जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

अ व्‍यक्‍तीला भूकंपग्रस्‍त प्रमाणपत्राच्‍या आधारे वर्ग क ची शासकीय नोकरी मिळाली तर वर्ग क च्‍या इतर शासकीय नोकरीसाठी त्‍याच व्‍यक्‍तीला त्‍याच प्रमाणपत्राचा लाभ मिळेल काय ?
प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्राचे आधारे एकदाच (आरक्षणाचा ) नोकरीचा लाभ घेत येतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ravi
06-02-2014
virravi3@gmail.com

१. शेत वहीती ७ ब बाबत शासन निर्णय क्रमांक देण्याची कृपा करावी ?
२. शेतकरी नसलेल्या व्यक्तीस कुलाची जमीन विकत घ्यायची असल्यास सध्या परिस्थितीत त्याचे उत्पन्न किती पाहिजे ?
.३ भोगवटादार वर्ग २ च्या शेत जमिनीस ७ ब लागू होतो काय बाबत शासन निर्णय ? कृपया प्रतिसाद द्यावा
महाराष्ट्र जमीन महसूल ( अधिकार अभिलेख ) तयार करणे नियम , या मध्ये विस्तृत तपशील दिलेले आहे.
कलम ६३ अन्वये बिगर शेकरी व्यक्तीचे अन्य मार्गांनी होणारे उत्तपन्न १२००० पेक्षा जादा आसू नये.
कुलाची जमीन म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार जमिनीची विक्री परवानगी कलम ४३ अन्वये दिली जाते त्यास उत्त्पन्न अट नाही.
भोगवटादार २ म्हणजे शर्तीने दिलेली जमीन. या मध्ये ज्यास जमीन दिलेली आहे त्याने कसणे आवश्यक . भोगवातादाराशिवाय अन्य व्यक्तीने जमीन कसल्यास शर्थ भंग होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर एखादी जागा अ नावाच्‍या व्‍यक्‍तीची आहे व तदनंतर अ व ब नावाच्‍या व्‍यक्‍तीचा करारनामा दोघात होऊन ब नावाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍या जागेत कारखाना टाकुन अनधिकृतपणे अकृषिक वापर चालु केला आहे तर अनधिकृत अकृषिक वापराबाबत दंडाची कारवाई व तसेच सदरचे बांधकाम निष्‍काषित करणेची कार्यवाही करणेसाठी कोणाला नोटीस दिली पाहीजे म्‍हणेजेच अ व्‍यक्‍तीला की ब नावाच्‍या व्‍यक्‍तीला इत्‍यादी मार्गदर्शन मिळावे
प्रमाणित दस्त झालेनंतर त्याची फेर फार नोंदणी करताना विक्री करणारा भोगवटादार फेर फार नोटिशी ला हरकत घेऊ शकतो का?
रात्रीची वाळूचोरी पकडण्यासाठी महसूल अधिकारी कर्मचारी यांना आदेशित करू नये अथवा बंधनकारक करू नये असा मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरने एका खटल्यात निर्देश दिले हे खरे आहे का? कृपया प्रत पाठवावी.
माहितीचा कायदा अन्वये बीपीएल खालील इसमाला माहिती देताना जी माहितीची रक्कम आधीच निश्चित केली असेल आणि त्याने साधा अर्ज केला असता तरी त्याला ती माहिती उपलब्ध झाली असती तर अश्या इसमाला ती माहिती मोफत द्यायची का
आणि जर त्या कडून फी घ्यायची असेल तर त्याचा शासन निर्णय किवा नियम आहे का
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अंतर्गत अर्ज केला नसेल तर, इतर बाबतीत बी. पी. एल. धारकांना नक्कल फी अधिनियमाच्या तरतुदी लागू होतील.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सदर माहिती मोफत द्यावी.....

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

महसुल विभागात लिपीक संवर्गातून अव्‍वल कारकून संवर्गात पदोन्‍नती मिळाल्‍यानंतर वेतननिश्चिती बाबत मार्गदर्शन व्‍हावे.
लिपीक पदावर वेतन 6820 ग्रेड पे 1900
अव्‍वल कारकून पदावर रूजु 24/01/ २०१४
अ. का. ग्रेड पे 3500 आहे . सरळसेवेद्वारे अ. का. पदावर नियुक्‍ती झाल्‍यास मुळ वेतन 8920 ग्रेड पे 3500 तर उपरोक्‍त प्रमाणे पदोन्‍नती झाल्‍यास मुळ वेतन किती असावे, याबाबत मार्गदर्शन व्‍हावे.
लिपिक पदावरील वेतन = ६८२०+३५०० =१०३२०. अव्व्वल कारकून पदावरील वेतन =१०३२०*३%=३१० +६८२०=७१३०. म्हणून मूळ वेतन ७१३० होईल व महसुल विभागामध्ये अ.का या पदाची सरळ सेवेने निवड होत नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

