जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by hemant donde
15-03-2017
hemant_donde@rediffmail.com

Namaskar Sir,
Incidentally while searching on mahabhulekh website , we found names in online saath bara of my father,uncle and grand mother along with other 9 other co holders . For this 1 acre land NA Plotting was done .Area covered under these 9 plots is 2540m2,open space is 606 and for road is 800 m2. Adding all these it comes to about it comes to 3946 m2. My question Sir is whether the saath bara which we have in hand dated 9.3.17 in which our names are included under waras nond really have any share . ON saathbara area of plot is 2054 m2.
Thanks ,
Regards,
Hemant

Question by sadik
14-03-2017
sadik11m@rediffmail.com

Sir apan ekhadya vyakti barobar kontahi vyavhar stamp var kela. V to stamp register kela nahi. Tar tya stamp la kaydyacha adhar asu shakto ka? V tya stamp chi mudat kiti.
अनोंदणीकृत दस्ताला पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Namaskar Sir,
Just recently uncle came to us for taking signature regarding some land we own. He told that land is reserved for school and that we hardly have some share in 2240 m2 . when we searched for documents we got an affidavit signed by my grandfather in which it was mentioned 6 hectors in one survey And 4 hectore in other survey which my grandfather had distributed between my father and uncle. My question is should we do against my uncle who is saying that he had purchased land from my father.Also my uncle has sold 1868 m2 out of 2240 in November 2016 and person who has purchased had mafe boundry on entire 2240 m2.
Thanks ,
Regards,
Hemant
Your grandfather has distributed his land among-st your father and uncle by way of affidavit . Find our the survey no which have been allocated to your father ? Obtain 7/12 extracts of those survey no which have been distributed to your father. see whether those survey no s have been mutated in the name of father ?
If indeed by way affidavit , grandfather has distributed property to your father , his name will appear on 7/12 extract.
Regarding your question of initiating action the buyer of the land , you need to verify whether your uncle had sold land to him ? Unless this transaction is invalid , you cannot initiate legal action against him

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Yes u can. Please collect all relevant documents before that and contact some knowledgeable person or an advocate. U may have to file a suit in civil court.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sadik
14-03-2017
sadik11m@rediffmail.com

सर तुकडे जोड बंदी कायदा लागू असताना भोगवटादार वर्ग २ जमिनीचा ६८ गुंठ्याचा खरेदी दस्त२००८ साली झाला आहे. तर तो दस्त वैध आहे का. सदर दस्त पहिल्या मालकाला कॅन्सल करायचा असेल तर काय करावा लागेल
संबंधीत गावात सिलिंग लिमीट काय आहे ते बघा. सर्वसाधारणपणे २० गुंठे सिलिंग लिमीट आहे. दस्त रद्द‍ करण्यासाठी नोंदणीकृत Cancellation Deed करावे लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महसूल व्यासपीठआणि जन पीठ साठी दिला जाणारा सल्ला पीडी एफ मध्ये दिला जावा विनंती आहे
आपली सूचना विचारार्थ तांत्रिक सल्लागारांकडे पाठविली आहे. शक्य असल्यास तशी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. सुचनेसाठी धन्यवाद.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर मी , क ड ई पत्रक १९२६/२७ चे, तसेच सातबारा फेरफार १९३० पर्यंतचे, योजनापत्रक १९५० पर्यंतचे आणि खरेदीखत १९१६चे यांच्या प्रमाणित नकला काढल्या आहेत.परंतु पणजोबा व खा.पणजोबा यांच्या पुराव्यासाठी वरील कागदपत्रांच्या अगोदरच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे तर कोणती कागदपत्रे काढावी (ज्यात जातीचा उल्लेख आढळतो), तसेच ती कोठे मिळतील. त्याचप्रमाणे पुराभिलेख संचालयानात जमिनी संबंधीत (ज्यात जातिचा उल्लेख आहे) कोण कोणती कागदपत्रे मिळतात. साधारणता १८५० ते १९१६ पर्यंत सालामधील हवीत.
धन्यवाद सर.
पुराभिलेख संचालयानात १८५० ते १९१६ पर्यंतचे दस्त मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्न करावा. जुन्या काळात खरेदी दस्तावर जातीचा उल्लेख केला जायचा. किंवा शासकीय नोकरीतील सेवा पुस्तकावर जातीचा उल्ले्ख असतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार पाणबुडे सर  

