जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार,
आमची सामाईक जागा शेतीची आहे ३५ गुंठे सदर जमीन वडीलोपार्जित काळापासून १९५४ पासून आमचे नावे आहे व आम्ही सामाईक भाऊबंदकी आजही लागवड करत आहेत. आमचे जमीनिस लागूनच असलेल्या शेतकरीने जागा विकली की गहन ठेवली त्यावेळी त्यांचे कोर्ट कचेरी चालू झाली असता आमचे इतर ८ शेतकरी ७/१२ वर १९६६ चे कलम १५५ आन्वये प्रकरण चालू आहे असा. उल्लेख आमचेही ७/१२ वर असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्हाला याची सुतराम माहिती किवा पत्र कोणाकडून मिळाली नाही. परस्पर उलेख केला आहे. काय करावे तसेच ही बाब का मान्य करावी . १९६६ चे कलम १५५ आन्वये प्रकरण चालू आहे हा उल्लेख काढून टाकायचा आहे. मार्गदर्शन मिळावे.
पूर्वी अश्या प्रकारचे प्रकरण चालू असावे . तथापि १५५ खाली प्रकरण चालू आहे म्हणून इतर हक्कात शेरा ठेवता येत नाही . आपण या इतर हक्कातील शेरा काढून टाकणे बाबत तहसीलदार याना वू=उन्नती अर्ज द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय ,
अर्जदार - देवाप्पा पांडुरंग संकपाळ राहणार शेगाव ता जत जिल्हा सांगली. माझे वय आता ७८ वर्ष आहे.
विषय- नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांनी चुकीचा आदेश देण्याबद्दल मी न्याय मागण्यासाठी अपील करीत आहे .
महोदय -
माझा अपील अर्ज क्रमांक / न .भू /प्रा सु /१६९४/२०१४ (अर्ज क्रमांक / न .भू ./ अपील एस. आर.१८२८/२०१६) हा आहे . मौजे शेगांव ता . जत जि सांगली येथील सी. सर्वे. नंबर. ३०४ व ३१२ या मिळकतीमध्ये वडिलार्जीत वारसा हक्क मिळण्यासाठी मी १९.०८.२०१४ विनंती अर्ज सादर केला हॊता तरी मी दिलेल्या तारखेला वेळोवेळी हजर राहून माझे पूर्ण पणे म्हणणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली (वि. सा.शिंदे)यांना सांगीतले .
मी माझ्या सि. स. नं. ३०४ व ३१२ पहिल्यापासून या घरामध्ये राहत होतो हे घर वडिलार्जीत आहे .हे घर मोडकळीस आल्यामुळे मी तिथून दोन मिनिटे दूर पाठीमागे राहत आहे.माझे जाबदार हे या घरापासून कमीत-कमी दोन ते तीन किलोमीटर या अंतरावर राहतात .
मी शेगांव तालूका जत जि सांगली येथे माझा जन्म झालेला आहे माझे शिक्षण ,माझ्या मुलांचे शिक्षण सर्व शेगांव गावामध्ये झालेले आहे. माझे कुटूंब शेगांवमध्ये राहते मुलामुलींची लग्न झाल्यापासून आणि माझी पत्नी वारल्या पासून मला कुणाचाही आधार नसल्यामुळे मी अधूनमधून माझ्या मुली- मुलाकडे त्यांना भेटण्यासाठी काही दिवसाकरीता त्यांच्याकडे जात असतो.
याचा फायदा घेऊन जाबदार यांनी माझे वडिलार्जीत घर मला न विचारता पाडून तिथे दुसरी नवीन इमारत बांधण्यासाठी सुरु केली आहे मी त्यांना विचारले मला न विचारता घर का पाडून बांधत आहे. जाबदार यांनी मला धमकी देऊन माझ्या अंगावर येऊन म्हणाले तुझे काही यामध्ये नाही तुला काय करायच आहे ते तू कर जा.
तेव्हा ग्रामपंचायत शेगांव व उपअधिक्षक भूमि अभिलेख सी. सर्वे. जत यामध्ये चौकशी केली तेव्हा माझ्या लक्षात आले यांनी वारसा हक्क लावलेला नाही व मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. व कोणत्याही प्रकारची नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख सी. सर्वे. जत यांचा कडून कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही.
मग मी सर्व घराचे उतारे मिळवून अपील अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली येथे केला. एकही तारीख न चुकता ३ ते ३ १/२ वर्ष तारखेला हजर राहिलो.
दिनांक २०/०८/२०१६ नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत यांनी फक्त जागेची पाहणी करून निर्णय दिलेला आहे. यांनी ग्रामपंचायत शेगांव येथे अपीलदार रहिवाशी आहेत की नाही याची पूर्णपणे चौकशी करायला पाहिजे होती. त्यांनी फक्त जाबदार यांची माहिती फक्त नोंद केलेली आहे जाबदार यांनी ग्रामपंचायत शेगांव येथे कोणतीही माहिती न देता सि. सर्वे. न. ३०४ ते ३१२ ही जुनी इमारत पाडून नवीन बांधकाम सुरु केले होते. त्यामुळे हि जागा अर्धवट बांधकाम झालेले आहे.अपीलदार आणि जाबदार राहण्याचा आणि वहिवाटचा कोणताही संबंध येत नाही मी सर्व पहिल्यापासून रहिवाशी असलेली कागद पत्रे जोडलेले आहेत .
नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांनी दिलेला आदेश अपीलदार हा १९५९ पासून वहिवाट व रहिवाशी नाही. हा चुकीचा निर्णय दिलेला आहे तरी आपण हे समजून घ्यावे हि नम्र विनंती.
आपला नम्र आणि विश्वासू
देवाप्पा पांडुरंग संकपाळ.
नमस्ते सर, माझा प्रश्न असा आहे कि, नियुक्ती खुल्या प्रवर्गातून झालेली असेल, तर जिल्हा बदलीसाठी सदरचे जिल्हयात त्या व्यक्तीच्या मूळ प्रवर्गाची जागा रिक्त असावी कि नियुक्ती खुल्या प्रवर्गातून असल्याने खुल्या प्रवर्गाची जागा रिक्त असावी. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

