जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by suhas patil
04-10-2017
suhasp075@gmail.com
hello sir,
maze nav suhas patil. maza question asa hota ki,
1) 7/12 utaryvar tukadebandi virudh vavahar asa jo shera asto tych arth kay ?
2) 7/12 utaryvar kul kayada virudh vavahar asahi shera asto tychahi arth kay ? tasech
3) avibhajit satta prakarane asa jo shera asto tycha arth kay asto ?
please mala reply dy...
thank you
१.प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करण्यावर महा तुके जोड व तुके बंदी कायद्याने निर्बंध आहेत . हे प्रमाणभूत क्षेत्र जिल्ह्यावर वेगवेगळे आहे .
साधारणपणे बागायत क्षेत्रासाठी - ५ गुंठे
एकपिकी जमीन -१५ गुंठे
वरकस जमीन -२० गुंठे
या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री झालेली असल्यास , अश्या क्षेत्राची नोंद मंजूर करता येत नाही . तथापि अश्या नोंदी मंजूर करून इतर हक्कात तुकडे बंदी कायद्या विरुद्ध व्यवहार असा शेरा लिहलेला आहे
२. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी , खरेदी करणारा , शेतकरी असणे आवश्यक आहे . २०१६ पूर्वी जर , बिगर शेतकरी व्यक्तीने जमीनखरेदी केली असल्यास , महाराष्ट कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क अन्वये कारवाई करण्यात येत असे व अशी जमीन शासन जमा केली जात असे . अशी नोंद नामंजूर करणे आवश्यक आहे . मात्र अश्या हि नोंदी मंजूर करून , भोगवटादार सादरी खरेदीदाराचे नाव दाखल करण्यात आले आहे व इतर हक्कात कुल कायद्याचे तरतूद विरुद्ध व्यवहार अशी नोंद घेण्यात आली आहे
३. अविभाज्य सत्ता प्रकार - सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय ज्या जमिनीची विक्री करता येत नाही अशी जमीन . अशी जमीन शासनाने प्रदान केलेली असते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by suhas patil
04-10-2017
suhasp075@gmail.com
namaskar sir,
mi suhas patil maze gav -gudal,tal-radhanagari ,dist-kolhapur
sir amchi kul kayada 43 navin shart ashi shera aslele 24.5 guntha jamin aaahe.
amchy ajobanche don bhau aahet . tyveli amchy ajobani ty doghana prateki 24.5 guntha ashi jamin amchi bhogavata varga-1 aslelei jamin vatani mhanun dili .aani aplyala kul kayada vahivat aslelei varga-2 chi jamin theun ghetali .
tyveli tyna kahi mahit nhavate. pan aata amhala te navavar karata veli samjl.
pan hi jamin actual amchy ajobani kasali mhanun milali aahe na?
te don bhau sheti karat nahit city madhe ahet .
mag amchi vadiloparjit jamin ti tar ty don bhavani ghetli aani aata ti tynchy navavar aahe 7/12 la nond aahe.
amche ghar v parisar ase amche 10 guntha area aahe. tyna ase vatate ki aamhi ti 24.5 kul kayadychi jamin + 10 guntha gharachi jamin ghetli mhanun te aata gharachy 10 guuntha madhil vatani magat aahet .
mag ti kul kayady chi jamin ty vatanicha ek bhag aahe ki nahi. he sanaga . ti jamin amchy ajobancy navavar aahe tyci tyveli ty jaminiche 30 % rakam bharali hoti sarakarla . mag aata te don dhau vatni magatat te barobar aahe ki worg te sanga.please ghar hi amchy ajobancy navavar aahe. te legali kahi karu shakat nahit na. don bhau. please sanga ....yavar kay karayche te
जमिनीची किंमत आजोबांचे नावावर निश्चित झाली म्हणजे , जमीन एकट्या आजोबांची होत नाही . या जमिनीस कुल म्हणून कोणाचे नाव लागले होते हे महत्वाचे . जर उपरोक्त जमिनीस , आजोबांच्या वडिलांचे म्हणजे पंजोबांचे अथवा आजोबांचे ए कु मॅ म्हणून नाव लागले असेल तर , त्या दिन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वर्षांचा मिळकतीवर हक्क आहे . मात्र जर केवळ आजोबांचे वैयक्तिक क्षमतेत नाव लागले असेल तर , त्या दोन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वारसांचा हक्क नाही .