धन्यवाद , श्री. किरण पानबुडे साहेब,
महोदय श्री. किरण पानबुडे साहेब,
मला माझ्या पडीक जमिनी मध्ये साया , आंबा , काजू , जांभूळ हि झाडे लावायची आहेत. तरी त्यांचे बियाणे व रोपे कोठे भेटू शकतात या बद्दल कृपया माहिती द्याल का ?
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपला आभारी
संदीप मोरे
संदीपजी या संकेतस्थळावर mahsul विषयाशी nigdit प्रश्नांची उत्तरे दिली जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धन्यवाद , श्री. किरण पानबुडे साहेब,
तगाई शेर व सहकारी सोसायटी इकरार बोजा ७/१२ वर असल्यास तो कसा काढतात या बद्दल माहिती द्याल का ?
तगाई कर्ज माफ करण्यात आलेले आहे . असे शेरे काढून takne बाबत जुना शाषण nirnay आहे. तहसीलदार यांचे कडे arja करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
31-01-2014
mohanmsutar@gmail.com

महोदय
आमचे आजोबांचे नावार असलेले सन. २५५/२अ १.हे १३आर व २५६/२अ ३हे १५आर या दोन्ही सन. चे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन झाले असून दोन्ही सन मिळून एकच प्रकल्पग्रस्त दखल काढण्यात आलेले आहे .आता सनम २५५/२अ पैकी ९० आर शेत जमीन उरलेले आहे.सदर जमीन आमचे वडील व दोघ काकांचे नावावर ३०-३०-३० तिघांचे नावावर ७/१२ उतार मिळतात .उतार नमुना ८ तिघांचे नावावर आहे. त्यामदे पण प्रत्यक उतार मदे तिघा जनाचे नाव येतात जमीन ल .पा.मदे संपादन झाले असलेने उरलेले जमीन पैकी २० आर पर्यंत जमीन वारंवार पाण्याखाली जातात .ते जमीन आम्हाला कसनेसाठी येत नाही,भूसंपादन झाल्यापासून आमचे नुकसान होत आहे . आणी आम्हाला वाराव्वर पाण्याखाली जाणार जमीन चे प्रकल्पग्रस्त दखल मिळवण्यासाठी व त्याबाबत पाठ पुरव कोणते कार्यालयाकडे करायचे त्याबाबत माहिती मिळावे. विनंती
आपले ऐकून जमिनीपैकी काही जमीन संपादित झाली असून उर्वरित जमीन जी आपले नावावर आहे ती पाण्याखाली जात आहे. पाण्याखालील जमीन संपादित झाल्याशिवाय आपणास प्रकल्प ग्रस्त दखल मिळणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री रामदास सायगावकर सर ,
माझे गाव - बोरावळे तालुका - पोलादपूर , जिल्हा - रायगड आहे. माझे पंजोबा श्री लक्ष्मण जानू मोरे यांनी शेतजमिनीवर सावकार सुंदर गांधी यांच्या मदतीने १९६३ मध्ये शासकीय तगाई कर्ज घेतले होते त्या कर्जाची रक्कम व व्याजासकट ३०/३/१९९४ मध्ये भरली गेली आहे . आमच्या कडे शासकीय तगाई कर्ज भरलेली प्रत हि आहे . परंतु त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्या मध्ये भोगवटदार म्हणून सावकार सुंदर गांधी यांना दाखवले जाते व इतर अधिकार मध्ये ज . मा. अज्ञान (२१९२) वि . तहकूब कुळाचे नाव , संरक्षित कुळ , श्री लक्ष्मण जानू मोरे, रामा ,शिवराम, अंबाजी ,बोजा सहकारी सोसायटी इकरार घागरकोंड चा (२२५७) असे येते.
माझे ७/१२ उतारा नंबर आहेत १७/८ , २५/१० , ३२/२३ , ५७/१६ , ६५/२ , ६६/२, ६९/२ तसेच एका ७/१२ उताऱ्यावर वेबसाईट वर गट क्रमांक -μÚ.È./1 , खाते क्रमांक - २५९ , फेरफार नंबर - २०७० असे दाखवले जाते. शेत जमीन आमच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपला आभारी
संदीप म. मोरे
आपण तहसीलदार पोलादपूर यांचेकडे अर्ज करावा. कुल अज्ञान असल्याने ३२ ग किंमत ठरवलेली नाही. कुल अज्ञान आहे म्हणून tillers day पुढे जात नाही. अन्य कुलप्रमाणे असा कुल मानीव खरेदीदार होतो.
तगाई कर्ज आणि कुल कायदा याचा सम्भन्द नाही. तगाई शेर ७/१२ वर असल्यास तोही काढून तक्ता येऊ शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१३-२-२०१४ पासून राज्यातील महसूल कर्मचारी व अधिका-यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप आहे. आपल्याकडील अधिकारी यात सहभागी होणार आहेत,याबाबत आपली भूमीका काय आहे. कृपया कळवावे.

