जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Pravin
09-01-2020
pmpravin1@gmail.com

सर, निलंबन आदेशा विरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास जिल्हा परिषदेला कर्मचाऱ्याला पुनर्स्थापित करता येते का?
उच्च न्यायालयाचे कोणते स्थगित आदेश नसल्यास , पुनर्स्थापित करण्यास कोणतीही बाधा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझी आई परगंधा आहे म्हणजे घरातून २२ वर्षा पूर्वी निघुन गेली आहे त्याची नोद पोलिस स्टेशन ला केलेली नाही माझ्या आई चे १५ वर्षा पूर्वी वडील वारले आहे त्यांच्या नावावर असणारी सर्व जमीन ४ मामा नी त्यांच्या नावावर केली व त्यातील बरीच जमीन त्यानी विकाली आहे ७/१२ वर वारसदार म्हणून आई चे नाव नाही तर मला त्यात माझ्या आई चा वारस म्हणून मला जामिनीचा अधिकार मिळू शकतो का आणि जर मिळत असेल तर त्यासाठी काय करावे
आई परागंदा असले बाबत प्रथम तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करा .
आपली आई परागंदा आहे म्हणजे ती अजून हयात ( still alive ) असा होता . त्यामुळे प्रथम आई चे नाव दाखल करून घ्या . त्यासाठी जय फेरफाराने केवळ मामांचे नाव दाखल आहे तो प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा .
आई ची तक्रार दाखल करून ७ वर्षे झाल्यावर , आई चे वारस म्हणून आपले नाव दाखल होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
फेरफार नंबर 23339मधील नोंदी बाबत जुना 6ड न बघता नवीन 6ड वर मालकी चा केला व विक्री वेळी जुने कागद पञ न बघता खरेदी विक्री केली त्यानी आता आम्हा ला नोटीस आलीच नाही मी शेजारी असुन आता माझे क्षेत्रापरमाणे भरत नाही मी ऑनलाईन तक्रार टाकली मंडळ अधिकारी यांनी आम्हाला 3तारखा दिल्या पण आम्हा ला आदेश दिला आता उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपिला मधे जाणेच आहे किती दिवस असतात
६० दिवस
जर आपला प्रश्न क्षेत्र बाबत असेल तर , मंडळ अधिकारी अथवा प्रांत अधिकारी काही करू शकणार नाही . लेखन प्रमाद अथवा जाणीव पूर्वक केलेली चूक असेल तरच , उपरोक्त अधिकारी यांचा प्रकरणातील हस्तक्षेप उपयोगी पडेल अन्यथा आपणास भूमी अभिलेख खाते यांचे दरवाजे ठोकावे लागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by amol kolekar
29-12-2019
amolkolekar5@gmail.com

नमस्कार सर,

माझा शेतजमिनी विषयीच्या रेकॉर्ड्स संदर्भात प्रश्न आहे.
सर माझ्या पंजोबना २ मुले होती. त्या २ मुलांच्या नावावर समान शेतीचे क्षेत्र १९७२ परेंत होते. पण १९७२ साली आमचा शेतीचे सर्वे भुमिअभिलेख मार्फत बदलले गेले होते,
त्यामध्ये एका सर्व नंबर चे रुपांतर दोन सर्वे नंबर झाले आहेत.
त्या दोन सर्व नंबरचे योग्य फेरफार झाले होते. पण एका सर्व नंबर मध्ये दोघांच्या नावावर समान क्षेत्र होते, तर दुसऱ्या सर्वे मध्ये ते क्षेत्र एकाचा नावर लागलेलं आहे पण त्याचा फेरफार मध्ये दोघांची हि नावे आहेत. पण तालाठीने सातबारा नोंद घालताना चूक केली आहे.
नंतर ज्या सर्वे मध्ये चूक झाली आहे तो सर्वे च्या प्लॉट चुलत आजोबाने दुसऱ्याला विकला,.
अशाप्रकारे.. आमचा आजोबांच वाट्याला कमी जमीन आलेली आहे.
तर ह्याजमिनीची रेकॉर्ड्स ची चूक सुधाण्यासाठी काय करावे
लागेल? कोर्ट केस करून जमीन मिळेल की हे मार्गदर्शन करावे