Question by sadik
06-05-2017
sadik11m@rediffmail.com

Sir 68 gunthe shetjamin asnarya jaminit itar adhikarat tukda ashi nond ahe. Tar ti jamin vikta yete ka
2) sadar jamin parvangi n gheta vikli aslyas kay karave
६८ गुंठे क्षेत्र असेल तर तुकडा असू शकत नाही . जुने फेरफार पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

थोरल्या भावाच्या पत्नी ने स्वताच्या भावाच्या मुलाच्या नावाने ९५ आर ३२ ग कुळाची जमिनीचे आमच्या ,वडिलांनी खरेदी केलेली जमीन न अ शर्थीने शेरा आहे जमिनीचे व घराचे मृतूपत्र RAGISTER झाले आहे ते फसउन केले आहे.ते दोघेपण मयत आहेत ते आम्हाला मान्य नाही ,परंतु मंडळ अधिकारी ,व तलाठी आमची वारसाची नोंद घातली नाही ,मंडळ अधिकारी यांनी निकाल व आदेश त्याच्या बाजूने दिला आहे ,आम्ही हरकत घेतली आहे ,आम्ही कोर्टात ,अपील केली आहे जमीन सध्या आमच्या ताब्यात आहे जमीन एकत्रीकरण आहे वाटणी झाली नाही
मृतुपत्र मध्ये घराचा सुधा उल्लेख आहे
(घराची नोंद वारसाने आमच्या नावाने झाली आहे ,ग्रामपंचायतिने आमची नोंद घातली आहे ,सामने वाल्याने त्यावर हरकत घेतली नाही,
मृतूपत्राला मुद्दे
1)मृतूपत्राला फिजिकल मेडिकल फिट चा दाखला जोडला नाही
त्यावेळेला आजारी होत्या वय 72 वर्षे होते
2)मृतूपत्रवर मिळकतीचा कुठून आली त्याचा उल्लेख नाही
3) मृतूपत्रवर साक्षीदार यांचे नाव चुकीचे आहे
4) मृतूपत्र बरोबर साक्षीदारांची ओळख पत्रे नाहीत आणि साक्षीदार त्या गावाचे नाहीत पत्ता चुकीचा आहे
5) आणि मृतूपत्रात फक्त एवढेच लिहिले आहे कि मृतूपत्र लिहून ठेवते कारण माझा भाचा सांभाळ करतो आणि पुढेही करील म्हणून मृतुपत्र करत आहे
परंतु त्याने मृतुपत्र करून पंधरा वर्षे झाली त्याने सांभाळले नाही किवा आला पण नाही .परंतु आमच्याकडे डॉक्टर चे फाईल पेपर आहेत व सांभाळलेले पुरावे पण आहेत
यावर काय उपाय योजना करता येतील साहेब कृपया लवकर मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती
नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत मधील सिटी सर्वेवर जर वडिलोपार्जित नोंद असेल तर एखादी व्यक्ति मृत्युपत्राण्वये सदरची मालमत्ता परस्पर एका नातवंडाच्या नावे करू शकतो काय? सदर गृहसतास 5मुले व त्यांची 16मुले म्हणजे 16नातवंड असा परिवार आहे.माझ्या माहितीप्रमाणे जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तरच ती व्यक्ति आपल्या मर्जीप्रमाणे मालमत्तेची विल्हेवाट लावू शकतोअन्यथा सर्व नातवंडाचा हक्क अभाधीत राहतो.कृपया योग्य मार्गदर्शन करावे अशी आपणांस नम्र विनंती आहे.
नरेंद्रजी , आपले म्हणणे बरोबर आहे

