जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर,
कब्जेचे साठेखताची नोंद संबंधीत कामगार तलाठी यांनी इतर अधिकारात घेतली. पुढे साठेखता वरून खरेदी खत केले. खरेदीखताची नोंद घेत असताना आज असलेल्या कामगार तलाठी, मंडल अधिकारी यांनी साठेखताची नोंद कमी करणे आवश्यक होते, झालेल्या चुकीची मंडल अधिकारी यांचे कडे विचारणा केली असता त्यांनी म.ज.म.अधिनियम १५५ अन्वये मा.तहसीलदार यांचे कडे अर्ज करावयास सांगितला.
माझा प्रश्न असा आहे, १५५ अन्वये अर्ज , मंडल अधिकारी चौकशी, जबाब, त्यावरून मा.तहसीलदार सो.यांचा आदेश, त्यानुसार नवीन फेरफार नोंद, मंडल अधिकारी नोंद मंजुरी ह्या सर्व कार्यवाहीतून खातेदाराला जाणे योग्य आहे का?
कोणतीही फेरफार नोंद एकदा रद्द किंवा मंजूर झाल्यावर तलाठी किंवा मंडलअधिकारी त्यात स्वत:हून फेरबदल करू शकत नाही. त्यासाठी सक्षम अधिकार्याचा आदेश आवश्यक आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

कोणतीही फेरफार नोंद एकदा रद्द किंवा मंजूर झाल्यावर तलाठी किंवा मंडलअधिकारी त्यात स्वत:हून फेरबदल करू शकत नाही. त्यासाठी सक्षम अधिकार्याचा आदेश आवश्यक आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या आजोबांचे नाव आमच्या लगत असलेल्या सर्व्हे नंबर च्या ७/१२ उतारातील इतर अधिकारात कुल म्हणून आहे. जमीन वर त्यांचाच ताबा आहे. कुल म्हणून असलेला शेरा कमी करता येतो का? माझे आजोबा मयत असून, ७/१२ उतारा वर शेजारील वारसाचे नावे मालकी हक्कात आहे.
आपण तहसिलदारकडे अर्ज करावा. कागदपत्रे बघून ते योग्य तो निर्णय घेतील.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब ,
सात बारा मधून एखाद्या व्यक्तीचे / इसमाचे एकमेकांच्या सहमतीने नाव काढून टाकण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल, कृपया या प्रक्रियेची सविस्तर माहिती द्या ?

धन्यवाद !
यासाठी याोग्‍य त्‍या कायद्‍याखाली नाोंदणीकृत दस्‍त करावा लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by मुले आ
25-02-2017
madhavnmule@gmail.com

जमीन जर भोगवटदार वर्ग २ ची असेल तर सदर जमीनीचे एकत्र कुटुंबात वाटनीपत्र करता येईल का
नमस्कार सर, इतर अधिकारातील शेरा साधे कुळ म्हणजे काय? साधे कुळ मयत असल्यास काय करावे? साधे कुळ शेरा कमी करता येतो का?
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम १८ अन्वये, पट्याने जमीन धारण करणारी व्यक्तीे म्‍हणजे कुळ. कुळ मयत असल्यास त्‍याच्‍या वारसाचे नाव दाखल हाोऊ शकते. कुळासंबंधीचे सर्व अधिकार तहसिलदारला आहेत. पण तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
एकत्रीकरण योजने पूर्वी सर्व्हे नंबर च्या ७/१२ उतारा वरील क्षेत्र दोन जणांच्या नावावर सामायिक होते. एकत्रीकरण (गट स्कीम) योजने नंतर दोघांचे खाते फोड होऊन गट नंबर वेगळे झाले. एकाच्या नावावर 3हेक्टर २०आर व दुसऱ्याच्या नावावर 3हेक्टर ७५आर जमीन झाली. तशी नोंदही एकत्रीकरण योजनेच्या 9(३)(४) च्या उताऱ्यात करण्यात आलेली आहे. त्यापैकी ३हेक्टर ७५आर जमीन असलेला गट नंबर माझ्या वडिलांनी १९९१ मध्ये खरेदी घेतला आहे. ३हेक्टर २०आर जमीन असलेल्या मालकाने २००५ मध्ये जमीन विकलेली आहे, त्या व्यक्तीने २०१६ मध्ये एकत्रीकरण योजनेत चूक होऊन क्षेत्र कमी जास्त नावावर झाले. वाटप सारखे करावे ह्यासाठी दावा केलेला आहे. योग्य मार्गदर्शन करावे.
Namaskar Sir,

