जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा एखादा कर्मचारी उत्‍तीर्ण नसेल तर त्‍या कर्मचा-याला कालबध्‍द पदोन्‍नती देता येते का ? याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, जिल्‍हातील एखादा तलाठी ज्‍या उपविभागामध्‍ये कार्यरत असेल त्‍या ठिकाणाहून त्‍याने दुस-या उपविभागात बदली व्‍हावी म्‍हणून विनंती अर्ज केला व त्‍याची विनंती मान्‍य झाली व त्‍याला जिल्‍हातील दुस-या उपविभागात पदस्‍थापना दिली तर जिल्‍हातील जेष्‍ठतेमध्‍ये त्‍याचे नाव सर्वात खाली टाकले जाते का? तलाठी संवर्गाची जेष्‍ठता फक्‍त उपविभागा पुरती मर्यादीत असते का?
कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
As per MCSR is it essential for ladies in government service to change their maiden name after marraige and get it mentioned in service book to claim maternity leave and expenses. Is change in name necessary at all in service for ladies. Please also give rule or judgements if any.
Thanks.
There is no requirement under Maharashtra Civil Service Rules either under Leave or General Conditions of Service , that , female government servant shall change her name after the marriage to avail the Maternity leave. Even under the Maternity Benefit Act , no such provision exists .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
1994 साली आमच्या जमिनी मधून रस्ता करण्यात आला नंतर 2005 साली त्याचे रुंदी करण्यात आले,आम्ही जमिनी ची शासकीय मोजणी भरली त्यानुसार त्यांनी हद्द दाखवली ,हद्द वरून असे लक्षात आले की सर्व रस्ता आमच्या च्या जमिनी तुन जात आहे.900 फूट लांब आणि 15 फूट रुंद असा रस्ता असून तो सर्व आमच्या जमिनी तुन जात आहे. जमिनी ची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे असे आढळून आले . आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. आमची जमिनी कशी काढून भेटेल .कोना कडे आपिल करावी.कृपया मार्गदर्शन करावे.
रस्ता शास्नानाने , स्थानिक सव्रज्या संस्थेने केला आहे का ? जर त्यांनी रस्ता केला असेल तर , आपली जमीन बाहो संपादन कायद्याखाली संपादन न करता , असा रस्ता करता येत नाही . आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे . आपण जेवढे क्षेत्र रस्ताखाली गेले आहे , त्याची नुकसान भरपाई संबंधित विभागाकडे मागा.
जर आपणास , रस्ता नको असेल तर . आपणास न्यायालयाचा मार्ग पत्करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा सुट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर कर्मचार्याने राहीलेल्या विषयात त्याने किती गुण मिळविणे आवश्यक आहे ? या बाबत माननीय न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत काय ? याबाबत सखोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आदरणीय सर,इमारत बांधकाम करणेसाठी २०१२-१३ मध्ये गौणखनिजचे उत्खनन करण्यात येऊन त्याचा वापर त्याच जागी केलेला आहे.परंतु त्याबाबत मा.तहसीलदार साहेब यांनी तीन पट दंड भरणेची नोटीस काढल्यास त्या नोटीसवर मा.प्रांत साहेब यांचेकडे अपील करणे योग्य होईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, मुखत्यारपत्र म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
एखादा काम स्वतः करण्या ऐयवैजी दुसर्याने करण्याकरता त्यास प्राधीकृत करणे .
कृपया भारतीय करा कायदा १८८२ चे प्रकरण १० , कलाम १८२ ते २३८ वाचा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भोगवटदार वर्ग-१ जमीन म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
जमीनहस्तांतरांवर निर्बंध नसलेली जमीन म्हणजे , भोगवटादार वर्ग १ जमीन

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
13-05-2017
vv_rt@rediffmail.com