वडिलोपार्जित मिळकतीतील , केवळ त्यांचा हिस्सा वडील मृत्य पत्राद्वारे नातूंचे नावावर करूशकतात . पूर्ण मिळकत करू शकत नाही . घरामधील एका व्यक्तीचा हिस्सा अलग करू शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब गांवठान मोजणी सन 1983ला होऊन सिटी सर्वे नं पडला पण त्यात चुकीची नोंद झाली आहे.ग्रामपंचायत मधील असेसमेन्ट उतारा प्रमाणे नोंदी न झाल्याने कोर्टकचेरी चालू झाली. माझा प्रश्न असा की कायद्याच्या द्रुष्टीने सिटी सर्वेची नोंद महत्वाची की असेस्मेन्ट उतारा महत्वाचा.असेस्मेन्ट उतारा नोंद सन 1977 पासुनची आहे.कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
नगर सर्वेक्षण चुकीचे असल्यास , त्यास विहित कालावधीत आव्हान देणे आवश्यक होते . आपला विलंब माफ होण्याच्या आशेवर आपण नागरसर्वेक्षण आव्हानित करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादा महसुल कर्मचारी आंतर जिल्‍हा / आंतर विभाग बदलीने बदनुल आला असता, नियुक्‍तीच्‍या जिल्‍हयामध्‍ये दुय्यम सेवा / महसुल अर्हता उत्‍तीर्ण केल्‍या असल्‍यास बदलीनंतरच्‍या जिल्‍हयात संबंधीत कर्मचा-यास शासन परिपत्रक दि १४.०९.२०१६ नुसार पुन्‍हा परिक्षा देण्‍याची आवश्‍यकता नाही. परंतु सदर कर्मचा-यास नियुक्‍तीच्‍या जिल्‍हयामध्‍ये दुय्यम सेवा / महसुल अर्हता परिक्षेतील काही विषयामधुुुन सुट मिळाली असल्‍यास बदलीनंतरच्‍या जिल्‍हयात संबंधीत कर्मचा-यास पुन्‍हा सुट मिळालेल्‍या विषयाची परिक्षा देणे बंधकारक आहे का ?
सूट दिलेल्या विषयांची परीक्षा देणे बंधन कारक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
मी सण 1998 साली २ गुंठे जमीन खरेदी केली आहे त्या वेळी माझे नाव २ गुंठे क्षेत्र साठी मालक सादरी आले आहे सण 1999 साली मी ती जमीन विकली होती त्या वेळी खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात आले आहे.परत 2000 साली ती जमीन मी खरेदी केली आहे आत्ता माझे नाव मालक सदरी येणार नाही का
सध्या आपण जुंचे कडून जमीन खरेदी केली त्यांचे नाव इतर हक्कात कसे आले ? फेरफार पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय साहेब, भुसंपादन कायदा १८९४ अन्वये जमीन संपादित केली गेल्यानंतर जमीन मालकाने सदर जमिनीचा मोबदला म्हणून अॅयडव्हांस रक्कम देखील स्विकारलेली आहे आणि उर्वरीत रक्कम न्यायलायत जमा केलेली आहे, अशा परिस्थितीत सदर जमीन आज रोजी मोकळी आहे तर अशी जमीन मालकाला परत मिळावी यासाठी कायद्यामध्ये काही तरतुद आहे का? तशी तरतुद असल्यास कृपया अधिनियम आणि कलम त्याची माहिती देण्यात यावी. ही नम्र विनंती...
1. नुकसान भरपाई रक्कम न्यायालयात जमा झाली म्हणजे कायद्याने , खातेदारास नुकसान भरपाईची रक्कम दिली असे मानले जाते .
२. १८९४ च्या कायद्यानुसार जमीन संपादन झाली असेल व संपादन प्रयोजनासाठी तिचा वापर होत नसेल तर , अन्य सार्वजनिक कामासाठी अशी जमीन देण्याची आहे . अथवा अश्या जमिनीचा लिलाव केला जातो . ती मूळ मालकांना परत देता येत नाही