आपले प्रश्नावरून , आपले गाव मध्ये एकत्रीकरण योजना अमलात आलेली आहे . त्यामुळे आपण म्हणता त्या प्रमाणे एका भू खंडला केवळ एकाच आजोबांचे नाव लागले आहे . याला चूक म्हणता येणार नाही .
आपण हे हि म्हणता कि , तलाठी याने , फेरफारामध्ये , दिघंची नाव असताना , ७/१२ सादरी चुकीचा अंमल दिलेला आहे . अशी वस्तू स्थिती असेल तर , चूक दुरुस्त करता येईल . आपण तहसीलदार यांचेकडे कलम १५५ खाली अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय
खालील अपिलाच्या निर्णयाची प्रत मेल वर मिळावी हि विनंती
मा. मंत्री (महसूल) यांचे न्यायालयात क्रमांक आरटीएस-२८१७/प्र.क्र. ७८२/ज-४ अ
आपला विश्वासू
सुरज कदम
कृपया अशी माहिती विचारू नये
प्रश्नांना माहिती /उत्तरे दिली जातात
माहितीच्या अधिकारप्रमाणे , अभिलेख या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडे साहेब

माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1914 सालाचा आहे. (जुन्या जन्मनोंदीनुसार), माझ्या आजोबांचे मामा बापु खामगळ यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी माझ्या आजोबांना ते 10 वर्षाचे असताना दत्तक घेतले होते. (दत्तक पत्र वगैरे नाही). व त्यांचे नाव शंभु बापू खामगळ असे ठेवले होते. पुढे काही कालावधीने आजोबांचे मामा मयत झाले, त्यांच्या नावावरील 1 एकर जमीन माझ्या आजोबांच्या नावावर आली, माझ्या आजोबांना त्यांच्या मामांच्या मृत्यूनंतर पुन्हा माझे पणजोबा त्यांच्याकडे घेऊन आले, व पुन्हा त्यांचे नाव शिवराम तात्या शिर्के असेच राहिले, जे आजपर्यंत आहे. वरील सर्व माहिती आजोबांनी सांगितलेली आहे. 1 महिन्यापूर्वी माझे आजोबा मयत झाले आहेत, त्यांचे सर्व कागदपत्रे शिवराम तात्या शिर्के नावांनी आहेत मी त्यांच्या मृत्यूची नोंद करणेकरिता ग्रामसेवकास भेटलो असता मी त्यांच्याकडे शिवराम तात्या शिर्के उर्फ शंभु बापू खामगळ अशी नोंद लावण्याची विनंती केली असता त्यांनी नकार दिला. ते शिवराम तात्या शिर्के या नावाने नोंद करण्यास तयार आहेत. पण मला दोन्ही नावांच्या नोंदी मृत्यू दाखल्यावर हव्या आहेत, कारण आजोबांच्या नावावर 1 एकर जमीन आहे.
तरी मी काय करावे याची माहिती द्यावी.
आजोबांचे नावात बदल आपणास करता येणार नाही .
प्रश्न आपले नाव मिळकतीस लागण्याचा आहे . आजोबांचे जे वारस ( वर्ग १ ) असतील त्यांची नावे लागतील . वर्ग १ वारस मयत असतील तर , अश्या वारसांचे , वारस यांची नावे लागतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,
scanned फेरफार पोस्ट करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी
history file भेटू शकणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे

2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात
जुने अभिलेख मिळत नसतील तर आपण पुराभिलेख विभागात मिळते का पहा ?
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्षात ते मिळते का पहा ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब नमस्कार,

१९ ६१ साली वीर धरण प्रकल्प साठी संपादित केलेल्या शेत जमीन आणि गावठाण भूखंड ची मागणी आता २०१९ साली केल्यास कोणते कायदे तथा जी आर , परिपत्रके द्व्रारा खालील प्रश्नांचा निर्णय दिला जाईल, १९६१ चा अथवा १९९० चा, किंवा अन्य?? त्या वेळी भूसंपादन अधिनियम १८९४ द्वारे संपादन केले होते. त्या नंतर अनेक वेळा पुनर्वसन कायदे बदलत गेले आहेत.

१) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पर्यायी शेत जमीन वाटप बाबत कमाल आणि किमान मर्यादा ठरविणे बाबत
२) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवीन गावठाण मध्ये पर्यायी गावठाण प्लॉट वाटप बाबत कमाल आणी किमान मर्यादा
३) या बाबत जी आर व परिपत्रके शासन निर्णय मध्ये उपलब्ध नाहीत. मुंबई मध्ये कसे मिळतील?

आपण मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

धन्यवाद

अजय चव्हाण, मुंबई
वीर धरणासाठी जमीन संपादन आपले म्हणण्यानुसार १९६१ साली करण्यात आलेले आहे . पहिला पुनर्वसन कायदा १९७६ साली अस्तित्वात आला . त्यामुळे या संपादनासाठी पुनर्वसन कायदा लागू केलेला नसेल . मात्र महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९६९ अन्वये , आपण जिल्हाधिकारी यांचे कडे , जमीन मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलांनी गावातील एका व्यक्ती कडून जमीन तोंडी खरेदी करून (दस्त न करता) त्या इसमास पैसे दिले. गावातील ओळखीचा आहे म्हणूण विश्वासाने पूर्ण पैसे दिले. नंतर माहित पडले कि त्या जमिनीवर ७०,००० हजार IDBI BANK चा बोजा आहे. परंतु बोजा १ लाख पेक्षा कमी आहे. तरी त्या ७/१२ वर IDBI बँकेचे ७०,००० हजाराचा बोजा नमूद केला गेला आहे.
RBI च्या २०११ च्या परिपत्रकानुसार १ लाखांपर्यंतचा बोजा ७/१२ मध्ये नमूद नाही केला जात.
मूळ मालक बोजा भरू शकणार नाही. तर तो बोजा चूक दुरुस्ती फेरफार ने काढता येईल का?
जर जमीन आपले नावावर नाही तर हा खटाटोप कश्यासाठी . ? जर जमीन आपणास खरेदी करायची असेल तर , दस्त नोंदणीकृत करणे आवश्यक आहे .
दुसरे , कर्जाची नोंद / बोजा काढला म्हणून कर्ज फेडले असा होत नाही . जमीन आपले नावावर झाल्यावर , आपणास बॅंकचे कर्ज व्याजासह भरावे लागेल . त्यापेक्षा त्या व्यक्तीला कर्ज रक्कम भरण्यास सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amruta Tale
13-12-2019
amrutatale6976@gmail.com

Talathi post holder na kon kontya departmental exams deta yetat?
परिस्का देण्यावर निर्बंध नाहीत . मात्र परवानगीची ( प्रांताधिकारी ) आवश्यकता आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन अविभाज्‍य शर्ती नुसार जमीन विक्री माझ्या आजोबाची शेती हि माझ्या नावे (नातू) करायची व बक्षीस पत्र केले आसता तर ती मुलकी पाटील इनामाची आहे असे सांगण्यात आले असेल.सदर जमीन विक्री करावयाची झालेस महाराष्‍ट्र शासन‍ परिपत्रक क्रमांक /वतन/1099/प्र.क्र./233/ल-4 दिनांक 09/07/2002 प्रमाणे परवाणगी घ्‍यावी लागणार नाही अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