नमस्कार सर

एका अर्जदाराने नॉन क्रिमिलयेर दाखला मिळणेसाठी अर्ज केला आहे परंतु जातीचे दाखला हा ऊत्तर प्रदेश चा कुशवाह जातीचा जोडला आहे
तर त्याला महाराष्ट राज्यत राज्याचे किंवा केंद्र शासनाच्या नॉन क्रिमिलयेर देता येऊ शकते का thank u sir
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी B चे पुढे आहे. दोघांनीही पहिली संधी वापरून महसूल अहर्ता परीक्षा दिली आणि A कर्मचारी नापास झाला व B कर्मचारी परीक्षा पास झाला तर बी कर्मचाऱ्यास लगेचच पदोन्नती देण्यात येते का ? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली वेळ दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळविले व तो परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होईल का ? कृपया याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, वाजीब-उल-अर्ज म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (लिपिक संवर्ग) ही परीक्षा दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर परीक्षेत राहीलेल्या प्रत्येक प्रश्न पत्रिकेत 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले तर संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे घोषित केले जाते काय ? ( 3 विषयात सूट मिळाली व 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली आहे. ) कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, स्थायी आदेश नस्ती म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, महसूल अपील प्रकरणामध्ये रीतसर चौकशी कशाप्रकारे केली जाते? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे. खूप मोठी मदत होईल सर.
नमस्कार सर,
पदोन्नती साठी कोणकोणते निकर्ष लागतात.
कोतवालाना 25 टक्के शिपाई होण्याकरता जागा राखीव आहेत.या जागा जाती नुसार भरण्यात येतील कि आपली सेवा किती वर्ष झाली, आपले शैक्षणिक पात्रता किती उच्च, किंवा शिपाई संवागातील एख्यादया जातिच्याची पदोन्नती झाली,तर ती जागा कोतवालामधून त्याच जातीच्या उमेदवाराणे भरली जाईल का?
नमस्कार सर,
मला वसुली बाबत माहिती पाहिजे आहे, जसे कि एखादी वाळू ची ट्रक धरली असता त्याच्याकडून किती royalties रक्कम भरून घ्यायची ,जर तो मालक त्याच ठिकाणी (रस्तावर) जर ती रक्कम भरण्यास तयार असेल तर ती रक्कम घ्यायची का ? रक्कम तहसीलदारच घेवू शकतात का?
इतर कर्मचारी हि ती रक्कम घेवू शकतात. जेव्हा तो रेती मालक royalties ची रक्कम भरतो त्यावेळी आपण चलन काढलेले नसते, जर तो मालक पावती मागत असेल तर त्याला पावती कशी द्यायची ? जर आपल्याकडे पावतीचा फॉरमॅट असेल तर तोही मला इमेल वर पाठवावा.
धन्यवाद
माझ्या जमिनीची मोजणी होऊन मला क प्रत मिळाली आहे.तरी लगतदार शेतकरी अतिक्रमण काढून देत नाही. त्याच्यावर पुढची प्रोसेस करून मला अतिक्रमन काढून मिळण्याची तारीख मिळाली.गावचे तलाठी, सर्कल वगैरे लोक आले.व या तलाठी सर्कल यांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या तशी मागणी केली.ऐन वेळी पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही याची कल्पना मला नव्हती परंतु तलाठी सर्कल यांनी त्या शेजाऱ्याबरोबर संगनमत करून अतिक्रमण काढण्यास नकार दिला त्यापूर्वी २ दिवस आधी त्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढू नये म्हणून स्टे ची दिवाणी केस दाखल केली. आता पावसाळ्यापूर्वी आणि त्या स्टे ची नोटीस मिळण्यापूर्वी मला ते अतिक्रमण काढून मिळावे यासाठी मी काय करावे.कृपया मार्गदर्शन करा मी शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाने आणि धमक्यांने वैतागलो आहे.
वरिष्ठ दिवाणी कोर्ट मधून स्टे खारीज करावा

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझा दिनांक ८ एप्रिल २०१७ चा प्रश्न - क्षेत्र हे गावाच्या शिवेजवळ आहे. क्षेत्राची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे.सदर क्षेत्राची २ वेळेस हद्दकायम मोजणी केलेली असून दोन्ही वेळेस आलेल्या खुणा ह्या एकच आहेत. जमिनीच्या लगत असलेला शिव रस्ता च्या पलीकडे हद्दीच्या खुणा मोजणीदार यांनी दाखविलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. सदर रस्त्याचे क्षेत्र मिळेल कि नाही