मी आपण चालू केलेले जनपीठ नियमित वाचतो 

माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची वडोलोपार्जित  31.18एकर जमीन होती आजोबान्ना 5मुले +4मूली आहेत

आजोबानी 1981 साली तहसिलदार हु.प्रमाणे स्वतः1+5मुले प्रतेकी 6.18 आजोबा व 5एकर (5मुले)ह्यांना वाटप केले व त्या प्रमाणे सातबारा फुटून प्रतेकचे वेगवेगळे 5 -5एकरचे सातबारे बनले              आजोबानी नंतरच्या काळात कोणी मुले संभाळात नसले कारणांमुळे त्यांच्या वाट्याला आलेली 6.18एकर जमीन 1998 साली एका नातवाला रजिस्टर खरेदी खताने त्या वेळसच्या बाजरभावा प्रमाणे विकलि विकताना आजोबानी कोणत्याही मुलांची अथवा मुलीची सही त्या खरेदी खतावार घेतली नाही (कारण त्यांची नावे सातबर्याला नहोती व त्यानी विकताना हरकत घेतली नाही)       आजोबा 2008 साली मयत झालेत 2016 ला 4 मूली पैकी 2 मुलींनी भावांवर व त्या खरेदीदार नातवावर दावा केला आहे त्या 2 मुलींची लग्न वाटप झाल्यावर म्हणजे 1983साली झाली होती          त्यांच्या दाव्या मध्ये त्याना वाटप रद्द करून मागत आहे व खरेदिखत पण रद्द करून मागत आहेत  आणि त्यांचा विभक्त असा हिस्सा मागत आहेत मला उत्तर दया की सर (1)कायद्याने एकदा वाटप झाल्यानंतर तब्बल 35 वर्ष्यानी वाटप रद्द होईल का ?                      (  2)  वाटप रजिस्टर झालेले नाही तहसिलदारांनी केलेले वाटप कोर्ट मान्य करेल का?(3)त्यांना हिस्सा मिळेल का ?(4)खरेदीदार नातवाला काय त्रास होईल का ?                                                    सर पिल्ज मला ह्या पडलेल्या प्रश्नचि उत्तरे दया मी सदैव आपला ऋणी राहील कळावे 
होणार नाही . आजोबांनी त्यांची जमीन १९९८ साली नातवास दिलेली आहे . हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ साली अमलात आला . त्यामुळे मुलींना त्या पूर्वी वाटप झालेल्या, विकलेल्या जमिनीवर हक्क सांगता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नानस्कर सर माझे नाव राज, आमचा बी.एन.डी.अर्ज मंजूर झाला आहे. या अर्ज विरुद्ध अपील करण्यासाठी जबादार ला किती दिवस ची मुदत असते तसेच मुदती नंतर आम्ही तहसीलदार याना कब्जेपट्टी साठी अर्ज केलेनंतर किती दिवसात कब्जेहट्टी ची कारवाई झाली पाहिजेत
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५० अन्वये अपिलाची मुदत नमुद आहे. त्यानुसार:
ज्या निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध तक्रार असेल तो निर्णय किंवा आदेश, जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा अधीक्षक, भूमि अभिलेख याच्या दर्जाहून कमी दर्जाच्या असलेल्या त्या त्या विभागातील अधिकाऱ्याने दिला असेल तर, साठ दिवसांची मुदत संपल्यानंतर त्याविरूद्ध अपील करता येणार नाही किंवा इतर कोणत्याही बाबतीत नव्वद दिवसांची मुदत संपल्यानंतर अपील करता येणार नाही. अपील करणाऱ्या व्यक्तीस असा निर्णय किंवा आदेश ज्या दिनांकास मिळाला असेल त्या दिनांकापासून साठ दिवसांची किंवा नव्वद दिवसांची मुदत मोजण्यात येईल. वरील कालावधी मोजताना, ज्याविरुद्ध अपील करण्यात आले असेल अशा निर्णयाची किंवा आदेशाची प्रत मिळण्यासाठी जो कालावधी लागला असेल तो वगळण्यात येईल.