Question by Swapnil mane
13-12-2019
maneswapn124@gmail.com

सर माझा आजोबांनी 2013 साली एका व्यक्तीला नोंदणीकृत दस्ताने जमीन विकली असून त्यावर 11 गुंठे नोंद आहे तर ती जमीनीची नोंद तुकडे जोड बंदी कायद्याद्वारे रद्द करता येते का दुसरी गोस्ट त्या जमिनीचा उताऱ्यावर बोर ची नोंद आहे.तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्या दस्ताचा आधारे 7/12 वर नोंद ओढलेली आहे.तरी या कायदयचा आधार घेऊन ही नोंद रद्द करता येते का याबाबद्दल मार्गदर्शन हवे आहे.
जमिनीचे स्वरूप काय आहे त्या वर अवलंबून आहे .
बागायत जमीन असले तर साधारण पणे मर्यादा ५ आर , एकपिकी असेल तर १५ आर व वरकस असेल तर प्रमाण २० आर आहे . हे प्रमाण जिल्हा निहाय वेगळे आहे .
नोंद २०१३ सालची आहे . जर तहसीलदार यांनी कारवाई केली तर , जमीन शाशन यांचेकडून जप्त होईल व आवश्यकतेप्रमाणे शासन कडून संपादित होऊ शकेल . मात्र आपणास जमीन परत मिळणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका व्यक्तीकडून दुकान भाड्याने घेतले होते 3 वर्षयाच्या करारावर परंतु व्यवसाय न चालल्यामुळे 6 महिन्यात आम्ही दुकान सदर मालकाच्या ताब्यात दिले आणि डिपॉसीट म्हणून दिलेले 150,000 रुपये चेकच्या स्वरूपात घेतले परंतु चेक बोउन्स झाला म्हणून कोर्टात केस चालू आहे एक वर्ष झाले तरी केस चालू आहे तर लवकरात लवकर केस निकाली लागण्याकरिता काय करावे लागेल?
मला ७/१२ विभक्त करायचा आहे तरी मला प्रक्रिया सांगा
७/१२ दोघांचे नावावर आहे का ?
कृपया आकारफोड पत्रक करून घ्या . आकार फोड पत्रकांचे आधारे , ७/१२ विभक्त होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,म.न.पा.हद्दीत आम्ही बिनशेती परवानगी घेतली असून आम्हास बांधकाम परवानगी मिळाली आहे.त्या जागी पूर्वीची खाजगी विहीर आहे.सदर विहिरीवर आम्हास स्लॅब टाकावयाचा आहे.व पाणी घेण्यापुरती आम्ही त्यावर झाकण करणार आहोत.तरी यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
आपणास बांधकाम परवानगी दिली आहे . त्यात या बाबत उल्लेख असेल . आदेश बघून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खाजगी विहीर आहे . त्या विहिरीवर कोणाचा पाणी घेण्याचा अधिकार आहे का ? अधिकार नसल्यास , आपण विहित बंद करू सःक्ता . त्या साठी परवानगीची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावठाण क्षेत्रात घर, आंगण व परिसदर मिळून जास्तीतजास्त किती जमिनीवर एखादा व्यक्ती हक्क सांगू शकतो, या बाबतीत काही कायदा आहे का???
ग्राम पंचायत कार्यालयात , घराची नोंदणी होताना , क्षेत्राचा तपशील नोंदवलेला असतो . क्षेत्र प्रमाणे , ताबा त्या व्यक्तीचा असतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या बाबांना मिलिटरी रिटायर्ड झालेवर सरकारी जमीन मिळाली आहे
तसेच माझ्या वाडीतील एका व्यक्ती ला सुदधा सरकारी जमीन मिळाली आहे सर्वे नंबर एकच आहे
सातबारा उतारा सुद्धा एकत्र मग ती जमीन वेगवेगळी कशी करता येईल
जिल्हाधिकरी यांचे जमीन प्रदान आदेश बरोबर , क्षेत्राचा नकाशा देणे आवश्यक होते . आपण जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून दोघांचे क्षेत्र विभागून ( ७/१२ स्वतंत्र करून ) देणे बाबत अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर , आमच्या शेतातून मुख्यमंत्री ग्राम सडक मार्ग जात आहे, आमच्या उताऱ्यामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही तसेच गाव नकाश्यामध्ये सदर रस्त्याचा उल्लेख नाही, आता रस्ता ३० फूट रुंदीने वाढत आहे यामध्ये आमचे १ एकर क्षेत्र रस्त्यात जात आहे तरी यासाठी काही मोबदला मिळेल का किंवा नुकसान भरपाई कशी मिळवली जाईल.
घटनेच्या अनुच्छेद ३१ अ नुसार , नुकसान भरपाई दिल्याशिवाय , जमीन संपादन करता येत नाही अथवा त्या व्यक्तीकडून जमीन काढून घेता येत नाही .
संबंधित विभागास नोटीस पाठवून , नुकसान भरपाई मागा , अन्यथा न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मोठा भाऊ वडील असताना संपत्तीचे हिस्सा मागत आहे तर त्याचा पूर्ण हक्क सोड करण्यासाठी किती खर्च येईल आणि काय करावे लागेल
वडिलांना जमीन त्यांचे वडिलांकडून आलेली असेल तर , भावाची मागणी रास्त आहे . मात्र वडिलांची मिळकत स्वकष्टार्जित असेल तर , भावाला जमीन मागता येणार नाही .
वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपास अल्प खर्च आहे . २०० रुपयेच मुद्रांक शुल्क लागते . दस्त करून नोंदणीकृत वाटप करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खरीदीखता ने बिगर शेत जमीन नावे करण्यास अर्ज दिला आहे तर त्या नुसार फेरफार नोंद दाखल किती दिवसात करण्याचा नियम आहे व त्यासाठी तलाठ्याकडे किती रूपये भरावे लागतील.आणि जर तलाठ्याने एका महिण्यात नोंद केली नाही तर तक्रार कोणाकडे करावी.
नोंद मंजूर करण्यास १५ दिवसाचा कालावधी आवश्यक आहे
तलाठी टाळाटाळ करत असेल तर , तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१५ गुंठे शेत जमीन सार्वजनिक संस्थेंस दानपत्रा ने हस्तान्तरित करता येईल का


