जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by swati swami
04-01-2017
swati.swami@yahoo.com

अपर जिल्हाधिकारी यांना शहरी भागातील एन ए मंजूर करण्याचे अधिकार आहेत का ? कोणता शासन निर्णय आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
दिनांक ५ जानेवारीच्या अध्यादेशानुसार , सध्या जमीन जर प्रादेशिक योजनेत निकासी/ वाणिज्य अथवा औद्योगिक वापर विभागात असल्यास , NA ची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
04-01-2017
swati.swami@yahoo.com

गौण खनिज अवैध्य उत्खननला मोक्का लावण्याची पद्धत कोणती आहे? कोणत्या नियमान्वये कृपया

Question by Praful kharche
04-01-2017
praful.mlk@gmail.com

सर माझे मामा ८वर्षे झाली बेपत्ता आहेत
त्याचे नाव ७/१२ मधून कमी करायचे आहे
पण पोलिस स्टेशनला रिपोर्ट केलेला नाही
उपाय सांगा
पोलीस तक्रार दाखल करणे आवश्यक . सात वर्षे तक्रार करून झाल्यावर , न्यायालयाकडून , मामा बेपत्ता आहेत अशे न्यायालयाकडून जाहीर करून घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bhauso kalokhe
03-01-2017
Bk_dehu@rediffmail.com