आणि कलम २५१अन्वये मुदत संपल्यानंतर अपील दाखल करुन घेणेची तरतुद आहे.त्यानुसार:
जेव्हा अपील करणारी किंवा, यथास्थिती, अर्ज करणारी व्यक्ती, अपील किंवा, यथास्थिति, अर्ज करण्यासाठी जी मुदत विहित करण्यात आली असेल त्या मुदतीत अपील किंवा अर्ज न करण्यास तिच्याजवळ पुरेसे कारण होते अशी, ज्या अधिकाऱ्याकडे किंवा राज्य शासनाकडे अपील किंवा अर्ज करील त्या अधिकाऱ्याची किंवा राज्य शासनाची खात्री पटवून देईल तेव्हाा या प्रकरणान्वये पुनर्विलोकनासाठी केलेले कोणतेही अपील किंवा अर्ज, त्यासाठी विहित केलेल्या मुदतीनंतर दाखल करून घेता येईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by vnyk
11-03-2017
vnyk1234@gmail.com

नमस्कार,

जमिनीची मोजणी करावयाची झाल्यास जमिनीच्या लगतचे खातेदार आणि त्यांचे चातुर्सिमा किंवा गट क्रमांक कसे माहित होतील ?

तसेच खरेदी खताने घेतलेल्या जमिनीचा तयार नकाशा कुठे मिळू शकतो ?

सातबारावरून लगतचे खातेदार आणि त्यांचे पत्ते तलाठी ऑफिस मधून माहिती होऊ शकतात का ?
जमिनीची मोजणी करतांना जमीनीबद्दलचे जे मूळ रेकॉर्ड भूमापन कार्यालयात आहे त्या मूळ रेकॉर्डमधून टिपण / फाळणी व एकत्रीकरण झाले असल्यास त्या योजनेचा उतारा तयार करुन या प्रकरणामध्ये लावला जातो व हे संपूर्ण प्रकरण मोजणी करणार्या भूकर मापकाकडे (सर्व्हेअर) दिलेला असतो. मोजणीसाठी आलेले सर्व्हेअर हे सर्वप्रथम जी जमीन मोजावयाची आहे त्या जमीनीची पाहणी करुन प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याबाबत अर्जदार शेतकर्यास विचारणा करतात. प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे जमीनीमध्ये किंवा त्या गटाजवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड किंवा उरळया यांच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या आधारे जमीनीची मोजणी केली जाते.
याआधी सदर जमिनीची कधी मोजणी झाली असेल तर त्याचा नकाशा भूमी अभिलेख कार्यालयात मिळण्याची शक्यता आहे.
तलाठी बर्याच काळापासून त्या गावी असेल तर तो आपणास लगतचे खातेदार सांगू शकेल. शिवाय आपण त्यात गावातील ज्येष्ठ लोक, सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडे चौकशी करू शकता.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
09-03-2017
salveanand89@gmail.com

नमस्कार सर , आमच्या वडिलपारजीत जमिनीत वारसनोंद झाली आहे .त्या फेरफार संबंधित नोंद व मूळ कागदपत्र कोठे मिळतील ?
तलाठी कार्यालय मधे नसतील तर तहसील कार्यलय मधील अभिलेख कक्षात जाउन अर्ज करावा त्यापूर्वी तलाठी यांचे कडून आपला ग.न किंवा स.न माहित करुन घ्यावा .....

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

आदरणीय सर,शिवेवरील रस्त्या बाबत कोणते कलम असून ते कोठे पाहावयास मिळेल?तसेच शिवेवरील रस्त्याबाबत मालकी हक्क सांगता येतो का?किंवा कसे ? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
भूमी अभिलेख कार्यालयातील टिपण बुक मध्ये आपणास शिवेवरील रस्याता बाबत माहिती मिळेल. शिवेवरील रस्याची मालकी शासनाची असते. त्यामुळे त्यावर मालकीहक्क सांगता येत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा. सर
मी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मागविली होती,
सदर माहिती अधिकाऱ्याने ३० दिवसात माहिती न दिल्याने मी प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे प्रथम अपील सादर केले होते.
तहसीलदार यांनी ३० दिवसात सुनावणी घेवून पुढील प्रमाणे आदेश दिला आहे.
१. अपीलकारचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. माहिती अधिकाऱ्याने सर्व माहिती १५ दिवसांत अपिलकारास विनामुल्य द्यावी.