या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे तुकडे बंदी कायद्याची बाधा , खालील किमान क्षेत्राचे हस्तान्तरं करण्यास आहे
5 आर - बागायत
१५ आर - एक पैकी
२० आर - वरकस
मात्र हे प्रमाण जिल्हानिहाय वेगळे आहे . तपासून घ्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,वसुली व विक्री अधिकारी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील जप्ती आदेशाने का.तलाठी यांनी जमीनदाराच्या ७/१२ तील इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद घेतली आहे.सदर आदेशाच्या नोंदीवर संबंधितास का.तलाठी यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करता येईल का?किंवा कसे ? कारण संबंधित तलाठी तक्रार दाखल करून घेत नाही.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
तलाठी यांनी वसुली अधिकारी यांचे आदेशाने , जप्त केले बाबत नोंद घेण्यात आलेली आहे . त्या विरुद्ध तलाठी यांचे कडे तक्रार करता येणार नाही. प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दि.११/१०/१९८० रोजी फेरफार क्र.१०४६ अन्वये खातेदार श्री.पांडू रामजी सुर्वे मयत झाले असुन त्यांचे वारस पत्नी-भागीबाई पांडू सुर्वे व मुलगी एकच – शेवंतीबाई पांडू सुर्वे त्यानंतर दि. १९/११/२०१९ रोजी फेरफार क्र. १४८८ प्रमाणे खातेदार श्रीम. भागीबाई अनंदी पांडु सुर्वे मयत झाले असून त्यांना वारस मुलगी एकच – वैजंयती रामजी कानसे असे आहे. वैजंयती रामजी कानसे यांचे लग्नापुर्वी चे नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे असे आहे. शेवंतीबाई पांडू सुर्वे व वैजंयती रामजी कानसे या दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहे. ७/१२ सदरी चुकीने दाखल झालेला लग्नापूर्वीचा नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे कमी करण्यास काय करावा ?
शपथ पत्र दाखल करून तहसीलदार यांच्छेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3