भास्कर पिल्ले विरुद्ध केरळ शासन ( सर्वोच्च न्यायालय )
३. २०१३ चे भू संपादन कायद्यात , जमिनीचा भू संपादन प्रयोजनासाठी वापर ५ वर्षात ना झाल्यास परत देण्याची तरतूद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री किरण पानबुडे सर नमस्कार मी तुम्हला फोन करू करु शकतो का ? मदत करा ?...
Nmaskar sir sasan jama jamnisadi kahi paryay ahi kaa? sir tyaver marg sangaa?....
होय. आपली जमीन महसूल न भरल्याने , शासन जमा झाली असल्यास , आपण जमीन परत मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,

माझी रत्नागिरी जिल्ह्यात वडिलोपार्जित जमीन आहे. यातील काही जमीन मुंबई गोआ महामार्ग रुंदीकरणात जात आहे. सदर जमिनी संदर्भात माझे काही प्रश्न आहेत.

सन २००८ साली माझ्या आत्यानी नोंदणीकृत हक्क सोड पत्राद्वारे या सर्व जमिनीवरील आपला हक्क सोडला. त्यानुसार त्यांची नावे देखील ७/१२ उताऱ्यावरून कमी झाली. माझी आजी २००३ साली वारली आणि त्याचा उल्लेख वरील हक्क सोड पत्रात देखील आहे. परंतु, २००९ साली माझ्या आजीचे वारस म्हणून आत्यांची नोंद परत ७/१२ उताऱ्यावर करण्यात आली.
माझे प्रश्न असे आहेत कि,
२००९ साली माझया आत्याच्या नावांची परत करण्यात आलेली नोंद कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का?
२००९ साली परत करण्यात आलेली नोंद, मी रद्द करू शकतो का? आणि त्यासाठी मी कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करू?
आपल्या उत्तरामुळे मला फार मदत होईल.
धन्यवाद....
आत्याने जर नोंदणीकृत दास्ताने हक्क सोडला असल्यास तिचा हक्क संपलेला आहे . नुकसान भरपाई रक्कम देण्यासाठी काला ( CALA -Competent Authority Land Acquisition) यांची नोटीस प्राप्त झाल्यावर , त्यांना हक्क सोड पात्र दस्त दाखवा . तसे आपले म्हणणे सादर करा .
आत्याचे लावणे चुकीचे आहे . कदाचित आपण हक्क सोड पत्र आजी मयत झाल्यावर , वारस नोंद होताना , हक्क सोड पत्र तलाठी / मंडळ अधिकारी यांना सादरकेले नसेल . तथापि आपण सध्या उपरोक्तनमूद केल्याप्रमाणे , काला यांना हक्क सोड पत्र दाखवून आपली नुकसान भरपाई रक्कम प्राप्त करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मला जमीन खरेदी विषयी थोड़ी माहिती हवी आहे
सर मला 2 गुंठे शेती जमीन एका व्यक्ती कडून घ्यायची आहे तो सध्या तेथे राहत आहे आणि त्याची घराची नोंद ग्रामपंचायत मधे आहे तर या व्यवहारात खरेदी होईल की नोटरी आणि आणखी काही पर्याय आहे का। धन्यवाद
१.जमीन रहिवासी वापर विभागातील असेल तर , तुकडे बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाही .
२. जमीन नोंदणीकृत दस्ताने खरेदी करा . notarorized दस्तास कायद्यात आधार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मला एक प्रश्न विचारायचा आहे आमचा एक घर आहे ते १९९४ पासून ग्रामपंचायत मध्ये माझ्या नावावर आहे व सदरील घर हे १९९४ च्या आधी मोकळी जागा होती नगरपंचायत मध्ये सगळे फेरफार व्यवस्थित झाले आहेत पण माझ्या नावावर PR कार्ड नाही व घरच्या पण कोणाच्या नावावर pr कार्ड निघत नाही आम्ही १९88 पासून येथे राहत आहोत तर PR CARD नसेल किंवा दुसर्याच्या नावावर असेल तर?
बहुतेक सिटी सर्वे ला नोंद झाली नसावी त्या काळात
आपले घर ग्राम पंचायत मध्ये असताना , गावठाणात असेल व गावठाणाचा सिटी सर्वे झाला नसेल तर प्रॉपर्टी कार्ड , काढले जात नाही .
आता आपण नागरपंच्यात मध्ये समाविष्ट झालेले आहेत . नागरपंचायतने , सिटी सर्वे करणे बाबत , अधीक्षक भूमी अभेलेख यांना प्रस्ताव देणे आवश्यक . सिटी सर्वे झाल्यावर , नगर पंच्यात क्षेत्रासाठी , प्रोप्रेर्टी कार्ड निघेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका महिलेचे लग्न होऊन दोन वर्षे झालेली आहेत. तरी, सदर महिलेसाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढावयाचे असल्यास त्यांचे करीता कोणाचे उत्पन्न ग्राह्य धरावे लागेल ?
जर वडिलांचे उत्पन्न ग्राह्य धरावयाचे असेल परंतु, वडील हयात नसल्यास किंवा वडील कमावते नसल्यास अशा प्रसंगी कोणाचे उत्पन्न ग्राह्य धरावे ?
कमावते नसले तर उत्त्पन्न शून्य धरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Milan bhoir
26-04-2017
rajp390.rp@gmail.com