तसेच जे वाटप झाले होते त्या मध्ये , अशी जमीन जमिनीची वाटणी असेल असा उल्लेख असणारा दस्त बनव्याण्यात आला होता का ? असा दस्त असेल तर , आपण त्यांचे मागणीकडे लक्ष्य देण्याचे कारण नाही . मात्र असा दस्त नसेल तर , मात्र , उद्या त्यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास , न्यायायलायचे निकालालप्रमाणे , आपणास कदाचित या जमिनीतील त्यांचा हिस्स्याचे क्षेत्र द्यावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुंदर कुऱ्हे
03-10-2017
sunder588@gmail.com
सर सरळ प्रश्न आहे ग्रामपंचायतीत झालेल्या जागेच्या वाटण्या ग्राह्य असतात का व वाटण्या झाल्यावर pr कार्ड ला पुन्हा वाटण्यावरून वाद होऊ शकतात का कारण pr कार्ड ला अजून जुनीच नोंद आहे ग्रामपंचायत नमुना न. ८ मालकी पुरावा असतो कि नसतो कारण पूर्वी लोक ग्रामपंचायत ला वाटण्या करत होते ना कि भूमी अभिलेख ला त्यांनी वाटण्या केल्या पण आता ते जिवंत नाहीत आणि pr कार्ड ला नोंद जुनी आहे आता कोणती वाटणी खरी आहे ?
२.ज्याने त्याने वाटण्या झालेल्या जागेवर घर बांधून गेले २० वर्ष महसूल भारत आहे तर आता pr कार्ड वरून वाद कसा होऊ शकतो
३.दोन्हीकडे फेर का होतात मग खरा कोणता आजही लोक ग्रामपंचायत ला जागेच्या वाटण्या करतात त्या कायदेशीर असतात का ?
४.आपण ज्या जागेचा घरपट्टी म्हणून कर भरतो तो मालकाच्या नात्यानं भरतो मग पुन्हा pr कार्ड ला वारसा करून वाटण्या करण्याचे कारण काय?
मी कोर्टात दाद मागू शकतो का ?
आपले गाव शहर सर्वेक्षण झालेले आहे . ग्राम पंचायत मध्ये कर आकारणी नोंदवही असते . त्या मध्ये घर नम्बर नमूद असतो . आपण अससेसमेंट नोंदवहीला वारसांची नवे लागल्यावर , त्याच वेळी , मिळकत पत्रिकेस हि नाव लावणे आवश्यक होते . पण अद्यापही वेळ गेलेली नाही . आपण ज्या पद्धतीने अससेसमेंट नोंदवहीला वापर केलेले आहे त्या[प्रमाणे मिळकत पत्रिकेस नाव लावणे व त्याप्रमाणे वाटप करून , स्वतत्र मिळकत पत्रिका मोजणी करून घ्या .
सर्वांची संमती असेल तर , वाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
02-10-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय श्री संजय कुंडेटकर सर आपण मी विचारलेल्या प्रश्नाना बघावे योगय तो मार्गदर्शन मिळावा ह्या करीता विनंती ,,.
१) नमस्कार सर आमच्या जमिनीचा ७/१२ चा तहसीलदार मध्ये नाही रेकॉर्ड आणि ऑनलाईन सुद्धा नाही ,,पण त्या सर्वे नंबर चा घटबूक नकाशा मध्ये ते क्षेत्र आहे, व जुना विकत घेतल्याचा सुद्धा पुरावा आहे, तर नवीन ७/१२ मिळणेसाठी काय करावे लागेल?
२) ७०ब अन्वये ताबा सिद्ध करणेसाठी कोणता पुरावा सक्षम व कायदेशीर असेल.
३) ४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनीची विक्री २०१० साली कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर विक्री झाली आहे , हि झालेली विक्री रद्द करणेसाठी काय करावे लागेल?
४) ७०ब चा अर्ज केल्यानंतर माननीय श्री तहसलीदार कायदेशीर चौकशी करणेसाठी शेतजमिनीवर लागवड कोणी केली हे बघण्यासाठी स्वतः येऊ शकतात का? येण्यासाठी विनंती केल्यावर येऊ शकतात का? आपण मार्गदर्शन करावे विनंती ,,.
आपण जनसामान्यांसाठी ही वेबसाईट सुरु केल्याबद्दल मनपूर्वक आभार ..
१. ७/१२ नसेल तर केवळ गटबुक नकाशा असून उपयोग नाही .
२. ७० ब आपण महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ७० ब चा उल्लेख करत असाल तर , हे कलम हा कायदा प. महाराष्ट्र , कोंकण व खान्देश अथवा उत्तर महाराष्ट्र यास जो लागू आहे त्या अनुषंगाने आहे असे समजून मी उत्तर देत आहे .