इतर हक्क तुकडा नोंद काय आहे.
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी , ज्या मिळकती निश्चित प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकारमानाच्या होत्या , त्यांच्या नोंदी , तुकडा म्हणून इतर हक्कात घेण्यात आल्या आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर 31डिसेंबरला मी प्रश्न विचारला होता त्यानुसार आपण म्हंटले होते की ७/१२ चे एकुण क्षेत्र किती आहे व कसला करारनामा आहे त्या गटामध्ये वडिलांनी दोन गुंठे जागा घरासाठी रहिवासी झोन मध्ये खरेदी केली होती व करारनामा किंवा त्याचे अभिलेख किंवा करार संक्षेपलेख हा दस्तावेज करून दिला होता
sir
mala aplya margdarshanachi khup garaj aahe.
mi gat.no.73/1 madhil 2 acar jamin kharidi keli aahe .pan 7/12 Madhe etar hakkat punarvasan sathi rakhiv aasa shera aahe tyamule sakal yanni nond rdd keli aahe . partu tahsil yani aaka patra ne tya gatavaril bandi uthvli aahe .pratakade aapil kele aahe ya kessarkhi akhadi kes asel tar margdhrshn kara. hi vinnti.
नमस्कार सर,
माज़ी अड़चन असी आहे की, एका गट क्र. मधे आम्ही ५ खातेदार आहोत व् यामधेच आम्हा सर्वांचा १ जनावरासाठीचा गोठा आहे. व् सदरील गट हा आनेवारि प्रमाणे सर्वांच्या नावे समान आहे
परंतु अमच्यापैकी १ जन सदरील जागे मधे (त्याच्या हिस्सयाच्या) १५ वर्षापूर्वी राहन्यासाठी गेला आहे
परंतु सर त्याने २००८-२००९ मधे सदरील सम्पूर्ण जागा (जनावरासाठीच्या गोठ्याची ) ग्रामपंचायत नमूना नं ८ ला नोंद करुण घेतली आहे.
व् त्यानंतर आम्ही ग्रामसेवक यांना ७ वेळेस तक्रार अर्ज करूनही त्यावर्ती काहीही कार्यवाही जाली नाही
नंतर आम्ही गटविकास अधिकारी यांनाही ६ वेळेस तक्रार अर्ज देउनहि त्यानिपण काहीही कार्यवाही केलेली नाही
नंतर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३ वेळेस तक्रार अर्ज करूनही काही कार्यवाही जाली नाही
शेवटचा उपाय म्हणून मि ही तक्रार आपले सरकार पोर्टल वर दिली व् त्यांचा रिप्लाई असा आला की आपन आपल्या मालकीचे पुरावे दाखवले तर आम्ही योग्य ति कार्यवाही करू शकतो
सर परंतु मि माझ्या मालकीचे पुरावे घेऊन सादर करावायस् गेलो त्या वेळेस सदरील गट विकास अधिकारी यांनी सांगितले की आम्ही या प्रकारणावर्ति काहीही करू शकत नाहीत तुम्ही कोर्टात जाऊन दावा देऊन तक्रार करा.
सर, मि सातत्याने (४ वर्षापासून ) तक्रार अर्ज देऊन पाठपुरावा करूनही शेवटी काहीही उपयोग जाला नाही.
तरी सर या प्रकरणी मि काय करू शकतो याचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
आपला विश्वासु,
मुकेश मानमोडे
९९७००९९१३३
hindu varas kayada 2005 nusar muliche vadil 2005 purvi mayat zale asatil tar asha mulila vadiloparjit proparty madhe hakk magta yet nahi ka
हो.
वारसा हक्क १९५६ पासून आहे .
वडिलांचे मृत्यनंतर हिस्स्याप्रमाणे वाटा मिळणारच .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझ्या मोठया भावाने 2आर जागा व त्यावरील घर वडिलांच्या संमतीने नोंदणीकृत करारनामा करून एका व्यक्तीला 2008साली काही रक्कम घेऊन दिले आहे 7/12 वडिलांच्या नावे आहे त्याचे खरेदीखत झाले नाही त्यामुळे मला आतापर्यंत या दस्ताची काही माहिती नव्हती मला माझा हिस्सा मिळण्यासाठी हा करारनामा रद्द करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
७/१२ चे एकूण क्षेत्र किती ?
आपण कारनामा होऊन घर दिले आहे म्हणता . हा करारनामा कसला आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, जमिनीचा खरेदी संचकार पात्र 1968 साली झाली hote. पण १९६९ ला खरेदी देणार याने मुदतीत पैसे दिले नाही म्हणून दिवाणी दावा केला पण क्कॉर्टने दावा फेटाळून लावला व आदेश दिला कि दाव्याचा खर्च देणे व खरेदीदाराचा ताबा कायदेशीर ahe. Tevhapasun आजपर्यंत जमीन खरेदीदाराच्या ताब्यात आहे व pik pahnila nav ahe पण खरेदी विक्री व्यवहार पूर्ण झालेला nahi. दस्तामध्ये कालावधीची अट नाही पण आता व्यवहार पूर्ण होईल का .कोर्टात राहिलेले पैसे भरून व्यवहार पूर्ण करता येईल का दस्तामध्ये अशी अट आहे कि मालकाने व्यवहार पूर्ण केला नाही तर कोर्टामार्फत करून ghene. जमिनीला अजून मूळ मालकाचेच नाव आहे .तरी मार्गदर्शन karave
आदरणीय सर ,
नवीन शर्तींच्या जमिनीच्या खरीदी नंतर झालेला शर्तभंग नियमाकूल करणेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते .पिलीज याची माहिती द्यावी
शर्थ भंग नियमानुकूल होईलच असे नाही . कश्या प्रकारचा शर्थ भंग आहे त्यावर आवलंबून आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by रोहित
30-12-2016
patil06rohit@gmail.com