Question by SANKET
08-05-2017
sanketgujar@gmail.com

आदरणीय साहेब, आपण आपल्या कामांमधुन वेळात वेळ काढुन देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. माझा पुढील प्रश्न पुढीलप्रमाणे – संपादित जमीनीचा मोबदला देण्यात येतो त्यापैकी अर्धवट रक्कम स्विकारलेली आहे आणि अर्ध्या रकमेचा एक भाग न्यायालयात आणि एक भाग इन्कम टॅक्स विभागात जमा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सदर जमीनीचा शासनातर्फे केवळ कब्जा घेण्यात आलेला नाही म्हणुन, सदर मिळकत भुसंपादन कायदा -१८९४, कलम ४८ पोटकलम १ अन्वये मुळ मालकाला परत देता येउ शकते का तशी कायद्यामध्ये तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती..
जमीन मूळ मालकाला परत मिळणार नाही

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

नमस्कार सर , गट नं २६६ बागायत (१.४७ हेकटर + ५ आर पॊटकराब ) मध्ये ४ हिस्से करावयाचे आहेत A . ४० आर , B . २३ आर , C . ४२ आर व D . ४२ आर + ५ आर पोटकाराब. तसेच गट नं ६६ (जिरायत ३५ आर) मध्ये B . १८ आर व D . १७ आर .
वरीलप्रमाणे चार भावांचे चार हिस्से करावयाचे आहेत तरी सर्वांचे स्वतंत्र ७/१२ उतारे होतील का कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती . गावाचे नाव टाहाकली तालुका धरणगाव जिल्हा जळगाव
आदरणीय सर,पूर्वी निवासी प्रयोजनासाठी बिनशेती आदेश घेतला होता.परंतु मनपा.कडून व्यावसायिक प्रयोजनासाठी परवानगी घेऊन त्यानुसार बांधकाम केले असल्यास बिनशेती आदेश व्यावसायिक प्रयोजनासाठी करण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
वापरात बदल ची महसूल अधिकारी यांची परवानगी घावी