या कलमाद्वारे ताबा सिद्ध होत नाही अथवा ताबा सिद्ध करण्याचे कलम नाही . या कलमाद्वारे एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीची कुल /सौरिक्षीत कुल / कायम कुल आहे किंवा होती , हे ठरवण्याचा मामलतदार /तहसीलदार यांना अधिकार आहे .
या साठी आपण या कायद्याची कलम २(१८),२(५) ,२(६), ४ हे कलमे वाचा .
३. कलम ८४ क क प्रमाणे शर्थ भंग झाला म्हणून कारवाई सुरु करणे आवश्यक .
४.उपलब्ध पुराव्यावरून व्यक्ती मानीव कुल आहे कि नाही हे पाहण्याचे असते . स्थळपाहणी आवश्यक नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
02-10-2017
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर
वर्ष १९२२ फेरफार क्रमांक ३४२ ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये कॉलम मध्ये होते , या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , या प्रकरणावर मला खालील दोन प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती
१) जर ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये आहे मग तो इतर हक्कामध्ये कसा गेले आणि या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , तर या वेक्तीचे नाव परत फेरफार क्रमांक ३४२ प्रमाणे १९५८ नंतर परत भोगवटाच्या कॉलम मध्ये कसे येऊ शकते .
२) ''अ '' या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले तर या वेक्तीचे नाव परत मालकी हक्का मध्ये येऊ शकते का .
आपण ७/१२ वर नमूद सर्व फेरफार पहा . त्यावरून आपणास कळून येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
02-10-2017
shankarbkakade@gmail.com
नमस्कार सर
एका व्यक्तीने 2010 साली जमीन विक्रीसाठी नोंदणीकृत साठेखत तयार करून दिले खरेदी घेणाऱ्याने त्यासोबत कुलमुखत्यार सुद्धा करून घेतले आणि २०१७ ला त्याने कुलमुखत्यार पत्र व साठेखतावरून खरेदीखत तयार केले आहे, ह्या प्रकरणात कायम खरेदीचा उल्लेख हा साठेखतात आहे , पण ज्याची जमीन आहे तो खरेदीखत साठी सह्या करायलाच गेला नाही, सध्या प्रकरणात केस चालू आहे ,कुलमुखत्यार पत्राद्वारे खरेदी देता येते का?
जमीनदाराळ त्याची जमीन परत मिळू शकते का? तो साठेखतात घेतलेली रक्कम परत करायला तयार आहे ,,मागील उत्तर बघितले कि साठेखताची मुदत फक्त ३ वर्ष असते ..मार्गदर्शन करावे ,,,
कुल मुखत्यार द्वारे , जमिनीची विक्री करता येते .
कुल मुखत्यार- पत्र म्हणजे , मालकाचे वतीने काम पार पाडण्यासाठी नेमलेली व्यक्ती .
जमीन परत मिल्ने अश्यक्य .
जर कुलमुखत्यार पत्र करताना फसवणूक झाली असेल तरच फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल करून खरेदी खत रद्द करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chandu
01-10-2017
chandurameshshinde@gmail.com
नमस्कार सर , मी पाच
वर्षे पूर्वी ग्रामपंचायत हद्दी मध्ध्ये रजिस्टर अग्रीमेंट करून प्लॉट विकत घेतला. हे अग्रीमेंट माझ्या एकट्याच्या नावानी केले आहे , त्यात बायकोचे नाव नव्हते.मग ग्रामपंचायती कडून रीतसर परवानगी घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले . ग्रामपंचायतीना माझी कुठलीही पूर्व परवानगी नसताना बायकोचे नाव आठ अ वर टाकले आणी टॅक्स पावती वर टाकले.मी तक्रार केली असता ग्रामपंचायत म्हणते की तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही , आठ अ हा फक्त महसूला पुरताच आहे , त्या मुले कुणाची मालकी सिध्ध होत नाही. तसा
शिक्का देखील आठ्या वर मारून
दिला आहे. त्यांनी हेही सांगितले कि
तुम्ही एकटे रजिस्टर अग्रीमेंट करून घर कुणालाही विकू शकता.
प्रश्न १ - हे बरोबर आहे का ?
प्रश्न २ - पुढे मी हे घर विकल्यास नवीन मालकाचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ध्ये चढवण्यास बायको आडकाठी आणू शकते का ?