माझ्या आजोबांना त्यांच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगी होती(मयत -२०१४). ती लहान असतानाच आजोबांच्या पहिल्या पत्नी चा मृत्यू झाला. मुलीच्या संगोपनासाठी आजोबांनी माझ्या आजीसोबत(वडिलांची आई) दुसरे लग्न केले . वडिलांना अजून २ भाऊ व ३ बहिणी आहेत(आजोबांची एकूण मुले- ७)
वरील पैकी वडिलांच्या एका छोट्या बहिणीचा विवाह हा १९९७ साली झाला आहे आणि उर्वरित सर्वांचे विवाह हे १९९४ पूर्वी झाले आहेत. आजच्या घडीला माझे आजोबा, आजी तसेच वडिलांची सावत्र बहीण हे हयात नाहीत. आजोबा तसेच आजी पैकी कोणीही मृत्युपत्र/ बक्षीसपत्र इत्यादी काहीही केलेले नाही.
आजोबांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आधी नमूद केलेल्या सर्व भावंडाशिवाय, आजोबांच्या एका बहिणीचे ( हयात आहे) तसेच एका भाच्याचे (आजोबांच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा ) नाव आहे.
तरी आज रोजी आजोबांच्या वडिलोपार्जीत मालमत्तेचे वाटप करायचे असल्यास किती व कसे हिस्से करावे लागतील?
वडिलांच्या सावत्र बहिणीच्या वारसांनी एकूण मालमत्तेच्या अर्ध्या हिस्स्याची मागणी करणे कायदेशीर आहे का?
आपण कथन केल्यानुसार , जर ७/१२ सादरी आजोबांच्या बहिणीचे व दुसऱ्या बहिणीच्या मुलाचे नाव आहे म्हणजे , मिळकत एकट्या आजोबांच्या मालकीची नाही . त्यामुळे आजोबांना एकूण क्षेत्रातील १/३ हिस्सा मिळेल . सध्या आजोबा हयात नाहीत . आजोबांना आपली सावत्र आत्या धरून ७ अपत्ये होती . सावत्र आत्या मयत आहे . सावत्र अत्याचा विवाह झाला होता का? तिला अपत्ये आहेत का ?
आजोबांना मिळणाऱ्या १/३ हिस्स्या पैकी आत्याला वारस आहेत असे समजले तर , आजोबांचे सर्व अपत्यांना , १/३ * १/७ = १/२१ हिस्सा मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आमचे आईचे नावे ६० आर जमीन आहे. सदरची जमीन ७ भावाचे हिस्से मध्ये समान वाटून घ्यावयाची आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार काही अडचण येऊ शकते काय ?
हि जमीन jr रहिवासी/ औद्योगिक क्षेत्रात /झोन मध्ये असल्यास अडचण नाही
मात्र नसल्यास , जमीन वरकस अथवा एकपिकी असल्यास ६०/७= ८.५ R क्षेत्र प्रत्येकाचे वाट्यास येईल . त्यामुळे तुकडा निर्माण होईल .वाटप करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,मी ६४% अपंग आहो मी ग्रामपंचायत च्या जागेवर २००३ साली बांधकाम केल, खाली जागेवर ३०० रु. महिन्याने. पण मी आजपर्यंत १ हि महिन्याचे पैसे दिले नाही, ग्रामपंचायत माझ्या जागेवर सील लावण्याचा notice पाठवीत आहे.मी अपंग असल्यामुळे माझी परीस्थिती थकीत पैसे भरण्याची नाही आहे.तरी मी अपंग असल्यामुळे शासन ती जागा माझ्या नावावर करू शकते का? कृपया याची माहिती द्यावी हि विनंती
मा.सर
सर आमचे गावामध्ये सन १९७१-१९७२ मध्ये सिंचन तलाव तयार झालेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात आलेली आहे.तलाव पूर्ण झालेनंतर जवळपास ४०-५० हेक्टर जमीन शिल्लक राहीलेली आहे.अतिरिक्त जमीनीचा वापर ३ वर्षात होऊ शकला नाही व पुढील १० वर्षात होणार नसेल तर त्या अतिरिक्त जमिनी जिल्हाधिकारी यांचेकडे सुयोग्य मोबदला घेऊन वर्ग करणेबाबत चा म.शा.प.दि.२६/०७/२००२ मध्ये नमूद केलेले आहे.
सदर जमीन १९७१-१९७२ मध्ये संपादित केली त्यावेळी मूळ मालक अन्य व्यक्ती होत्या पण सन १९८५ पासून ०१ हे.60 आर जमिनीवर वहीती माझे आईची आहे आहे व सन १९९५ पासून सदर जमिच्या पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे माझेआईकडे आहेत.सदर जमिनीला लागून नदी असल्याने नदीमुळे अतिरिक्त जमीन तयार झाली असून ति 60 आर चे आसपास आहे सन २०१० पासून माझी आई एकूण ०२.हे २० आर जमीनिची वहीती पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे करून वहीती करीत आहे.
वरील पद्धतीने माझे आई कडे जमीन वाहितीत आहे.म.ज.म.अ.१९६६ चे खंड 1 मधील प्रकरण ३ मधील भाग तीन मधील नियम १० ते २१ प्रमाणे माझी आई मा.तहसीलदार यांचे मार्फत जमीन मिळणे बाबत अर्ज सादर करू शकेल काय आणि जमीन ७ किव्वा १२ प्रमाणे मिळू शकेल काय.तसेच सादर जमीन देणे बाबतचे अधिकार कोणाला आहेत.कृपया याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती आहे
कु का क 32 एम नूसार मिळालेली जमीन ही दि 28/12/15 रोजी कूळाच्या वारसांनी पतीने पत्नीस व दिराने भावाची बायकोस जमीन 40 पट आकाराची रक्कम न भरता विक्री केली आहे. सदरचा व्यवहार कुटंबात झाला असलेने शर्तभंग होतो किंवा कसे नसल्यास त्याबाबतची तरतूद कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
तुकडेबंदी कायद्यानुसार एखादी खरेदी रद्द झाली असल्यास , सदरची जमीन त्या जमिनीमधील जुन्या मूळ वारसापैकी एखादा वारस दंड भरून जमीन परत घेऊ शकतो का ?