Maja nav pramod asun, majya vadilancha nave 73 gunthe vadiloparjit varg no.1 Jirayati jamin asun sadhya ti 2012 pasun padit ahe. 7/12 var pikpera 2012 sal pasun padit ahe. Maja prashna asa ahe ki ashi khajagi jamin padit asalyas sarkarjam hote ka? Ani jar ata mala pik pera 7/12 var lavayacha asel tar tyachi proceedure kay ahe?

Thanks.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६५ अन्वये सलग दोन वर्षे लागवडीखाली न आणलेल्या जमिनीचे व्यवस्थापन शासन स्वत:कडे घेऊ शकेल अशी तरतुद आहे. तथापि, आपण नवीन हंगामात हवे ते पीक घेऊन, तलाठी ज्यावेळेस पीक-पाहणीसाठी येतील तेव्हा सदर पिकची नोंद गाव दप्तरात घेण्याची विनंती त्यांना करावी अथवा त्या्प्रकारचा अर्ज तलाठीकडे द्यावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by vishwas mande
20-02-2017
vishwasmande@yahoo.com

maze navavaril 77 gunthe jaminipaiki 20 gunthe jamin maze patniche navavar karanesathi yogya marga sanga
आपण बक्षीसपत्राने किंवा नोंदणीकृत वाटप पत्राने जमीन देऊ शकाल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय
माझी शेती ३१ नं या गटात येते
यात ३ हिस्सेदार असून त्यातील माझा चार आनेचा हिस्सा आहे तो दोन तुकड्यामध्ये विभागाला आहे तर मी मोजणी मागवू शकतो का ?
त्यासाठी मला बाकी हिस्सेदारांची संमती आहे का ?
जर संमती दिली नाही तर मोजणी कशी मागवावी ?
आपण मोजणीसाठी अर्ज करू शकाल. मोजणीसाठी सहहिस्सेदारांची संमती असावी. त्या‍साठी त्यांना मोजणीची नोटीस बजावली जाणे आवश्यक आहे. तथापि जर नोटीस बजावूनही सहहिस्सेदार जाणूनबुजून संमती देत नसतील किंवा गैरहजर रहात असतील तर मोजणी अधिकार्यांच्या निदर्शनास ही गोष्ट् आणून द्याावी. ते योग्‍य तो निर्णय घेतील.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय,
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक २०१७ मध्ये पोस्टल बॅलेट साठी पी बी १ नमुन्यात प्राप्त झालेले अर्जाची यादी उमेदवारास अर्ज केल्यास देता येईल काय ?त्याची फी किती घ्यायची आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
संबंधीत निवडणूक निर्णय अधिकार्याशी संपर्क करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या वडिलाच्या नावे उ-हा व आव्हा या दोन गावामध्ये शेती आहे उ-हा गट न. ५९ क्षेत्र ०.६० आर ( सामाईक ५ हिस्से प्रत्येकी ०.५ )आर व आव्हा १.०० हे. माझ्या उ-हा या गटा मध्ये विहीर असल्यामुळे मला आव्हा या शेतात सरकारी विहीर अनुदान मिळत नाही. कारण कि उ-हा या गावाच्या क्षेत्रात विहीर आहे . जर माझ्या वडिलाची आव्हा शिवारातली शेती माझ्या नावावर करायचे असल्यास खूप खर्चे येतो ,माझे आव्हा या क्षेत्रात जास्त शेती आहे आता मला तिथे विहीर हवी असल्यास मला काय करावे लागेल हे सांगा. कृपया मदत करा माझा मोबाईल नंबर आहे ९८६०७९०५९०
खरंतर शासनाच्या नवीन धोरणानूसार रक्तसंबंधी नातेवाईकांमध्ये मिळकतीचे बक्षीसपत्र करण्यासाठी फारच कमी खर्च येतो. आपण याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात विचारणा करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी मुस्लिम समाजाच्या उप जात धोबी या जातीचा आहे मी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अज केला आहे मी ईतर मागासवर्ग जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अज केला आहे मी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अज केला आहे मा.SDM सेलू जिल्हा परभणी यांनी देण्यात मुस्लिम समाजाच्या आरक्षण मध्ये झालेल्या या sbc a मध्ये आहे असे म्हणत देण्यात टाळाटाळ करीत आहेत मि त्याना चुलत भाऊ जात प्रमाणपत्र व 2015 जात वैधता प्रमाणपत्र आजोबा प्रवेश निरगम 1941 धोबी आहे 2001 महाराष्ट्र शासन निर्णय ईतर मागासवर्ग जात प्रमाणपत्र काढण्यासाठी धार्मिक बंधन नाही तरी धोबी या जातीचा प्रमाणपत्र ईतर मागासवर्ग देण्यात टाळाटाळ करीत आहेत मि काय करावे माहिती देया सर
वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Dear sir,