जर आपण खरेदी खतात पत्नीचे नाव टाकले असल्यास , पतींचेही नाव अससेसमेंट रजिस्टरला येणार . मात्र जर पत्नीचे नाव खरेदी खतात नसेल तर पत्नीचे नाव अससेसमेंट रजिस्टरला येण्याचा प्रश्न येत नाही . आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कांचन कराई
01-10-2017
kanchan@kanchankarai.com
कडई पत्रक म्हणजे काय? त्यचा उपयोग काय? कडई पत्रक आजही बनवले जाते का?
Question by संदेश नाईक
01-10-2017
sandesh.naik2@gmail.com
धर्मादाय प्र्योजनासठि कोण कोणत्या जमिनी शासनाकडुन देण्यात येतात
धर्मदाय प्रयोजनासाठी जमीन देण्यात येत नाही .
पूर्वी देवस्थान चे पूजे अर्चा , दिवाबत्ती या साठी जमीन देण्याची प्रथा होती . आता या कारणासाठी जमीन दिली जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by HEMANT DONDE
01-10-2017
hemant_donde@rediffmail.com
Dear Sir,
My father died in year 1999. while searching old records of kharedi khat of year 1985 , we found that his name is baban instead of bhagwan. can we as his legal heir take objection in this regard of sale deed carried in the year 1985. At present I have found 2 plots sold in this manner.
Thanks
Regards
Hemant
It is almost 32 years since the sale deed has been executed . You will have to challenge the sale deed in civil court . But explaining 32 years delay is difficult task . Beside your father is dead , it is difficult to prove about the real name .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल पाटील
29-09-2017
rhlptl112@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी असून मला माझ्या मुलीच्या शिक्षनकामी तहसील कार्यालयाकडून अल्पभूधारक चा दाखला हवा आहे परंतु तहसीलदार मला यासंबंधी शासन निर्णय नाही असे कळवितात तरी कृपया मला आपल्याकडून सदरील विषयी मार्गदर्शन व शासन निर्णय असल्यास सांगा.
तहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे . आपला गाव नमुना ८ अ व शपथ पत्र दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
29-09-2017
pankajkagane@gmail.com
अ ब क ड यादी चौथी आवृत्ती याबाबत थोडक्यात मार्गदर्शन करावे व सदर पुस्तक PDF स्वरुपात उपलब्ध असल्यास कृपया माझे इ-मेल आयडीवर पाठविण्याची कृपा करावी.
Question by कुमार हासे
29-09-2017
kumar.hase7777@gmail.com
सर माझे आजोबा यांचे मूळ गावी त्यांची वडिलोपार्जीत जमीन व घर होते.परंतु आजोबा २ ते ३ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील मयत झाल्याने आजोबाचे पालन त्यांचे आत्याने केले.परंतु आजोबाचे नावावर त्यांचे नावावर कोणतीही मिळकत झाली नाही.त्याबाबत मार्गदर्शन मिळावे.कालावधी (१९५०-१९६०)
कोणतीही गोष्ट विहित वेळेत होणे / करणे आवश्यक असते . कायद्यात law ऑफ limitation ला महतव आहे . ५० वर्षाहून अधिक विलंबाबत कोणते कारण आपण देणार .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jayant Mutha
29-09-2017
jayantmutha@yahoo.com
नमस्कार सर,
आचारसंहिता लागू असताना ग्रामपंचायतची मासिक मिटींग घेणे आचारसंहितेचा भंग होतो काय ?
मतदारावर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय मासिक बैठकीत घेता येत नाहीत .
बैठक न घेणे हितावह
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pawan
29-09-2017
Pawanrodge@gmail.com
सर
Maza garala lagun shezaril garcha darwaja ha javalpas 2 foot amacha haddit yeto tyamole amhi amche bandhkam kartani 3foot he atikramnit manjech sarkari jagevar kele ahe pan ata roj vad hotat tya karnastav kortamede case taklyas tyacha fayada hoile ka sir those margdarshan kara
आपापसात चर्चेने प्रश्न सुटतो का पहा ?
न्यायालय कालावधी खूप जाईल . आर्थिक / मानसिक त्रास आहेच .