Question by Rahul wankhede
28-12-2016
Rpwankhede@rediffmail.com

Sir please make available all old material and post of recent documents section
श्री. किरण पाणबुडे साहेब , नमस्कार मी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य मार्गदर्शन आपल्याकडून मिळाले त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभारी आहे. दिनांक ०७/१२/२०१६ रोजी विचारलेल्या प्रश्नाबाबत कृपया मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
३५ वर्षांपूर्वी झालेली खरेदी जर तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणारी असेल तर तक्रार झालेनंतर सादर खरेदी व्यहारावर कायदेशीर कारवाई होईल काय ?
महोदय साहेब आमची वडिलोपार्जितची शेतजमीन आहे.दोन सातबारा आहेत एकाचे क्षेत्र 0.10.0 व दुसर्याचे 0.25.5 क्षेत्र सदरची शेतं दोन भावामध्ये वाटप करून घ्यायची आहेत.तर तसे करता येतील का? की तुकडे बंदी नियम लागु होईल. भावाभावा मध्ये आजिबात पटत नाही.मला माझ्या हिस्साची शेतजमीन विकसित करावयाची आहे.कृपया आपण मार्गदर्शन करावे.

Question by suresh mohite
27-12-2016
suresh.mohite73@gmail.com

mi dusarya gavat 4guntha jaga gheun grampanchyayatichya parvangine ghar bandhal tar pudhe sarkari niyamanusar kay karave lagel plg mala salla dya hi vinanti
श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
आमची गावठाणात वडिलोपार्जित स्वमालकी वहिवाटीची जागा आहे. ती आमच्या पंजोबानी १८७३ साली बाबर याला स्टॅम्प वर लिहून भाड्याने दिली तो स्टॅम्प आमच्याकडे आहे. तो निघून गेल्यावर ती जागा आमच्या आजोबानी रामा शिंदे याला भाड्याने दिली तो भाडेपट्टा आमचे जवळ नाही. त्याने त्या जागेवर ग्रामपंचायत ला १९२२ साली ४३ x ४३ घर अशी त्याच्या नावावर नोंद केली. त्याची माहिती आम्हाला न्हवती. पुढे तो वारला त्यानंतर त्याच्या मुलाची नोंद त्या जागेला लावून घेतली. तो १९७० साली नोकरीवर निघून गेला त्यावेळी त्याने त्याचे घराचा पत्रा कडून न्हेला व आम्हाला तोंडी सांगितले कि तुमची जागा तुमच्या ताब्यात घ्या. नंतर आम्ही ती जागा १९७१ ते १९८० या सालात कुलकर्णी याना भाड्याने दिली त्याच्या स्टॅम्पची झेरॉक्स आमच्याकडे आहे, व १९८० साली जागा सोडतानाच ओरिजनल स्टॅम्प आमच्याकडे आहे कि तुमची जागा तुमच्या ताब्यात दिली म्हणून .