Question by Prashant Wakare
28-01-2014
prashantwakare@gmail.com

Dear Sir
I am planning to establish Biomass Briquetting Project at agricultural land.I wish to know whether the conversion of land (NA) is required for this project OR it is exempted.
Thanks and Regards
Prashant Wakare
Mobile-9714044557
Dear Wakeriji
I have replied you earlier and has also given you mobile no .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay ingole
28-01-2014
vv_rt@rediffmail.com

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली जमा केली पाहीजे यांचे कृपया माहिती मिळावी व तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे यांचेसुध्‍दा माहिती मिळावी
वसुल केलेल्या आर आर सी पैकी 10% रक्कम घेण्याबाबत सध्या तरतुद लागु नाही.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर, मला जमीन अकृषिक करायची आहे ती जमीन महसुल अधिनियम १९६६ कलम ४४अ या पद्धतीने तर ती कशी करायची माहिती हवी आहे . धन्यवाद .
Unless the land you intend to purchase falls in the category asmentioned in section 44 A , it cannot get deemed NA status . Otherwise you can apply under section 44 .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
28-01-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब
मी अत्यंत गरीबप्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्य आहे . आमचे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन झालेले आहे.त्यावेळी आमचे आजोबा निरिक्ष्रर असल्याने आमचे सर्व शेत जमीन बागायत होते .सदर ७/१२ उतार मदे जिरायत नोंद असलेने जिरायत म्हणून मोबदला स्वीकारण्यासाठी नोटीस काढण्यात आले. आम्ही ते स्वीकारण्यात आले नसुन त्याबाबत मार्च २००० मदे मुंबई हाय कोर्टात ३०० शेतकरी सोबत याचिका दाखल केले . त्यमदे २५० शेतकरी ८० टक्के मोबदला घेतले होते. ५० टक्के काही नाही घेतले . २५० शेतकर्यांनी त्यांना वाटेल तसपैसे देऊन न्याय पदरात पडून घेतले.आमचे पूर्ण शेत जमीन भूसंपादन झाल्याने आमचे दुसरे काही उत्पन्न नसल्याने त्याबाबत काही पाठ पुरव केले नाही .भूसंपादन करते वेळी मी ७वि वर्ग मदे शिकत होते. आमचे आजोबा वडील काका निरक्षर असल्याने .पैसे नसल्याने आम्ही काहीही करू शकले नाही. दिसेम्बेर २०११ मदे हाय कोर्टाने दिलेले निर्णयानुसार भूसंपादन विभागाने नोटीसा दिले ते नोटीस स्वीकारण्यात आले असून १२ एकर शेत जमीन साठी जुन्या बाजार भाव प्रमाणे ५०००००/ पैसे मंजूर करण्यात आले . आम्हाला पैसे नकोय आम्हाला तेवढे शेत जमीन हवाई त्यासाठी मार्गदर्शन द्यावे कारण पैसे घेतलेले शेतकरी बरोबर निकाल देनेत आलेले आहे. आम्ही काही पैसे न घेतल्याने आमचे शैक्षनिक नुकसान झालेले आहे.शैक्षनिक अर्हता कमी असल्यास नोकरीसाठी अर्ज सुद्धा करतयेत नाही .आमचे थोरला भाऊ २००१ मदे प्रकल्पग्रस्त दखल कादले असून त्यांना २००९ मदे नोकरी मिळाली . सदर २००१ मदे मी १०वि वर्गात शिकत होते. त्यानंतर पैसे नसल्याने माझे शैक्षनिक नुकसान झाले शासनाने पूर्ण भूसंपादना झालेले प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्यांचे शैक्षनिक अर्हते मदे सूट देनेचे तरतूद आहे काय?काही पैसे नघेतलेने शेत जमीन मिळवण्याचे तरतूद आहे काय? व प्रकल्पग्रस्त कोट्यात नोकरी लागलेले कर्मचाऱ्यांना पूर्ण भूसंपादना झाल्यास सद्य kahi शेत जमीन नसल्यास हमी पत्रावर पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे तरतूद आहे काय? माहिती सर्व वाचून मार्गदर्शन द्यावे विनंती .