वरीलप्रमाणे आदेश होऊन आज जवळजवळ ४० दिवस झाले आहेत, आणि माहिती अधिकाऱ्याने अजून पर्यंत माहिती दिली नाही.
मी याबाबत तहसीलदार यांची भेट घेतली असता ते असे म्हणतात कि, मी आदेश केला आहे माहिती द्यायची किंवा नाही हा माहिती अधिकाऱ्याचा प्रश्न आहे आणि मी याबाबत काहीच करू शकत नाही. व आपण पुन्हा मला या विषयाबाबत भेटु नये. आणि आपणाला माहिती हवी असेल तर राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करा.

तरी आपण मला पुढील माहिती द्यावी हि विनंती.
१. तहसीलदार यांचे उत्तर योग्य आहे काय.
२. तहसीलदार यांच्या आदेशाचे माहिती अधिकारी पालन करत नाहीत, तर तहसीलदारांना त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते का, करता येत असेल तर कोणत्या कायद्यानुसार व कलमानुसार.

आपण योग्य सल्ला द्यावा हि विनंती.
तहसीलदार यांचे उत्तर निश्चितच असमर्थनीय आहे.

मा. रत्नाकर गायकवाड सर, मुख्य माहिती आयुक्त यांनी २८/६/२०१२ रोजी माहितीचा अधिकार २००५ च्या अंमलबजावणीसाठी पारित केलेल्या पत्रात स्पष्ट नमुद केले आहे की, अपिलीय अधिकार्याने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून घेणे हे संबंधित अपिलीय अधिकार्याचे काम आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणार्या जनमाहिती अधिकार्या विरूध्द कलम २० अन्वये व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियमानुसार कारवाई होऊ शकते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा.सर ,
आमच्या गावात नोंदणीकृत शैक्षणिक संस्था असून संस्थेकने स्व:ताच्या मालकीच्या जागे साठी खूप प्रयत्न केले परंतु जागा उपलब्ध न झाल्याने संस्थेने व नागरिकांनी सरपंच ग्रामपंचायत कडे सरकारची गट.नं २७८ हि( सरकार स्मशानभूमी या नावाने) 1 हे 13 आर एवढी जमीन आहे त्या जमिनी पैकी 10 आर एवढी जमीन गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची व बसण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध व्हावी म्हणून २६ जानेवारी २०१७ च्या ग्रामसभेत जागा मागणीच्या अर्जा बाबत विचार विनिमय होऊन ग्रामसभेत मध्ये संस्थेस जागा देण्या बाबत चा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे,
परंतु सदर जागा हि सरकार मालकीची असल्याने त्या बाबत योग्य ते मार्गदर्शन करावे .
त्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून संस्थेच्या नावावर सदर जागा होणे करीता आपणाकडून मार्गदर्शन मिळावे हि विनंती . धन्यवाद .....

सदर सातबारा खालील प्रमाणे आहे

गाव नमुना सात

अधिकार अभिलेख पत्रक
( महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३, ५, ६ आणि ७ )

गाव :- पिंपळगांव कोंझीरा तालुका :- संगमनेर जिल्हा :- अहमदनगर अहवाल दिनांक:- 06-03-2017
भुमापन क्रमांक व उपविभाग भुधारणा पद्धती
278
सरकार

भोगवटदाराचे नांव
शेतीचे स्थानिक नांव
क्षेत्र आकार आणे पै पो.ख. फे.फा
खाते क्रमांक