या अपरोक्ष न्यायायालयत गेल्यास , आपला प्रश्न कायमचाही सुटू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
28-09-2017
shankarbkakade@gmail.com
नमस्कार सर
प्रश्न असा आहे की, XXX ह्या व्यक्तीचे ६ मुले होती
A,B,C,D,E,F त्याप्रमाणे ‘’A’’ ह्या मोठ्या मुलाचे नाव (ए.कु.मॅ.) म्हणून लागले असेल जुना फेरफार नाही बघितला,
त्यावरून १९५३ साली A हा मयत झाला, परत फेरफार वर ‘’P’’ ए कु पू म्हणून त्याच्या मुलाचे नाव दाखल झाले,फेरफार बघितला,
त्यांनातर असाच त्याच्या ३ मुलांची नाव दाखल झाले आता ह्या प्रकरणात बाकी C ह्या मुलास कुठेच हिस्सा मिळाला नाही , फक्त एका ६ गुंठे जमिनीवर B,C,D,E,F च्या वारसांची नावे आहेत . पण P चे नाव नाही त्या जमिनीवर, P चे वारस म्हणतात की तुमचं काहीही हिस्सा नाही जमिनीत आणि C हा लवकर मयत झाला होता म्हणून वारसा हक्क डावलला गेला, सगळ्या जमिनीवर P च्या वरसांची नावे आहेत तर अत्ता C च्या व अन्य वारसाना त्यांचा हक्क मिळू शकतो का? कोणता पुरावा लागेल वारसा सिद्ध करण्यासाठी? कृपया
ज्या फेरफाराने केवळ A च्या वारसांची नवे लागली तो फेरफार व नंतरचे फेरफार उपविभागीय अधिकारी यांचेकडे आव्हानात करा . अन्य पुराव्याची गरज नाही . फेरफारवरून चित्र स्पष्ट होत आहे हि कि मिळकत XXX ची होती . पर्यायावे त्यांचे सर्व वारसांची नवे लागणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोविंद उचले
27-09-2017
govind9226@gmail.com
सर मी जानेवारी २०१६ मध्ये नांदेड शहराला लागून असलेल्या वाडी बु.ग्रामपंचायत हद्दीत प्लॉट घेतला आहे .मला आता बांधकाम करावायचे आहे पण जानेवारी २०१६ पासून ग्रामपंचायतचे बांधकाम परवानगी अधिकार बंद झालेत आहेत .ते नगररचना ला गेले आहेत असे समजले पण नगररचना म्हणत आहे कि तुमचे ले आउट ग्रामपंचायतचे असल्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही .आतावर्ग २ ग्रामपंचायतिचे परवानगीचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात आहे आहेत असे समजले . म्हणून आता प्रस्ताव तहसील कार्यालय येथे जमा केला आहे .पण अद्याप कार्यवाही काहीही झालेली नाही .सर मला परवानगी कधी व कशी मिळेल एवढे सांगा.
ज्या क्षेत्रासाठी प्रादेशिक योजना अस्तित्वात आहे किव्वा अस्तित्वात आली आहे , त्या क्षेत्राचे नियोजन प्राधिकारी जिल्हाधिकारी आहेत . म्हणजे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व्यांना आहेत . जिल्हाधिकारी त्य्नाचे अधिकार तहसीलदार अथवा प्रांत अधिकारी यांना प्रदान करू शकतात . त्या प्रमाणे नांदेड येथे , तहसीलदार यांचेकडे विकास परवानगी अधिकारी देण्यात आलेले असतील . तहसीलदार यांचेकडून परवानगी देण्यास विलंब झालेला असेल तर त्यांना हि बाब निदर्शनास आणून द्या , अन्यथा जल्हाधिकारी यांचेकडे विचारणा करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
26-09-2017
pankajkagane@gmail.com
महोदय माझा प्रश्न असा आहे महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तीका खंड - ३ मध्ये विहीत केलेले नोंदहवीचे नमुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तीकाशी मिळतेजुळते आहेत पण त्यामध्ये प्रकरणाचा प्रकरण क्रमांक व परीच्छेद क्रमांक वेगळा दिलेला आहे. मग कार्यालयीन कामे करतांना वापरण्यात येणारी नोंदवही MLRC खंड - ३ प्रमाणे ठेवावी कि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तीका मध्ये विहित केलेल्या नमुन्यानुसार ठेवावी. याबाबत योग्य मार्गदर्शन करावे.