sir sarv pratham namskar. Maze nav X from solapur. Sir maza prashna asa ahe mazya bhavache lagn zalya pasun
vegla rahat ahe.tyani mala ani vadilana kuthlyahi prakarcha kharch kelela nahi. vadil he mazya sobat rahat ahe.
Tar 2009 sali mazya vadilani mala 1000sq ft cha plot gheun dila mazya navavar. Tya veles maze age 19 hote. Kharedi khat je kele te sampurna mazya navane ahe.
Kutehi bhavacha kinva vadilancha ullekh nahiye.
Tyane kuthe property ghetli he mala mahit nahi.
Tar maza bhau ata tya plot madhe hissa magat ahe tar tyala hissa milu shakto ka?
Ani maze lagn he 2015 la zale ahe tar me to plot wife chya navavar kela tar kahi problem hou sakto ka?

plz sir reply kara as soon as possible.
तुमच्या वडीलांनी स्वत:च्या कमाईतून सदर खरेदी केली असेल आणि तसे कायदेशीरपणे सिध्द करता येत असेल तर काहीही बाधा नाही. सदर मिळकत तुमच्या नावे आहे तर तुम्ही, तुम्हाला योग्य वाटेल त्या पध्दतीने त्‍या मिळकतीची विल्हेवाट लावू शकता.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर आमच्या कडे वडिलोपार्जीत ४५ आर जमीन होती. त्या मध्ये ४ भावांचे हिस्से होते . त्या पैकी मोठ्या भावाचा हिस्सा माझ्या वडिलांनी विकत घेतला व ३ नंबर च्या भावाचा हिस्सा २ नंबर च्या काकांनी विकत घेतला. त्या वेळी आम्ही त्यांना त्या जमिनीचे पैसे देवून टाकले होते, (१९८५ मध्ये ) पण जमीन नावावर केली नव्हती . हा व्यवहार वडिलांनी त्यावेळेस गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर केला होता, आता त्या व्यक्ती हयात नाहीत व या व्यवहाराची कोणतीही लिखित नोंद आमच्याजवळ नाही . आम्ही वारंवार त्यांना जमीन नावावर करून देण्यासाठी खूप विनंती केली पण त्यांनी जमीन आमच्या नावावर केली नाही . या व्यवहाराची लिखित नोंद नसल्यामुळे व त्या व्यक्ती हयात नसल्यामुळे ते या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत व आता ते ती जमीन आमच्या नावावर करण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मागत आहेत, नाहीतर त्यांचा हिस्सा मागत आहेत. त्यासाठी त्यांनी आम्हाला कोर्टाकडून तशी नोटीसही पाठवली आहे .
सर माझा प्रश्न असा आहे की, त्यांचा त्या जमिनीवरील हक्क बाद न झाल्यामुळे ते त्यांचा हिस्सा घेऊ शकतात का ? किंवा आम्ही त्यांच्या या दाव्याविरुद्ध कोर्टात केस दाखल केली तर आम्हाला न्याय मिळेल का?
काहीही पर्याय दिसत नाही.दिवाणी मध्ये सुद्धा काही उपयोग होईल असे वाटत नाही.