जमीन विकसकाला देताना कोणती खबरदारी घ्यावी किंवा विकास करार कसा असावा
legal drafting पुस्तकातून model नमुना घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत मध्ये नमुना ८ वर वारसांची नोंद करण्यासाठी मुदतीची आवश्यकता असते का ? २० वर्षानंतर वारसांची नोंद करता येते का ? जाहीर प्रगटन देऊन केलेली वारसांची नोंद कायदेशीर असते का?
अधिकारी यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागत यांनी द्यावयाची चिट्ठी हि शासन निर्णय दि ७-५-१९३० अथवा इतर शासन निर्णय असेल तर त्याची प्रत उपलब्ध होणेस विनंती
आदरणीय सर, मला १.०२ हेक्टर जमीन होती. यातील .०.५१ आर जमीन मी विकली आहे. सदर जमिनीमधुन मला आता ०.१० आर जमीन परत घ्यावयाची आहे.सदर जमीन माझ्या जमीनीलगतच असुन मुळातच सध्या तिचा वहिवाट मी करीत आहे. सदर जमीन विकताना ०.४०आर ऐवजी ०.५१आर खरेदी दिली गेली. खरीददार १०आर परत करावयास तयार आहे. सदर शेत जमीन बागायती आहे. जर १०आर खरेदी करावयाची असेल तर तुकडाबंदी कायदा लागू होतो का? जर खरेदी करावयाची असेल तर कशी करता येईल.कृपया मागॆॆदशॆन व्हावे.
मूळ खरेदीत शुद्धी पत्रक करता येईल का याचा प्रयतन करावा