क्षेत्र एकक हे.आर.चौ.मी
जिरायत -
बागायत -
तरी -
वरकस -
इतर -
----------- -----------
एकुण क्षेत्र -
----------- -----------
पोटखराब (लागवडीस अयोग्य)
वर्ग (अ) 1.13.00
वर्ग (ब) -
एकुण पो ख 1.13.00
----------- -----------
----------- -----------
जुडी किवा विशेष आकारणी -
(सरकार स्मशानभुमी) 1.13.00 ( 433 )















913
कुळाचे नाव
इतर अधिकार
ग्रामसभेच्या प्रस्तावासह जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर जमीन मागणी अर्ज दाखल करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,

आमचा कल्याण-डोंबिवली भागात एक वडिलार्जित flat आहे, वडील रिटायर झाल्याने ते गावी स्थायिक झाले आहेत. आणि तो flat आता मुलाच्या नावे करावयाचा आहे.
प्रश्न असा आहे
५०० रुपये स्टंप पेपर वर ब्लड रिलेशन मधे मालमत्ता हस्तांतरित होईल असा शाशन निर्णय होता परंतू प्रत्यक्ष मला ३०,००० रुपये खर्च येईल अस सांगण्यात येतंय
याविषयी मार्गदर्शन हवे आहे

धन्यवाद
जर निवासी आणि कृषिक मालमत्ता ही पती, पत्नी , मुलगा, नातू, नात मयत मुलाची पत्नी यांना बक्षीस द्यायची असेल तर आकारणी योग्य मुद्रांक शुल्क रू. २००, मालमत्तेच्या बाजार मूल्यावर म.न.पा./ जि.प./पं.स./ अधिभार १% आणि मालमत्तेच्या बाजार मूल्यावर किमान १% तर कमाल रू. ३०,०००/- नोंदणी फी असा खर्च येतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Suit chavan
06-03-2017
Sujitchavan456@gmail.com

सर आमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य यांचे घर जिल्हा परीषद रोडच्या जागेमध्ये अतिक्रमण घराचे कंपाऊंड येत आहे तसेच ग्रामपंचायत हाद्दी मध्ये सुद्धा अतिक्रमण आहे त्यांच्या विषयी तक्रार कोणाकडे करावी व कशी करावी सविस्तर माहिती द्यावी

Question by Sonam gosavi
05-03-2017
Sonamparbat31@gmail.com

नमस्कार सर. मला ए ने टी पी संक्शन प्लॅाट दोन व्यक्ती मिळून घेयचा अाहे.तर सदर प्लाॅट दोघांच्या नावावर कसा करता येईल . ते सविस्तर सांगावे.
नमस्कार सर,
१) माझे नातेवाईक यांना त्यांचे चुलत्यांनी १९८९ मध्ये गट नंबर १४५ मधून बक्षीसपत्र ने ३० गुंठे जमीन दिली, जमीनीचा ताबा घेतला परंतु बक्षीस पत्राची नोंद साठी कागदपत्रे अथवा अर्ज केला नाही.
२) बक्षीसपत्र करून देणार यांनी १९९५ मध्ये गटाचे हिस्से करून गट नं.१४५/१, १४५/२, १४५/३ असे ७/१२ तयार केले.
३) गट नं.१४५/१ पूर्ण हिस्सा एका व्यक्तीस व गट नं.१४५/२ अर्धा हिस्सा दुसरा व्यक्तीस २००१ मध्ये खरेदी दिला.
४) बक्षीस पत्र करून देणार २००७ मध्ये मयत झाल्यानंतर बक्षीस पत्र केलेली ३० गुंठे जमिनीची नोंद ७/१२ उतारास घेण्यासाठी अर्ज दिला, संबंधित तलाठी यांनी नोंद गट नं.१४५/२ चे उतारास घेतली.
५) प्रत्यक्षात बक्षीसपत्र ने ताबा असलेली ३० गुंठे जमीन प्रथम व नोंद घेतलेली गट १४५/२ या मध्ये गट १४५/१ चे क्षेत्र येते.
६) एकाच हिस्साचे म्हणजे गट नंबर १४५/२ चे क्षेत्र दोन वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकते का? तसा मोजणी नकाशा करता येतो, मार्गदर्शन करावे.
माझ्या वडिलाने माझ्या सावत्र भावाचा नावे २००६ मंध्ये खरीदी खत करून दिले आहे . तरी आम्हा वारसांना तेया जमिनी मंध्ये हिस्सा पाहिजे तेया करीत काय करावे लागेल
वडीलांनी स्वकष्टार्जित कमाईतून सदर खरेदी केली असेल तर तुम्हाला हिस्‍सा मागता येणार नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी
आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,

2) तसेच गहाणदार घेणारा म्हणजे काय

Question by vnyk
03-03-2017
vnyk1234@gmail.com

कृपया खाली माहिती द्यावी.

रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतर करतांना स्टम्पशुल्क द्यावे लागणार नाही.

रक्ताचा नातेवाईक सख्ख्या काकाचा मुलगा किंवा मुलगी होऊ शकतो का ?

रक्ताचा नातेवाईक चुलत काकाचा मुलगा किंवा मुलगी होऊ शकतो का ?

कृपया रक्ताच्या नातेवाईकाची व्याख्या स्पष्ट करावी.

भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५, कलम २४ अन्वये समान मूळ पुरूषापासून किंवा समान पूर्वजांपासून वंशोद्भधव झालेल्या व्यक्तीं मधील संबंध किंवा नाते म्हणजे आप्तसंबंध किंवा रक्तसंबंध

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

संगणकीय ७/१२ अँड ८अ मधील चुका दुरुस्ती साठी कुणाकडे अर्ज करावा . मी या पूर्वी संभंदीत तलाठी व तहसीलदार यांचेकडे अर्ज केले आहे पण त्ये योग प्रतिसाद देत नाही कृपया आपले अमूल्य मार्गदर्शन व्हावे
तहसिलदारकडेच अर्ज करावा. ते दाद देत नसतील तर प्रांतांना भेटावे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by vnyk
01-03-2017
vnyk1234@gmail.com

नमस्कार

खालील प्रश्नाचे उत्तर मिळाले. आभारी आहोत.

७-१२ नुसार लागवडी लायक क्षेत्र १ हे. ४८ आर
अधिक पोटखराबा (लागवडी लायक नसलेले) क्षेत्र ४ हे. ४३

कृपया दोन्ही मिळून एकूण किती एकर आणि किती गुंठे याची माहिती द्यावी.


नमस्कार,

माझ्या सात बारावर खालील प्रमाणे नोंद आहे.

लागवडीचे योग्य क्षेत्र हेक्टर आर

जिरायत १ - ४८ ०
बागायत - -
भातशेती - -
------------------------------------------------
एकूण १ - ४८ ०
------------------------------------------------
पोटखराब ४-४३ ०
वर्ग ( अ ) - ०
वर्ग ( ब ) - ०
------------------------------------------------
एकूण ४-४३ ०
------------------------------------------------
रुपये पैसे
आकारणी.....
------------------------------------------------
जुडी किंवा विशेष आकारणी ० ७९
------------------------------------------------

वरील एकूण क्षेत्र (हेक्टर, एकर, गुंठे ) किती आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे.


८ –अ नुसार १ हे. ४८ आर
७-१२ नुसार लागवडी लायक क्षेत्र १ हे. ४८ आर
अधिक पोटखराबा (लागवडी लायक नसलेले) क्षेत्र ४ हे. ४३ आर
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara

Question by anand salve
01-03-2017
salveanand89@gmail.com

नमस्कार सर, भूधारणेची पद्धत भोगवटादार वर्ग १ अशी लिहली आहे याचा अर्थ काय आहे ?
भोगवटादार वर्ग १ ची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २९(२) मध्येे नमूद आहे. ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्हणतात. अशा जमिनीची विक्री करण्यालसाठी त्या शेतकर्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
७/१२ उतारा वरील एकूण क्षेत्र १२ गुंठे आहे. ३ लोकांची नावे मालक सदरी असून प्रत्येकाचे क्षेत्र आणे वारी नुसार आहे. आणे असलेला क्षेत्र गुंठे मध्ये ७/१२ उतारा वर लिहता येऊ शकते का?
७-१२ संगणीकरणात हा बदल होईलच.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

७-१२ संगणीकरणात हा बदल होईलच.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3