Reply by अजित नथू शेलार | नायब तहसीलदार

आजही शिकलेले लोक असे व्यवहार करतात यावर विश्वाास ठेवणे अवघड जाते. जर जमिनीचे हस्तांतरण कायद्यात नमूद विहित पध्दतीने झाले नसेल तर त्याला कायद्याची मान्यता मिळत नाही. आपणाकडे पैसे दिल्याबाबत भक्कम लेखी पुरावा असेल तरच दिवाणी न्यायालयात दाद मागावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आजही शिकलेले लोक असे व्यवहार करतात यावर विश्वाास ठेवणे अवघड जाते. जर जमिनीचे हस्तांतरण कायद्यात नमूद विहित पध्दतीने झाले नसेल तर त्याला कायद्याची मान्यता मिळत नाही. आपणाकडे पैसे दिल्याबाबत भक्कम लेखी पुरावा असेल तरच दिवाणी न्यायालयात दाद मागावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर्व अधिकारी महोदय,
महोदय, मी लोणी खुर्द, ता. राहता , जि. अहमदनगर चा रहिवासी आहे.

महोदय 2 महिन्यांपूर्वी माझ्या आजोबांनी त्यांच्या नावे लोणी खुर्द गट नं. 926 मध्ये असलेली 27 गुंठे जमीन नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे माझ्या नावे केली आहे.

सध्या 7/12 उताऱ्यात माझे नाव दाखल झाले असून त्या जमिनीचा 8अ सुद्धा माझ्या नावे निघतोय. परंतु सदर जमिनीवर अजून माझा कब्जा नाही.

सदर क्षेत्र हे yellow zone मध्ये आहे असे मला बक्षीसपत्र करून घेताना दुय्यम निबंधक कार्यालय, राहता येथे Stamp Duty & Registration Charges भारतेवेळी सांगण्यात आले . कारण सदर जमिनीचे मूल्यांकन जास्त दिसल्यामुळे त्यांना मी तशी विचारणा केली होती . परंतु 7/12 वर बागायती असेच वर्णन येते.

सदर गटात एकूण 2.65 हे. क्षेत्र असून 7/12 एकत्रित निघतो व त्यावर एकूण 12 जणांचे नाव व प्रत्येकाच्या नावासमोर त्यांच्या नावे असलेले क्षेत्र दिसते.

महोदय तरी आपण कृपया मला पुढील काही प्रश्नांसंबंधी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

Q.1) मला माझ्या नावे असलेले 27 गुंठे क्षेत्र पोट हिस्सा मोजणी द्वारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे मोजून घेऊन त्याची हद्द कायम करून घेता येईल का?

Q.2) सदर गटाच्या एकत्रित 7/12 मूळे सर्वानाच अडचण निर्माण होत असते. तरी सदर गटाचे प्रत्येकाच्या नावे स्वतंत्र उतारा व स्वतंत्र नकाशा नोंद होणे कामी काय करावे लागेल?

Q.3) तुकडा बंदी कायद्यानुसार काही अडचण येऊ शकते का?

Q.4) सदर क्षेत्र N.A. करण्यासाठी काय करावे लागेल.