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही . खरेदी खत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार मी अविनाश शिंदे मी २०१५ साली ९ एकर जमीन घेतली आहे परंतु त्या जमिनी विषयी काही कायदेशीर सल्ला मला आपणाकडून घायचाआहे
सादर जमीन हि माझ्या पणजोबाव त्यांचंया भावाकडे कडे जमीन कस्नयसाठी इसवी सॅन १९५३ साला पासून आहे तसेच १९५३ साली त्यांचे व भावाचे संरक्षित कुल म्हणून नाव लागले परंतु जमीन मालकाने ते कुल म्हणून तहसील समोर कुल हक्क सोडून दिले व तास फेर पडला त्या नंतर १९६३ पुन्हा संरक्षित कुल लागले पण त्या वेलेस पण कुल म्हणून हक्क सोडून दिले व नवीन फेर पडला तदनंतर १९७३ पर्यंत मालकाने मंजुरीने व खंड ने जमीन कसून घेतली व कागतोपात्री कुल म्हणून व इतर हक्कात कधी नाव लागले नाही व आज पर्यंत त्यांनी पीक पाणी खुद्द असे आहे कागतोपात्री आज पर्यंत ते मालक आहेत पण कब्जा आमचा होता
२) त्यांनी आम्हाला जमीन विक्री साठी विचारले आम्ही ती घेतली परंतु माझ्या आजोबांच्या भावाने आमच्या विरुद्ध केस मनाई साठी लावली आहे तरी मला कायदेशीर मार्गदर्शन करावे
कुल मालक हे संभांड केव्हाही निर्माणहोऊ शकतात . आपले आजोबांचे भावाने , जर न्यायालयात , त्यांची वहिवाट सिद्ध केली , तर न्यायालय आपणास मनाई हुकूम देऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखाद्या महसूल अधिकाऱ्याकडे नोंदीबाबत तक्रार केस चालू असताना सदर केस निकालावर ठेवली असता,अर्जदारास आपले लेखी म्हणणे दाखल करता येईल का?दाखल केल्यास सदर मुद्दे निकालपत्रात समाविष्ट केले जातात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
निकालावर ठेवली म्म्हणजे दोनी बाजूंचे पुरावे संपले आहेत . तथपि विरोधी पक्षाने संमती दिल्यास , लेखी म्हणणे देता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, ७/१२ सदरील इतर हक्कात बाँडिंग तगाई बोजा र.रु.....आहे सदर रकम कोठे भरावी लागेल कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
तगाई बोजे कधीं टाकणे बाबत , शासन निर्णय आहे . ( माझ्याकडे प्रत नाही ) . कालबाह्य अंतर हक्कातील बुजे काढून टाकणे बाबत शासन निर्णय आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार

महसूल न्यालयालयाच्या निर्णयाचा अंमल सातबारा वर येण्या पूर्वी ६० दिवसांचा अपील कालावधी जावा लागतो हे खरे आहे का?

धन्यवाद
आवश्यक नाही . मात्र कालावधी पाळला जातो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
२००७ मध्ये नोंदणीकृत खरेदी खताने २ एकर जमीन विकत घेतली. खरेदी देणार पती आणि पत्नी होते. मालक सदरी दोघांची नावे सातबारा उतारावर होते. त्यांना 2 मुली व १ मुलगा असे अपत्य आहेत. खरेदी खतात १ मुली व १ मुलगा यांच्या संमती देणार म्हणून सही घेतलेल्या आहेत. १ मुलगी अमेरिका येथे असल्याने तिची सही घेतलेली नव्हती. जमीन विकत घेताना खरेदी देणार पती व पत्नी यांच्या नावावर ४ एकर जमीन शिल्लक होती व आजही आहे. खरेदी खताच्या आधी दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटिस दिलेली होती.
मागील वर्षी अमेरिकेत असलेली मुलगी भारतात परत आलेली आहे, तिने २०१७ मध्ये मंडळ अधिकारी यांनी २००७ मध्ये मंजूर केलेल्या फेरफार वर नाराज होऊन मा.उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज केलेला असून त्याची नोटिस मिळालेली आहे.
१) मा.उपविभागीय अधिकारी अर्ज मंजूर करतील का?
२) मंजूर फेरफार रद्द होऊ शकतो का?
३) सदर अर्ज बाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो?
योग्य मार्गदर्शन व्हावे.
७/१२ सादरी पती पत्नी होते . सादर मिळकत पती पत्नी यांचे स्व कष्टार्जित मिळकत असावी . त्यामुळे त्यांचे मुलांना त्यात हक्क नाही . त्यामुळे त्यांची संमती घेण्याची गरज नव्हती . मुलीला अपील करून उपयोग होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3