आपणास ज्या कार्यालयाचे नमुने ठेवायचे आहेत त्या कार्यालयाचे नमुने खंड ३ प्रमाणे ठेवणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय ओरके
26-09-2017
s.d.orke@gmail.com
सर, मी व माझी पत्नी दोघेही शासकीय सेवेत आहोत. आम्ही शासकीय निवासस्थानात राहतो. नियमानुसार आमचा दोघांचाही घरभाडे भत्ता कापला जातो. निवासस्थान माझ्या नावावर असल्यानं माझ्या वेतनातून सेवा व अनुज्ञप्ती शुल्क कापले जाते. आता माझी बदली झाल्याने ते निवासस्थान माझ्या पत्नीच्या नावे व्हावे यासाठी मी साप्रवी कडे अर्ज केला. साप्रविने 6 महिन्यानंतर सादर निवासस्थान पत्नीच्या नावे केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दंड भरणाबाबत सांगतात. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण घरभाडे दोंघांचे कट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आपण वेळीच हि बाब आपले कार्याचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .
आपली बदली ते पतिणीचे नवे घर होई पर्यंत आपण अनधिकृतपणे घरात राहत होता असा निष्कर्ष आपले विभागाने काढला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे निदर्शनास हि बाब आणून द्या . घरभाडे भारत असले बाबाबत त्यांना पुरावा द्या . कदाचित ते दंड माफ करतीलही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh kahare
24-09-2017
rajeshkahare@gmail.com
सर गावातील वाहून जाण्याऱ्या सांडपाण्यान्यावरून खातेदाराने शेती ओलीत करण्या करीत परवानगी मागितली आहे तशी परवानगी देता येते का, कोणत्या कलमाखाली देता येईल
शासनाचे मालकीच्या स्रोतावरून पाणी घेण्याचे असल्यास कलम ७० व जमीन महसूल नियम अंतर्गत परवानगी देता येते . गावातील सांडपाणी , हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आहे . त्यामुळे त्याची परवानगी देण्याचे अधिकारी ना. तहसीलदार यांना नाहीत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर माणिक पाटील
24-09-2017
sagar.brfl@gmail.com
सर ,
आपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला आभारीं मजा प्रश्न डॉ.संजय कुंडेटकर सर यान आहे .सर माझ्या आजोंबांची २२ गुंठे जामीन ही पाटील इनाम ची होती. परंतु ते मानसिक रोगी व वेसनी असलाय मुळे १९४० साली माझे मोठे चुलते धोंडीराम पाटील वय 1 वर्ष व तायला आज्जी आ.प .का . अशे बक्षीस पात्र केले. नंतर त्या जमिनीला २८/४/४९ रोजी धोंडीराम पाटील आ .प .का .ला कुल केशव व आनंद पाटील संरक्षित कुल कलाम ३ अ प्रमाणे नोंद झाली असा फेरफार सापडतो. नंतर दिनांक १९/३/१९५५ रोजी कुल कायदाय मुळे धोंडीराम पाटील आ .प .का( आज्जी ) .ला इतर हक्कात आनंद पाटील साधें कुल १/२ हिस्सा फक्त अशी नोंदीचा फेरफार आहे .नंतर १९/९/१९६१ रोजी कोर्ट वाटणी पत्रक करून ती जमीन आमच्या वडील माणिक पाटील वय ७ वर्ष याना कोर्ट वाटणीपत्रक तुन मिळाली पुढे ती कुल असलेली व्यक्ती मरण पावली . पण माझे वडील माणिक पाटील आ. प .का (आज्जी ) अशी नोंद झाली वडील आ प का होते.व नंतर काही दिवसांनी माजी आज्जी पण मरण पावली . त्या मुळे त्यांना ती जमिनी बद्दल जास्त माहिती नव्हती तर आज रोजी ७/१२ वरती भोगवटादार माझे वडील माणिक पाटील आ प का (आज्जी ) व इतर अधिकार मध्ये आनंद पाटील (मयत आहेत ) साधें कुल ३ प्रमाणे अशी नोंद आहे परंतु त्यांच्या वारसांनी नोंद वडील आ प का असलाय मुळे झाली नाही किंवा त्यांनी केली नाही ही माहित नाही परंतु गाव नमुना १२ मध्ये आज पर्यन्त जमीन कसणाराचे नाव पीक पाहणी सादरी आनंद पाटील ह्यांचं वारसांची नवे लागली आहेत . तर मला काही प्रश्नांची उत्तर मिळतील काय
१) माझे वडील आ प का असलाय मुळे त्यांना कुल लागू होते काय .
२)त्यांनी ३२ ग केले नाही . तर त्यांचे ३२ ग होणार काय .
३) जमीन पाटील इनाम असली मुळे त्याची वरती सरकार नाव पडले आहे आमाला माहित नसली मुळे व कुळ च्या वारस साने सरकार नाव कमी करण्य साठी कोणतीही रक्कम कोषागारात भरली नाही. तर ती जी रक्कम मी भरू शकतो का .