१९९० साली आमच्याकडे असणारे वरील दोन स्टॅम्प दाखवून आम्ही आमच्या घराचे दक्षिण बाजूच्या खुल्या जागेला ग्रामपंचायतीला ६५ x ८५ मोजमापाचीं खुली जागा अशी नोंद करून घेतली. १९९५ साली सिटी सर्वे झाला त्यावेळी त्यांचे कोणीही हजर न्हवते आमचे वडील हजर होते त्यांनी वरील स्टॅम्प दाखवून आमच्या नावाची नोंद सिटी सर्वे ला करून घेतली. शिंदे यांच्या उताऱ्या बाबत विचारले असता वडिलांनी त्यांना सांगितले कि ते भाडेकरू होते. मग सिटी सर्वे साहेबानी आमची नोंद जागेला करताना शेरा मारला कि शिंदे यांच्या वहिवाटीबाबत माहिती सांगतात ते भाड्याने राहत होते असा शेरा मारला.
पुढे आमच्या वडिलांनी ती जागा २० वर्षाच्या कराराने २००७ साली रिलायन्स tower ला भाड्याने दिली आहे.
शिंदे यांच्या वारसांच्या नावाची नोंद ग्रामपंचायतीला अजूनही पडीक जागा ४३ x ४३ अशी आहे पण त्यांचा मिळकत नंबर वेगळा आहे व आमच्या जागेचा मिळकत नंबर वेगळा असून मोजमाप ६५ x ८५ असे आहे.
आता शिंदे यांच्या वारसांनी त्यांच्या व त्यांच्या वारसांच्या नावांची नोंद असलेले उतारे २००८ साली काढले व २०१५ साली सिटी सेर्वेला साधे पत्रं लिहिले आमची नोंद करावी म्हणून मग सिटी सर्वे ने त्या पत्राला उत्तर म्हणून तुम्ही योग्य कारणांच्या विलंब माफी अर्जासह अपील दाखल करावे असे पत्र पाठवले. त्या नुसार त्यांनी आम्ही सर्विस मुळे बाहेर होतो असे सांगून विलंब माफी अर्ज केला व अपील दाखल केले आहे तर त्यांचा विलंब माफ होईल का ? त्यांचे अपील चालेल का ?
अपील दाखल करताना त्यांनी आमचे वडील हयात असताना मयत वारस म्हणून आमच्या मोठ्या भावांच्या नावे नोटिसा काढल्यात ते चालेल का ? आम्हाला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

सर हि मिळकत वडिलोपार्जित आहे आमच्याकडे १९२१ चा एक कागद आहे त्यावर असे लिहले आहे की लेखी कबुली आपापसात वाटणी व तलाठीची सही आहे. त्यावर आमच्या चुलत आजोबाचे नाव कासे लागले त्या नंतर १९४५च्या सातबारा व फाळणी बार आहे त्यावर आमच्या चुलत आजोबाचे नावावर कशी आली याचा फेरफार किंवा सातबारा नाही . आजोबा किंवा पजोबा व खापरपजोबा यांच्या नावचा कुठेही उल्लेख नाही चुलत आजोबा नावावर कशी आली हे समजात नाही हि मिळकत वडिलोपार्जित आहे आमची नावं लावण्यासाठी काय कराव्या लागेल. चुलत आजोबा नावावर कशी आली याचा फेरफार आम्हाला मिळत नाही तहसीलदार ऑफिसस मध्य आम्हाला १९२१चा एक कागद व त्यनंतर १९४५मधील सातबार व कही फेरफार मिळले परतु १९२१ ते १९४४ यां काळाती एक ही कागद किवां त्या आधिचा कागदपत्र तहसीलदार ऑफिसस मध्ये नाही असे सागितले आहे. तर मूळ कागदपत्र कुठे मिळतील
महोदय,
भूमिहीन व्यक्तीला शेतजमीन खरेदी करावयाची असल्यास त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागेल.परवानगी मिळण्याबाबत काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3