Q.5) सदर क्षेत्र yellow zone मध्ये असल्यास त्या बाबतचा तसा दाखला कोठे मिळेल व त्यासाठी कोण कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागेल ?
आपले आजोबांनी गट नंबर मधील काही भाग आपणास माशीस पत्राद्वारे आपणास दिला आहे . महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा कलम ३१ अन्वये , ज्या ठिकाणी गट्स्कीम लागू झाली आहे व या स्कीम अंतर्गत जमीन देण्यात आलेली असेल , अश्या जमिनीची विक्री उपकलम ३ च्या कारनानाशिवाय करता येत नाही .
उपकलम ३ ( vi) अन्वये , बक्षीस पत्राद्वारे नातेवाईकास दिलेली जमीन असेल तर , अशी जमीन वर उपरोक्त निर्बंध लागू राहणार नाही .
सबा प्रश्न १ चे उत्तर -होय
प्रश्न २-अन्य ११ व्यक्ती उपकलम ३ मध्ये नमूद प्रवर्गातील नसतील तर , त्यांचे लाभत झालेले हस्तांतरण अवैध आहे .
प्रश्न ३-लगत उपरोक्त उत्तरात नमूद केल्याप्रमाणे , अन्य व्यक्ती उपकलम ३ मधील प्रवर्गातील नसतील तर हस्तांतरण अवैध्य आहे .
प्रश्न ४- हस्तांतरण अवैध आहे . कलाम ९ प्रमाणे कारवाई सुरु होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. आदरणीय सर, १० बिगे जमीन वडिलांनी ३० वर्षा पूर्वी विकत घेतली आहे. सदर जमिनीची आता मोजणी केली असता ती १० बिगे व १० आरं भरते रेकॉर्ड ला १० बिगे आहे रेकॉर्डला १० बिगे १० आरं करण्यासाठी काय करावे लागेल. मार्गदशन करावे हि विनंती.
क्षेत्र दुरुस्ती अर्ज , अधीक्षक भूमी अभिलेख / जिल्हाधिकारी यांचेकडे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

AS per The Bombay Prevention of the Fragmentation and Consolidation of Holdings Act, 1947 Local area and standard area are notified by State Government. I want to get this for Mulshi Taluka, Dist. Pune. I could not get it in gazette notification search . Where and how can I get it? In one of the court proceedings I found this information.
“The learned Counsel for the petitioner has invited the attention of the Court to notification No. CON. 3360/33065-M published in the Official Gazette on 17th May, 1962 issued by the Government of Maharashtra in exercise of powers conferred on it by sub-section (3) of section 5 of the said Act. By the same notification the Government of Maharashtra gave public notice of the standard area specified in column 4 of the Schedule annexed thereto, which the Government of Maharashtra has determined under sub-section (1) of the said section 5 for the class of land specified in column 3 thereof in the local area or areas specified in column 1 of the said Schedule.”
I could not get this नोटिफिकेशन.
प्ली help
नमस्कार सर , माझ्या मामाने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनी मध्ये फक्त त्यांची वारसनोंद करून घेतली व बहिणींची नावे टाकली नाही ही वारसनोंद करून 15ते२० वर्षे झाली आहेत आता आम्हाला बहिणीची वारसनोंद करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
कोणाचाही वारसहक्क डावलणे ही गंभीर बाब आहे. आपण सदर वारस नोंदीच्या फेरफार विरूध्द उपविभागीय अधिकारी यांचेकडे वेळेत अपील दाखल करणे आवश्यक होते. आता १५-२० वर्षानंतर अपील दाखल करण्यास मुदतीच्या कायद्याची बाधा येईल. तथापि, आपण उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करावी. अन्यथा दिवाणी न्याायालयात दाद मागावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,

योग्य ती स्टॅम्प ड्युटी सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये भरून हक्कसोड पत्र तलाठी यांच्याकडे जमा करून दोन महिने झाले आहे तसेच तलाठी यांच्या कडून पोच ही घेतलेली आहे आणि तेथील तलाठी आता निवृत्त झाले आहेत आणि आतापर्यंत सुधारित सातबारा उतारा आणि त्याचा फेरफार मिळाला नाही आहे.

सुधारित उतारा आणि फेरफार मिळवण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
महसूल विभागात संगणीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे त्यातील व्यस्ततेमुळे उशीर होण्याचा संभव आहे. तथापि, आपण तहसिलदार यांची भेट घेऊन चर्चा करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Sandeep Kurade.