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

नमस्कार,
आमची सामाईक जागा शेतीची आहे ३५ गुंठे सदर जमीन वडीलोपार्जित काळापासून १९५४ पासून आमचे नावे आहे व आम्ही सामाईक भाऊबंदकी आजही लागवड करत आहेत. आमचे जमीनिस लागूनच असलेल्या शेतकरीने जागा विकली की गहन ठेवली त्यावेळी त्यांचे कोर्ट कचेरी चालू झाली असता आमचे इतर ८ शेतकरी ७/१२ वर १९६६ चे कलम १५५ आन्वये प्रकरण चालू आहे असा. उल्लेख आमचेही ७/१२ वर असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्हाला याची सुतराम माहिती किवा पत्र कोणाकडून मिळाली नाही. परस्पर उलेख केला आहे. काय करावे तसेच ही बाब का मान्य करावी . १९६६ चे कलम १५५ आन्वये प्रकरण चालू आहे हा उल्लेख काढून टाकायचा आहे. मार्गदर्शन मिळावे.
पूर्वी अश्या प्रकारचे प्रकरण चालू असावे . तथापि १५५ खाली प्रकरण चालू आहे म्हणून इतर हक्कात शेरा ठेवता येत नाही . आपण या इतर हक्कातील शेरा काढून टाकणे बाबत तहसीलदार याना वू=उन्नती अर्ज द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय ,
अर्जदार - देवाप्पा पांडुरंग संकपाळ राहणार शेगाव ता जत जिल्हा सांगली. माझे वय आता ७८ वर्ष आहे.
विषय- नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांनी चुकीचा आदेश देण्याबद्दल मी न्याय मागण्यासाठी अपील करीत आहे .
महोदय -
माझा अपील अर्ज क्रमांक / न .भू /प्रा सु /१६९४/२०१४ (अर्ज क्रमांक / न .भू ./ अपील एस. आर.१८२८/२०१६) हा आहे . मौजे शेगांव ता . जत जि सांगली येथील सी. सर्वे. नंबर. ३०४ व ३१२ या मिळकतीमध्ये वडिलार्जीत वारसा हक्क मिळण्यासाठी मी १९.०८.२०१४ विनंती अर्ज सादर केला हॊता तरी मी दिलेल्या तारखेला वेळोवेळी हजर राहून माझे पूर्ण पणे म्हणणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली (वि. सा.शिंदे)यांना सांगीतले .
मी माझ्या सि. स. नं. ३०४ व ३१२ पहिल्यापासून या घरामध्ये राहत होतो हे घर वडिलार्जीत आहे .हे घर मोडकळीस आल्यामुळे मी तिथून दोन मिनिटे दूर पाठीमागे राहत आहे.माझे जाबदार हे या घरापासून कमीत-कमी दोन ते तीन किलोमीटर या अंतरावर राहतात .
मी शेगांव तालूका जत जि सांगली येथे माझा जन्म झालेला आहे माझे शिक्षण ,माझ्या मुलांचे शिक्षण सर्व शेगांव गावामध्ये झालेले आहे. माझे कुटूंब शेगांवमध्ये राहते मुलामुलींची लग्न झाल्यापासून आणि माझी पत्नी वारल्या पासून मला कुणाचाही आधार नसल्यामुळे मी अधूनमधून माझ्या मुली- मुलाकडे त्यांना भेटण्यासाठी काही दिवसाकरीता त्यांच्याकडे जात असतो.
याचा फायदा घेऊन जाबदार यांनी माझे वडिलार्जीत घर मला न विचारता पाडून तिथे दुसरी नवीन इमारत बांधण्यासाठी सुरु केली आहे मी त्यांना विचारले मला न विचारता घर का पाडून बांधत आहे. जाबदार यांनी मला धमकी देऊन माझ्या अंगावर येऊन म्हणाले तुझे काही यामध्ये नाही तुला काय करायच आहे ते तू कर जा.
तेव्हा ग्रामपंचायत शेगांव व उपअधिक्षक भूमि अभिलेख सी. सर्वे. जत यामध्ये चौकशी केली तेव्हा माझ्या लक्षात आले यांनी वारसा हक्क लावलेला नाही व मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. व कोणत्याही प्रकारची नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख सी. सर्वे. जत यांचा कडून कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही.
मग मी सर्व घराचे उतारे मिळवून अपील अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली येथे केला. एकही तारीख न चुकता ३ ते ३ १/२ वर्ष तारखेला हजर राहिलो.
दिनांक २०/०८/२०१६ नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत यांनी फक्त जागेची पाहणी करून निर्णय दिलेला आहे. यांनी ग्रामपंचायत शेगांव येथे अपीलदार रहिवाशी आहेत की नाही याची पूर्णपणे चौकशी करायला पाहिजे होती. त्यांनी फक्त जाबदार यांची माहिती फक्त नोंद केलेली आहे जाबदार यांनी ग्रामपंचायत शेगांव येथे कोणतीही माहिती न देता सि. सर्वे. न. ३०४ ते ३१२ ही जुनी इमारत पाडून नवीन बांधकाम सुरु केले होते. त्यामुळे हि जागा अर्धवट बांधकाम झालेले आहे.अपीलदार आणि जाबदार राहण्याचा आणि वहिवाटचा कोणताही संबंध येत नाही मी सर्व पहिल्यापासून रहिवाशी असलेली कागद पत्रे जोडलेले आहेत .
नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांनी दिलेला आदेश अपीलदार हा १९५९ पासून वहिवाट व रहिवाशी नाही. हा चुकीचा निर्णय दिलेला आहे तरी आपण हे समजून घ्यावे हि नम्र विनंती.
आपला नम्र आणि विश्वासू
देवाप्पा पांडुरंग संकपाळ.
नमस्ते सर, माझा प्रश्न असा आहे कि, नियुक्ती खुल्या प्रवर्गातून झालेली असेल, तर जिल्हा बदलीसाठी सदरचे जिल्हयात त्या व्यक्तीच्या मूळ प्रवर्गाची जागा रिक्त असावी कि नियुक्ती खुल्या प्रवर्गातून असल्याने खुल्या प्रवर्गाची जागा रिक्त असावी. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3444
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3