Question by वंदना maske
27-01-2014
ntesrpbn@gmail.com

संरक्षित कुल असताना हि संरक्षित कुलास जमिनीतून बेदखल करता येते का ?
माझ्या वडिलांनी १९८५ साली ४ घुन्ते जमीन घेतली ४ घुन्त्यच्य मधोमध घर बांधलेले आहे त्याची घरपट्टी व पाणीपट्टी वडील भरतात पण ती जागा अजून नावावर करून घेतलेली नाही.पण आत्ता तो मालक नावावर करून द्यायला तयार आहे पण तुकडा बंदी प्रमाणे ४ घुन्ता नावावर होत नाही? तर काय करावे आपल्या नावावर ४ घुन्ता जमीन होण्यासाठी ?
१.आपले कब्जे हक्कास अडथला आणू नये म्हनून न्यायालयात दावा दकहल करता येऊ शकते.
२. नमुना ८ वर जर मुल मालकाचे नाव कायम असेल व मालक नावाने करून देण्यास तयार असेल तर नमुना ८ च्या आधारे इमल्याची विक्री (घराची) करून घेत येईल .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

आपणास प्रचलित पद्धतीने जागा नावावर होणे शक्य नाही. मात्र १९८५ पासून तुकडे बंदी कायद्याचे अनुषगाने जमीन २० वर्षे होऊन न हि संपादित/ताब्यात घेतली नसल्याने , आपले तबेकब्जस अडथला आणू नये असा दावा न्यायालयात दाखल करता येउल का याचा वकील सल्ल्याने विचार करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाटणी पत्र नोंदणीकृत नसून तो ५ साक्षदरांचे समक्ष सहहिस्से दारांनी लिहून घेतलेले असल्यास फेरफार घेता येईल काय?
हटकत नाही. सह हिस्से दारांना हरकत नसल्यास नोंदणीकृत वाटणी पत्राची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by balaji
27-01-2014
www.abdarerokrt@rediffmail.com

माझ्या वडीलानी आईचा नावाने तीन एकर जमीन १९८३ ला घेतली( खरेदीखताने) सातबरा व आठ अ वर ही दिला, पण भुमापन , गट नं. दिला नाही व आज सातबरा दुसर्याचा नावे आहे . त्यामुळे तीनदा मोजणी करुन घेतली .फाऴणी बाराचा आमल करुन मिऴवण्यासाठी काय करावे ?
प्रश्न सविस्तर माडवा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by balaji
27-01-2014
www.abdarerokrt@rediffmail.com

माझ्या वडीलानी आईचा नावाने तीन एकर जमीन १९८३ ला घेतली( खरेदीखताने) सातबरा व आठ अ वर ही दिला, पण भुमापन , गट नं. दिला नाही व आज सातबरा दुसर्याचा नावे आहे . त्यामुळे तीनदा मोजणी करुन घेतली .फाऴणी बाराचा आमल करुन मिऴवण्यासाठी काय करावे ?
सर,
माझ्या वडिलाची पंधरा एकर शेती आहे व मी ऐकच मुलगा असल्यानी त्या मधील आर्धी शेती माझ्या नावावर करण्यासाठी registry करावी लागेल कि १०० रुपयाच्या स्टंप paper वर watnipatrak केले तर चालेल.कृपया मार्गदर्शन करावे.
आपले वडील अर्धी शेती नोंदीकृत बक्षिसपत्र करून आपले नावे करू शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जिल्हा परिषद येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे व मला डिप्लोमा सिविल इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच हा डिप्लोमा पूर्णवेळ आहे पण मी केवळ परीक्षेला ४ दिवस जाणार आहे व लिपिक नोकरी सोडणार नाही. याबाबतीत पूर्णवेळ शिक्षण व पूर्णवेळ नोकरी परवानगी आहे का? पूर्णवेळ शिक्षण घेत असताना मी शासकीय कामात कोणताही अडथला येणार नाही याची हमी पत्र देईन.
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपल आभारी
आपले विभाग प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रेश्नाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद सर. माझे वडीलांचे नावे असलेली जमिन ही 1992 पासुनची आहे. तसेच जमा पावती ( जमिन कर) माझ्या वडीलांचा नावाने 1992 पासुन आहेत. तर 21 वर्षे ती जमिन माझे वडील करित आहेत.ज्या वेळेस माझे वडीलांच्या नावे जमिन करण्यात आली.त्या वेळेस त्यांना एवढेकही समजत नव्हते.कारण ते आडाणी आहेत.तसेच ज्यांचाकडुण जमिन घेतली तेही आडाणीच होते त्या काळातील ही फेरफार केवळ विश्वास ठेवुनच झालेली आहे.पण आज सर्व सुशिक्षित आसल्याने कायद्याचा आधार घेतात. या स्थितित ती जमिन मुळ मालकाकडे परत जाऊ नये या साठी काय करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
आपण अथवा आपले वडील जमीन कसत असल्यास , चुलत्यांनी अडथला केल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.30 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3