहोत पण ग्रामसेवकाने नोंद घेतली नाही.. परत आम्ही ग्रामसेवकाला नोंद करण्यासाठी विनंती केली आहे...व नोंद करण्यासाठी सर्च रिपोर्ट मागितला आहे. सर्च रिपोर्ट ची गरज आहे का. याबाबत मार्गदर्शन करावे. सदर जागेवर एका व्यक्ती ने अतिक्रमण केले आहे व त्याचा नावे खोटी नोंद घेतली आहे.
गावठाण जर unsurveyed असेल तर , अश्या जागेचे अधिकार अभिलेख म्हणजे , ग्राम पंचायत कर आकारणी पत्रक . आपण हि जागा ज्याच्याकडून घेतली , त्याचे नाव कर आकारणी नोंदवहीत नमूद होते का ? जर आपण ज्या इसमाकडून खरेदी केली त्याचे नाव , अश्या आकारणी नोंद वहीत असेल तर , आपण गट विकास अधिकारी यांचे कडे , ग्राम सेवकाने जी खोटी नोंद घंटील्याचे आपण नमूद केले आहे त्या विरुद्ध अपील करा .
मात्र जर आपण ज्याच्याकडून खरेदी केली आहे त्याचे तत्कालीन वेळी मिळकत आकारणी नोंदवहीत नाव नसेल तर , आपले नाव गावठाणातील जागेला लागणार नाही
गावठाण surveyed असेल तर , त्या मिळकरीचा मिळकत उतारा , आपण खरेदी करते वेळी कोणाचे नावावर होता , त्या वर , आपले नाव लागणे अवलंबून आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का?
नमस्कार सर , गृहनिर्माण सहकारी संस्था याचे री डेव्हलपमेंट म्हणजे काय ? संस्थेच्या नावे जमीन किंवा सदनिका धारकांच्या नावे जमीन बाबतचे हक्क नसताना री डेव्हलपमेंट करता येते का ? सभासदांच्या नावे महानगर पालिकेचा कर पाणी बिल लाईट बिल येत आहे. त्यांना कोणते अधिकार प्राप्त होतात , जमीन मालक यांना दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकत येते का ? पूर्वी जमीन मालकाने एका विकासकाला विकास करार करून दिला होता. तसेच कुलमयूखत्यारपत्र करून दिले होते. सदरचे कुलमुखत्यारपत्र व विकास करार नामा रजिस्टर केला नाही. विकासकाने सदनिका धारकांना सर्व सदनिका रजिस्टर नोंदणी करून विकले नाहीत. अश्या परिस्थितीत सानिका धारकांना जमिनीवर काही हक्क सांगता येतील का?. काही हक्क सांगण्या करीता कोणता कायदा आहे का? कृपया मार्गदर्शन मिळावे. हि विनंती
सर
जात अर्जदारांनी जात प्रमाणपत्रसाठी जर रक्तातील नात्याची वंशावलीनुसार सर्व सदशांचे जातप्रमाणपत्र किंवा जातपडताळणी प्रमाणपत्र प्रस्ताव सोबत सादर केल्यास १९५० च्या मानीव पुरावाची गरज असेल का
होय मूळ रहिवाशी असलयाचे सिद्ध करणे साठी

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

नमस्कार सर,प्रथम तुमचे आभार ठुमरी मार्गदर्शना मुले मी खूपच यौग दिशेने जात आहे . आटा माझ्या एक प्रश्न आहे कि ,फेरफफर दुरुस्थी साठी ताल .कोरेगाव येते माननीय प्रातःशाईब यांच्याकडे केश चालू होती दोनी बाजूचे म्हणणे मांडून झाले आहे पण सर अजून कोणताच निर्णय मला लेखी अथवा तोंडी समजला नाही .मी वकिलांच्याकडे विचारणा केली असता सांगण्यात आले कि निकाल तुम्हाला पोस्टाने कळवळा जाईल .हाय गोष्टीला १ वर्ष होऊन गेले आहे .मला तो निकाल मिळवण्यासाठी काय करावे लागेल कृपया मागर्दर्शन करा .
नवीन कायदा दुरुस्तीनीसार , अपील दाखल झाल्यापासून १ वर्षाचे आत त्यावर निर्णय घेणे , महसूल अधिकारी यांना क्रमप्रपात आहे . आपण संबंधित प्रांत सहेब्बन भेटून हि बाब निद्रशनास आणून द्या .
तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे हि लेखी पत्राद्वारे कळवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vnyk
09-06-2017
vnyk1234@gmail.com

नमस्कार,

जमिनीची मोजणी करावयाची आहे पण लगतचे कब्जेदार आणि त्यांचे पत्ते चौकशी करून सुद्धा उपलब्ध होत नसतील तर त्यांच्याविना सरकारी मोजणी होऊ शकते का ?