1. नमस्कार साहेब ,माझा प्रश्न
जर वाढीलोपार्जित हिंदू अविभक्त कुटूंब मिळकत आहे आणि त्या शेतजमीन आहॆ,
तर वडील x च्या मृत्यु 1965 ला झाला आणि त्यांचे 4 मुले होती ( a,b मुले C,D विवाहित मूली )आता A & B हेयानी त्यांची नावे कब्जेदार व C ,D ची नावे इतर हक्कात 1984 ला 7/12 वर नोंद केली.

तरी 4 मुलांची पुर्वी मृत्यु आहेत पण त्यांची वारासदार चि नावे पण त्या प्रमाणे नोंद झाली, आता C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.

1) C & D चे कब्जेदार सदरी न होता इतर हक्कात केले हे कुठल्या कायदा चे उलघन आहे.?

2)C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.तर ते कब्जेदार सदरी नाव नोंदवु शकते का? कुठलया कायदा खाली.?

सदर एक 2012 ला c च्या वारासने ने त्याचा अविभक्त हिस्सा च्या ऐका गट मध्ये ची खरीदी दिली. तेव्हा सब रजिस्ट्रार ने ते नोंदविले पण आता जेव्हा बाकी चे गट खरेदी व बक्षिसपत्र करताना सब रजिस्ट्रार आता 2017 ला मना करत आहे ते म्हणतात इतर हक्कात नाव आहे.

3) इतर हक्कात च्या वरसाना त्यांचा अविभक्त हिस्सा कुठल्या कायदा खाली देता येत नाही किवा दस्त नोंदिवता येत नाही.



C & D चे कब्जेदार सदरी न होता इतर हक्कात केले हे कुठल्याही कायद्याचे उलंघन नाही. पूर्वी मुलींना मिळकतीमध्ये समान वारसा हक्क नसल्यामुळे फार पूर्वीपासून ही पध्दत अस्तित्वात आहे.
दिनांक २२ जुन १९९४ रोजी हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, महाराष्ट्रात लागू करतांना त्यात सुधारणा करुन हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ लागू केला.
हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ कलम २ अन्वये हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, महाराष्ट्रात लागू करतांना त्याच्या कलम २९ नंतर पुढे प्रकरण ३० समाविष्ट केले गेले.
 प्रकरण २-क अन्वये "उत्तरजीवीत्वा)द्वारे उत्तराधिकार" नावाचे प्रकरण समाविष्ट‍ केले गेले आणि पुढील तरतुदी समाविष्ट केल्या् गेल्या.
 कलम २९-क: कलम ६ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी -
(एक) मिताक्षर कायद्या‍ने नियंत्रीत केल्या जाणार्या संयुक्त हिंदू कुटुंबामध्ये सहदायकाची कन्या, ज्या रीतीने पुत्र सहदायाद होतो, त्याच रीतीने जन्मापासून, तिच्या स्वत:च्या‍ हक्कामुळे सहदायाद होईल आणि ती पुत्र असती तर तिला जे जे अधिकार, दायित्वे, नि:समर्थता प्राप्त् झाली असती, ती प्राप्त् होईल.
(दोन) उपरोक्त संयुक्त् हिंदू कुटुंबामधील वाटणीच्या वेळेस पुत्राला वाटून देण्यात येत असलेल्या् हिस्या इतका हिस्सा कन्येलाही मिळेल.
(तीन) उपरोक्त प्रमाणे हिस्सा मिळालेली स्त्री्, त्या हिस्स्याबाबत मृत्यूपत्रद्वारे किंवा अन्य प्रकारे अशा मिळकतीची विल्हेवाट सुध्दा लावू शकेल.
(चार) उपरोक्त तरतुदी हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-१९९४ च्या‍ प्रारंभाच्यां दिनांकापूर्वी (२२ जुन १९९४ पूर्वी) ज्या मुलींचे लग्न झाले आहे त्यांना लागू असणार नाही.
(पाच) दिनांक २२ जुन १९९४ पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या असतील त्यांना उपरोक्त तरतुदींमुळे बाधा येणार नाही.
उपरोक्ती तरतुदींन्वये आपण तहसिलदारकडे अर्ज करून इतर हक्कातील वारसांची नावे कब्जेदार सदरी नोंदविण्यासाठी अर्ज करू शकाल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आमचे वडिलांनी सन २००३ मध्ये मृत्यूपत्र नोंदणीकृत न करता फक्त नोटरी केलेले आहे. नोटरी केलेले मृत्यू पत्र ग्राह्य धरले जाईलका कृपया मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.
नोंदणी अधिनियम १९०८ कलम १८ अन्वये ज्या दस्तांची नोंदणी करणे वैकल्पिक आहे त्यांच्या यादीत मृत्युपत्राचा समावेश होतो. त्यामुळे मृत्युपत्राची नोंदणी अनिवार्य नाही. तुमच्या वडिलांनी नोटरी केलेले मृत्युपत्र निश्चितच ग्राह्य धरले जाईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vikram yadav
08-02-2017
Vikram.vy1113@gmail.com