४) कुळाने आज पर्यंत कोणतयाही प्रकारचा खंड किंवा काही सुद्धा दिलेले नाही तर तो इतर अधिकारात जे कुल आहे ते मयत असून ते नाव कमी करता येईल का ?
५) सर कायदीशीर प्रकारे मला ती जमीन कशी परत मिळेल . आणि मिळत असेल तर कशी कृपया कळवा .
६)आत वहिवाटीला कुळाचा मुलाचे नाव आहे पण इतर अधिकारात तीळ कुल ही मयत आहे व त्याला वारस नोंद झाली नाही कारण माझे वडील अजून कागदोपत्री आ प का आहेत तर ते कायदेशे वहिवाट दार आहेत का ?
सर कृपया मार्गदर्शन कर जर हवे असतील तर सर्व जुने ७/१२ व फेरफार मी तुमाला मेल करिन कृपया मार्गदर्शन करा.
.
आपले प्रश्नावरून सामुर्ण माहिती मिळत नाही .
१. एकूण क्षेत्र किती होते ?
उत्तर :- २२ गुंठे
२. सरकारचे नाव मिळकतीस केव्न्हा लागले ?
उत्तर :- १९६२ साली पाटील इनाम खालसा कायदाय मुळे
३. एकूण क्षेत्रापैकी , अर्ध्या क्षेत्रास आपले वडिलांचे लांब का लागले ? पूर्ण क्षेत्रास नाव का लागले नाही ?
उत्तर :- भोगवटा दार सादरी माझ्य वडिलांचे नाव आहे . माणिक पांडुरंग पाटील .आ.प .का अनुबाई प. पाटील (आज्जी ) जी मयत आहे . व इतर अधिकारात साधे कुल आनंद पाटील हे पण मयत आहेत .वारस नोंद झालेली नाही . फक्त पिकपाहणी ला वारस ची नवे आहेत .
४. ७/१२ सादरी सरकारचे नाव लागलेले असताना , आपले व कुळाचे नाव मिळकतीस सध्या आहे का?
उत्तर :- हो आहे .
उपरोक्त प्रश्नांचे अनुषंगाने खुलासा व्हावा . तथपि उपलब्ध माहितीवरून
पाटील साहेब , सध्या मिळकतील सरकार असे नाव आहे . जमीन पाटील इनाम होती . पाटील इनाम नष्ट करणे कायद्यान्वये , जमीन सरकारने परत घेतली असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे सध्या ना तुम्हाला ना कुळांना कोणताही हक्क सांगता येणार नाही .
जमीन regrant करून घ्यायची जरी म्हटले , विलंब खूप दिवसांचा झालेले आहे .
सध्या स्थित जमीन सरकारचे नावे आहे का ?
सरकारचे नाव असल्यास ती या पूर्वी उत्तर दिल्याप्रमाणे , आता आपणास मिल्ने अशक्य आहे .
इनाम जमीन पूर्वी , कब्जेदारना नजरांना भरून घेऊन शासनाने पुनर्प्रदान केल्या आहेत . आता तो हक्क आपलेकडे उरला नाही .
मात्र जर सध्या ७/१२ सदरी , आपले वडिलांचे नाव असेल व इतर अधिकारात कुळांचे वर्षांची असतील , तर कुल हे सौरक्षित कुल असल्याने कृषक दिनी मालक झाले आहे . केवळ ३२ ग अन्वये किंमत होणे हि तांत्रिक बाब झालेली नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
24-09-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
एका जमिनीवर साधे कुल लागले आहे आता त्या जमिनीवर पुन्हा कुल होता येईल का?,,होत असेल तर संरक्षित कुल होण्यासाठी कायदेशीर काय करावे लागेल, कुठे अर्ज करावा लागेल कुल होण्यासाठी?
२) पूर्वीपासून कसत असलेल्या जमिनीला सावकाराचे नाव असल्यामुळे आता कुल होता येईल का?
जर लागलेल्या कुळाकडे खंडाच्या पावत्या नसतील व कधी तोंडी करार सुद्धा झाला नसेल, व कधी कुल लागल्याची नोटीस सुद्धा आली नाही तर ते कायदेशीर कुल मानण्यात येईल का?
३)आपला जमिनीवरचा ताबा सिद्ध करण्यासाठी पिकपाहणी हा पुरावा कोर्टात मान्य होईल का?