जमिनीची मोजणी करणे अनिवार्य आहे कृपया मार्ग सुचवा.


लगतचे कब्जेदारांचे पत्ते उपलब्ध होत नसतील तर , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , मोजणी नोटीस , कब्जेदारांचे जागेवर प्रसिद्धही करण्याची तरतूद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, A नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण नाही. B नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण आहे. पण जेष्‍ठते मध्‍ये A कर्मचारी सिनीयर आहे व B कर्मचारी ज्‍युनीयर आहे. A कर्मचारी यांची जेष्‍ठता कायम आहे कारण त्‍यांच्‍या तीन संधी झाल्‍या नाही व 9 वर्षाची सेवा पण झाली नाही. मग आता B कर्मचारी ज्‍युनीयर असला तरी परीक्षा लवकर पास झाला म्‍हणून त्‍यांना लगेच पदोन्‍नती देण्‍यात येते का सर, याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे. हि नम्र विनंती
पदे जशी रिक्त होतात , तसे पद्दोनीतीची बैठक होते . बैठकीमध्ये आपण पदोन्नतीसाठी पात्र यादीमध्ये येत याल, तर आपणास पदोन्नती मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरजी आपणास विचारलेल्या प्रश्नाची किती दिवसात आपण उत्तर देता ?
महोदय , येथे अधिकारी त्यांच्या कार्य व्यापातून आपला बहुमूल्य वेळ काढून उपलब्धतेनुसार उत्तरे देतात, धन्यवाद.

Reply by MCS Maharashtra | इतर

माझ्या बिनशेती जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'ओपन बिनशेती' असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ काय होतो ?
ओपन बिनशेती अशी संकल्पना नाही . आपली मिळकत बिनशेती असल्यास , ओपन हा शब्द वगळण्याबाबत कलाम १५५ ( MLRC 1966 ) खाली तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझी बिनशेती जमीन ग्रामपंचायत रस्त्यालगत आहे जी मी १० वर्षांपर्वी खरेदी केली होती. ग्रामपंचायत रस्त्यालगत माझ्या हद्दीच्या आतील बाजूस पूर्वीपार ४ फूट गटार होते व जमिनीतील प्रवेशासाठी जागा खरेदीवेळी गटारावर मोरी बांधलेली होती त्याच्या खालून पावसाळी पाण्याचा निचरा होतो.

ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार माझ्या हद्दीत गटारासाठी मी आता ४ फुटांच्या ऐवजी ८ फूट रुंदीचे अंतर गटारासाठी ठेवले आहे. त्यामुळे आता माझ्या हद्दीतील मोराची रुंदी कमी झाली आहे. ग्रामपंचायत मला नवीन रुंद मोरी बांधायला सांगत आहे, परंतु हा खर्च करणे शक्य नसल्याचे मी कळविल्यावर 'पावसाळी पाण्याचा निचरा' होणेसाठी ८ फूट रुंदीचे अंतर मोरीसाठी आवश्यक असून मी मोरी रुंद न केल्यास मूळची मोरी तोडून टाकू व पावसाळी पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करू असे ग्रामपंचायतीने कळविले आहे. ग्रामपंचायतीस असे करण्याचा अधिकार आहे का ? गेली १० वर्षे असलेली प्रवेशासाठीची मोरी तोडून माझा वहिवाट मार्ग ग्रामपंचायत बंद करू शकते काय ? मी हद्दीतील प्रवेशासाठी ग्रामपंचायत रस्त्यालगत मोरी बांधली तेंव्हा कोणतेही परवानगी न घेतल्याने ती बेकायदेशीर आहे असे ग्रामपंचायत सांगते आहे. ग्रामपंचायत रस्त्यावरून हद्दीत प्रवेशासाठी मोरी बांधण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते का ?
आपण मोरीसाठी ४ फूट ऎवैजी ८ फूट जागा सोडली आहे . मात्र ग्रामपंचायत आपणास , मोरीचे बांधकाम करण्यास सांगू पाहत आहे . मोरीचे बांधकाम ग्रामपंचायतिने करणे आवश्यक . जर सध्या . ग्रामपंचायत ८ फूट मोरीचे काम न केल्यास , मोरीवरील बांधकाम तोडण्याची सूचना आपणास करत आहेत , आपण सध्याचे मोरीमुळे , पाण्याचा निचरा होत नाही का याची खात्री करा .
आपण ग्रामपंचायतीचे पत्रास उत्तर द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3