Namaskar Sir, prant shebacha nikal kalvadhi Kati asto? to nikal postane yato ka tycha kalavadhi Kati.?
अर्धन्यायीक प्रकरणात नोटीस बजावणे, नैसर्गिक न्या्यतत्वातनूसार प्रत्येक संबंधीताला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देणे, वाद-विवाद, उलटतपास यागोष्टी‍ संबंधीत अधिकार्याला इतर सर्व कामे सांभाळून कराव्या लागतात. त्यामुळे कोणत्या प्रकरणाचा निकाल कधी देता येईल हे सांगणे अवघड आहे. तथापि, नवीन तरतुदींनुसार वाद प्रकरणे शक्यतो एक वर्षाच्या आत निकाली काढावीत अशा सूचना आहेत. निकालाची समज पोस्टाने पाठविण्यात येते. निकालपत्राची नक्कल आपण समक्ष जाऊन विहित शुल्क अदा करून घेणे अपेक्षीत आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
07-02-2017
swati.swami@yahoo.com

मा. सर धन्यवाद . पण महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५ हा निर्णय कोठे मिळू शकेल ?
संबंधीत न्यायालयात अर्ज करून नक्कल घेता येईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर मी राहुल माझा प्रश्न असा आहे कि आमची गावी वडिलोपार्जीत जमीन आहे, ती जमीन आमचे आजोबा निधन झाल्यावर वारस तपासणी करून कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या मोट्या काकांनी सातबारावर आपले नाव लावले व माझ्या वडिलांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये लागले आहे आता मोठे काका वारले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना स्वतःच्या कुटुंबाचीच फक्त नोंद केली आहे त्या बरोबर माझ्या वडिलांची त्यांचे संख्ये भाऊ म्हणून वारस म्हूणन नोंद करणे जरुरी असताना हि त्यांनी फक्त आपल्याच कुटुंबाची नोंद केली आहे , तर माझ्या वडिलांनी आपल्या सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी काय करावे ?त्यासाठी मोट्या काकांच्या कुटुंबाची सही किंवा परवानगी लागेल काय ?गाव नमुना ६ क च्या उताऱ्या वरून वारस तपासणी करता येईल काय ?याचे आपण मार्गदर्शन करावे धन्यवाद साहेब .
संबंधीत फेरफार विरूध्द अपील दाखल करावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vikram yadav
06-02-2017
Vikram.vy1113@gmail.com

. Namaskar Sir appan mala nehmich yoga MargDarshan keele ahhe an mala vicharyache ahhe ki mage Apil prant Sir yanchakade Charu hote te 7/12 nod dharnys sathi che hote amche vakil sangtat ki amche saves Kam Dale ahhe ata no nikal prant shheb detil . Toa nikal postane kalvala Gail.atta 2 machine gale tari nikal kalvala nahi.tar mi Kay karu, kharch Kati kalvadhi nikal patavnysathi ahhe plz sanga.thanks.
आपण स्वत: संबंधीत कार्यालयात नकलेसाठी अर्ज करावा. निकाल झाला असेल तर त्या्ची नक्कल लगेच मिळू शकेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3