पिकपाहणी ला कायदेशीर महत्व आहे कि नाही ?
४) कुळाकडून जमीन मालकाला ३२ ग ची किमात निश्चित झाल्यावर
जमीन विकत किंवा अन्य मार्गाने घेता येईल का?
कृपया आपण मार्गदर्शन करावे जेणे करून कोणाला तरी त्याचा हक्क मिळावा सर आपणास नम्रविनंती,,,
१. सध्या ज्या कुळाचे नाव लागले आहे तो जमीन कोण कसत आहे का ? जर या कुळाचे नाव १९५७ नंतर दाखल असेल तर , १ वर्षाचे आत कुळाचे नवे किंमत ठरणे बंधनकारक आहे . जर किंमत ठरली नसेल व कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालक अश्या कुळाचे नाव कमी करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकतो .
२.जर कुल जमीनकास्ट असेल तर , नव्याने कुळवहिवाट निर्माण होऊ शकत नाही .
३.होय . बऱ्याच प्रकरणात , जर पिकपाहणीस कायदेशीर प्रक्रिया पार पडून नाव लागले असेल ( म.ज.म.अधिकार अभिलेख तयार करणे नियम ३१ ) तर , पिकपाहणी नोंदीचा आधार ताब्यासाठी घेतलेला आहे .
४.कुळाचे नवे किंमत ठरल्यावर , कुळाकडून कलम ४३ खाली परवानगीने खरेदी करता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
24-09-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय सर
आमच्या गावाने १९८२ पासून नगरपालिका वर बहिष्कार टाकला होता व आजही बहिष्कार आहे ,सध्या निवडणूक झाल्या पण आमच्या एकजुटीने बहिष्कार आहे ,आम्हाला नगरपालिका नको आहे, कायमस्वरूपी ग्रामपंचायत हवी आहे सगळ्या लोकांचे हेच मत आहे , तर पुन्हा
ग्रामपंचायत राहण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे विनंती ...
१. आपले ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . कायदेशीर प्रक्रिया पार पडून ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . त्यामुळे आता आपले ग्राम पंचायतीने नागरपालिकेतून स्वतंर होणे अवगढ आहे .
२. ज्या अधिसूचनेद्वारे आपली ग्राम पंचायत नगरपालिकेत समाविष्ट केली आहे , ती अधिसूचना बदल करावी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत chunarkar
23-09-2017
p.chunarkar786@rediffmail.com
कुल कायदा काय असतो
कुळाचे किती प्रकार असतात
कोणत्या कुळाच्या आधारे त्या शेतीवर त्यांच्या वर्सानंच अधिकार असतो
कुल नावाने लागायला साधारणतः किती वर्ष वहिती करावी लागत hoti
१.कुल व जमीन मालक यांचे संबंध , त्यांच्यातील वाद , कुळाने द्यावयाचा खंड , कुळाचे अधिकार , शेतजमिनीचा किफायतशीर वापर व इतर उद्देश या कायद्याचे preamble मध्ये आहेत .
२. सौरक्षित कुल
कायम कुल
कृषक दीना नंतरचा कुल
३.कलम ४० अन्वये कुळवहिवाट हक्क वंश परंपरागत आहे
४. कुल व मालक यांच्यातील कुळवहिवाट हक्क निर्माण होणे आवश्यक . त्यासाठी वहिवाटीची कालमर्यादा नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
23-09-2017
shankarbkakade@gmail.com
श्री किरण पाणबुडे सर
१९४६ ला पंजोबांनी जमीन विकत घेतली आहे कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली आहे तरी ती अजून पर्यंत नावे झाली नाही फेरफार मध्ये त्या जमिनीचा सर्वे नंबर आहे पण त्या ७/१२ वर फेरफार दाखवत नाही,दाखल झाला नाही जुना ७/१२ हि तहसीलदार मध्ये उपलब्ध नाही, आज रोजी त्या ७/१२ वर सावकाराचे नाव आहे व इतर हक्कात साधे कुल लागले आहे, जमीन हि आमच्याच लागवड करत असलेल्या शेता जवळ आहे ,, कायदेशीर दस्त म्हणून खरेदी केल्याचा १९४६ चा पुरावा आहे , जमीन कायदेशीर रित्या मिळण्यासाठी काय करावे लागेल,,, सर आपण मार्गदर्शन करावे ,,
न्यायालयीन आदेशास ७१ वर्षे झाले आहे . विलंब खूप झाला आहे . विलंबाबाबत सबळ कारण दिल्यास , नाव दाखल होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
